प.पू. डॉ. आठवले यांचा कर्मकांडांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटणे !

कर्मकांडानंतर उपासनाकांड येते. मी उपासनाकांडांतर्गत नामजपापासून साधनेला आरंभ केला. त्यामुळे मला यज्ञयागादीच नाही, तर साध्या पूजापाठाचीही ओढ नव्हती. असे असले, तरी विविध ठिकाणी होणार्‍या कर्मकांडांचे गेली १५ वर्षे ध्वनीचित्रीकरण करवून घेऊन मी ते संग्रही ठेवले आहे. त्याचा काय उपयोग हे मला ज्ञात नव्हते. २० ते २६ जून २०१४ मध्ये गोव्यात झालेल्या तिसर्‍या अखिल भारतीय हिंदू … Read more

प्रकृतीनुसार आणि काळानुसार त्या त्या देवतेची उपासना करणे आवश्यक

गुरुप्राप्ती होईपर्यंत पुढील तत्त्वे लक्षात घेऊन त्यानुसार साधना केल्यास प्रगती लवकर होते. १. व्यष्टी साधना : प्राथमिक टप्प्याची साधना म्हणजे कुलदेवतेची उपासना आणि त्या त्या देवतेची तिच्या त्या त्या सणांच्या दिवशी, तसेच अमावास्या इत्यादी दिवशी करायची उपासना. पुढे गुरुप्राप्ती झाल्यावर गुरु सांगतील, ती उपासना करायची असते. २. समष्टी साधना : ही अधिकतर काळानुसार असते, उदा. … Read more

सध्याचे राजकारणी व हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छ. शिवाजी महाराज यामधील भेद!

छ. शिवाजी महाराजांनी समर्थांच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. संतांकडून असा आशीर्वाद मिळण्यासाठी एकतरी राजकारणी लायक आहे का ? – डॉ. आठवले (१५.७.२०१४)

त्रासांसंदर्भात तज्ञांचा सल्ला आणि साधना

जीवनातील ८० टक्के त्रास प्रारब्धामुळे होतात. त्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक असे विविध प्रकारचे त्रास असतात. त्या त्या विषयातील तज्ञ त्यांना प्रारब्ध इत्यादी ज्ञात नसल्याने लक्षणांनुसार आणि वरवरच्या कारणांनुसार सल्ला देतात. त्यामुळे लाभ व्हायचे प्रमाण बरेच अल्प असते. याउलट साधना केली की, चिरंतन आनंदाच्या, म्हणजे ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होते आणि आनुषंगिक लाभ म्हणून त्रासही दूर … Read more

खरी नाती !

संत आणि गुरु यांच्याशी असलेले नाते सगुणातील, तर ईश्‍वराशी असलेले नाते निर्गुणातील असते. ती खरी नाती होत. इतर सर्व नाती खोटी असतात. – प.पू. डॉ. आठवले (२७.६.२०१४) मुलांना खेळणी देऊन करमणूकप्रधान बनवणारे आधुनिक पालक मुलांवर नैतिक आणि धार्मिक संस्कार करण्यासाठी एकतरी प्रयत्न करतात का ? – प.पू. डॉ. आठवले (१८.२.२०१४) पुढे संत, गुरु, सद्गुरु, परात्पर … Read more

स्वतःच्या मृत्यूकडे ईश्‍वरेच्छा म्हणून पहाणारे प.पू. डॉक्टर !

ईश्‍वरेच्छा हा शब्द माझ्या मनावर एवढा बिंबला आहे की, ख्रिस्ताब्द २००५ या वर्षापासून आतापर्यंत कमीत कमी पाच वेेळा तरी मी मृत्यूच्या जवळ होतो. तेव्हाही मृत्यू टाळा, अशी संतांना प्रार्थना करावी, असे मला एकदाही वाटले नाही. – प.पू. डॉ. आठवले (२६.६.२०१४)

मानवाच्या देवावरील श्रद्धेपेक्षा माकडिणीच्या पिल्लाची तिच्यावर पूर्ण श्रद्धा असते !

माकडिणीच्या पिल्लाची तिच्यावर पूर्ण श्रद्धा असते; म्हणून माकडीण खूप उंचीवरून १०-१५ फूट अंतरावरील झाडांवरून, घरांवरून उड्या मारत जाते, तेव्हा तिच्या पोटाला घट्ट धरणार्‍या पिल्लाला भीती वाटत नाही. याउलट मानवाची देवावर श्रद्धा नसल्यामुळे तो देवाला घट्ट धरून ठेवत नाही. त्यामुळे तो देवाला सोडतो; म्हणून देव त्याला वर घेऊन जाऊ शकत नाही. – डॉ. आठवले (११.७.२०१४)

वेळ मिळेल तेव्हा कधीही नामजप करावा !

१५ ते २० वर्षांपूर्वी रात्री १२ ते ४ नामजप करू नये, असे सांगण्यात आले होते. त्यामागचे कारण होते, रात्री तमप्रधानता अधिक असल्याने, म्हणजेच तो काळ असुरांचा असल्याने त्या काळात नामजपावर लक्ष केंद्रीत करणे कठीण असते.   आता संपूर्ण दिवसच तमप्रधानता अधिक असल्याने, नामजपासाठी दिवस किंवा रात्र असा भेद उरलेला नाही; म्हणून वेळ मिळेल तेव्हा कधीही … Read more

कीर्तनकारांच्या कीर्तनाला आलेले साधनेला लागले, असे दिसून न येण्याचे कारण

बर्‍याच मंदिरांत आणि इतरत्र कीर्तनकारांची कीर्तने होतात; मात्र त्यांचा कीर्तनाला आलेल्यांवर परिणाम झाला आणि ते साधनेला लागले, असे आढळून येत नाही. याचे कारण हे की, बहुतेक कीर्तनकार जरी स्वतःला ह.भ.प., म्हणजे हरिभक्त परायण म्हणवत असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्यापैकी किती जण हरिभक्त परायण असतात ? भक्तीमुळे सर्वस्व सोडले, असे किती जण असतात ? फारच थोडे उलट … Read more

स्वेच्छेतून परेच्छेत जाता येण्यासाठी ईश्‍वरही परेच्छेने वागतो, हे लक्षात घ्या !

साधनेत स्वेच्छेतून परेच्छेत आणि परेच्छेतून ईश्‍वरेच्छेत जायचे असते. बर्‍याच साधकांना स्वेच्छेतून परेच्छेत जाणे कठीण जाते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ईश्‍वर सर्वत्र साक्षीभावाने पाहू शकत असतांनासुद्धा तो भक्ताची इच्छा पूर्ण करतो, म्हणजे परेच्छेने वागतो ! – प.पू. डॉ. आठवले