‘समोर जी व्यक्ती आली, तीच आपला ‘गुरु’ आहे’, असे मानून साधना केली पाहिजे. ‘देव कुणाच्या रूपात येऊन आपली कधी परीक्षा घेईल ?’, हे सांगता येत नाही. त्यामुळे उत्तम शिष्य नेहमीच परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सिद्ध असतो. देव कधी गुरूंच्या रूपाने परीक्षा घेतो, तर कधी सामान्य माणसाच्या रूपातही तो येतो. आपले नित्य जीवन हीच आपली एक परीक्षा आहे. तिला हसत हसत सामोरे जाणे, हीच आपली कसोटी आहे. जीवनातील मायेला भुलला, तो फसला आणि जीवनातील अध्यात्माचा शोध घेण्यासाठी जो जगला, तो जिंकला.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
खरा साधक कसा हवा ?
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !