…आणि माझा अहं अल्प झाला !
आतापर्यंत डॉ. आठवले यांनी सनातन संस्था स्थापन केली, अशी संस्थेची ओळख करून दिली जायची. आता सनातन संस्थेचे डॉ. आठवले, असे मला ओळखतात ! – डॉ. आठवले (वैशाख कृष्ण पक्ष दशमी, कलियुग वर्ष ५११५ (३.६.२०१३))
आतापर्यंत डॉ. आठवले यांनी सनातन संस्था स्थापन केली, अशी संस्थेची ओळख करून दिली जायची. आता सनातन संस्थेचे डॉ. आठवले, असे मला ओळखतात ! – डॉ. आठवले (वैशाख कृष्ण पक्ष दशमी, कलियुग वर्ष ५११५ (३.६.२०१३))
हिंदू नेहमी ऋग्वेदातील कृण्वन्तो विश्वम् आर्यम् ।, म्हणजे संपूर्ण विश्वाला आर्य, म्हणजे सुसंस्कृत करू असे अभिमानाने म्हणतात. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्याचा आरंभ स्वतःपासूनच केला पाहिजे. कृण्वन्तो स्वम् आर्यम् ।, म्हणजे स्वतःला सुसंस्कृत करू, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे लोकां सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥ अशी त्यांची स्थिती होणार नाही … Read more
१. लढ्याचा आरंभ होतांना आणि चालू असतांना : हर हर महादेव । २. लढा जिंकल्यावर : जयतु जयतु हिंदू राष्ट्रम् । या सूचनेत प्रसंगानुसार पालट करता येईल.- डॉ. आठवले (३१.१२.२०१३)
मंदिरांतील पुजार्यांनी आपण देवाचे भक्त आहोत आणि मंदिरात येणार्यांना भक्ती करायला शिकवणे, ही आपली साधना आहे, या दृष्टीने आपल्या पुजारीपणाकडे पाहिले पाहिजे. असे केले, तरच समाजाला पुजारी आपले वाटतील आणि त्यांचीही प्रगती होईल. – डॉ. आठवले (२३.१.२०१४)
हिंदु धर्माचा अभ्यास आणि साधना नसल्याने हिंदूंना धर्माचे महत्त्व कळत नाही. त्यामुळे कोणी हिंदु राष्ट्राची स्थापना करा. हिंदु धर्माचा जगभर प्रसार करा, असे म्हणत नाही. आजार्याला औषधाचे महत्त्व कळते. औषधांहून हिंदु धर्म अनंत पटींनी श्रेष्ठ आहे. औषधे केवळ काही वेळा आजार बरा करतात; पण मृत्यूपासून सुटका करू शकत नाहीत. याउलट धर्म भवरोगातून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या आजारातून … Read more
एकुलता एक मुलगा असला की, वडिलांची सर्व संपत्ती मिळते; पण भावंडांबरोबर कसे रहायचे ? भावंडांचे प्रेम म्हणजे काय ?, हे शिकायला मिळत नाही. पुढे आई-वडिलांचे सर्व उत्तरदायित्वही सांभाळावे लागते. ते नको असल्याने हल्लीची मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. साधना केल्यास मुले कृतज्ञतापूर्वक आई-वडिलांचे शेवटपर्यंत सर्व करतात आणि त्यांच्या मुलांसमोरही एक आदर्श ठेवतात. – डॉ. आठवले … Read more
१. पूर्वी सर्व गाववाले एक असत. २. पुढे फक्त एकत्र कुटुंबातील सर्वजण एक असत. ३. आता एका कुटुंबातील पती-पत्नीही घटस्फोट घेतात आणि मुलेही आई-वडिलांना विचारत नाहीत ! या स्थितीत राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सर्वांनी एकत्र येणे किती कठीण आहे, हे लक्षात येईल. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे साधना करून सर्वांबद्दल प्रीती निर्माण करणे. – … Read more
सत्ययुगात कायदेच नव्हते, म्हणजे त्यांची आवश्यकताच नव्हती; कारण प्रत्येक जण नीतीवान होता. त्रेतायुगात थोडेफार कायदे होते; पण त्यांची आवश्यकता फारच अल्प होती. द्वापरयुगापासून कलियुगापर्यंत कायद्यांची संख्या वाढत गेली आहे. प्रत्यक्षात कितीही कायदे केले आणि कायद्यांनुसार कितीही कडक शिक्षा केल्या, तरी त्यांचा गुन्हेगारांवर काहीही परिणाम होत नाही, हे पुनःपुन्हा तेच गुन्हे करणार्यांवरून सिद्ध झाले आहे. धर्मशिक्षणाच्या … Read more
गेले ४ – ५ महिने मी तोंडाला अतिशय कोरड पडते, या त्रासासाठी डॉक्टर आणि वैद्य यांचे उपाय केले. तेव्हा लिमलेटच्या गोळ्या चघळायचो; पण फरक पडला नाही. कोरड पडते तेव्हा पाणी प्यायला हवे, हे लक्षात यायचे नाही. काल ते लक्षात आले आणि पाणी अधिक प्रमाणात प्यायला लागलो. तेव्हापासून तोंडाला कोरड पडणे कमी झाले. – डॉ. आठवले … Read more
सनातनच्या ग्रंथांतील सूक्ष्म-परिक्षणात काही ठिकाणी शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो. शांती निर्गुणाशी संबंधित असतांना शांतीच्या लहरी कशा असतील ?, असे काही जणांना वाटते. ते योग्यही आहे. प्रत्यक्षात निर्गुणाच्या स्थितीला गेल्यावर, म्हणजे अद्वैतात गेल्यावर शांतीची अनुभूती आली, असे सांगणाराही उरत नाही. शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो, तो ३० टक्क्यांहून अधिक शांती अनुभवणार्या साधकांना आलेला अनुभव असतो. … Read more