बुद्धीप्रामाण्यवादी आणि प.पू. डॉक्टर यांच्या दृष्टीकोनांतील मूलभूत भेद म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसणे आणि प.पू. डॉक्टरांना जिज्ञासा असणे

बरेच ज्योतिषी माझा मृत्यूयोग जवळ आल्याचे गेली १० वर्षे सांगत आहेत. काही ज्योतिषांना मी जिवंत आहे, हे पाहून आश्‍चर्य वाटते. हे ऐकल्यावर बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतील, बघा. आम्ही म्हणतो ना, ज्योतिषशास्त्र खोटे आहे, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले ! याउलट माझ्या मनात विचार येतो, माझा मृत्यूयोग असूनही मी गेली १० वर्षे जिवंत असण्याचे कारण काय ? जिज्ञासेमुळे … Read more

अधोगतीला नेणारे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, उच्छृंखलपणा !

शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागायला कोणी संमती देत नाही. गुन्हेगारांना गुन्हे करायला, रस्त्यावरून गाडी कशीही चालवायला व्यक्तीस्वातंत्र्य नसते. वैद्य नसलेल्याला औषधे द्यायला संमती नसते. याचा अर्थ हा की, समाजातील सर्वच क्षेत्रांत व्यक्तीस्वातंत्र्याला संमती नसते. असे असतांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात स्वेच्छेने कसेही वागायला संमती मागतांना कोणाला काहीच कसे वाटत नाही ? १. स्वेच्छेने, … Read more

हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी आणि हिंदु जनजागृती समितीशी जोडले जातात, यात आश्‍चर्य ते काय ?

रामनाथी आश्रमातील पारिजातकाच्या झाडाची फुले आश्रमाच्या दिशेला असलेल्या फांद्यांना अधिक प्रमाणात लागतात. आंब्यांच्या झाडाचेही तसेच आहे, आश्रमाच्या दिशेला असलेल्या फांद्यांना जास्त आंबे लागतात. फुले-फळेही आश्रमाच्या दिेशेने जास्त प्रमाणात येतात, तर हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी आणि हिंदु जनजागृती समितीशी जोडले जातात, यात आश्‍चर्य ते काय ? – (प.पू.)डॉ. आठवले (५.४.२०१४) रामनाथी आश्रमात आल्यावर तीर्थक्षेत्री गेल्याप्रमाणे लाभ होतो. … Read more

हिंदु राष्ट्राची स्थापना कोण करू शकतील ?

हिंदु राष्ट्राची स्थापना स्वार्थी राजकारणी नाही, तर सर्वस्वाचा त्याग करणारे राष्ट्र आणि धर्मप्रेमी, तसेच साधकच करू शकतील ! – (प.पू) डॉ. आठवले (७.५.२०१४) राजकारणी पैसा, पद देऊ, असे सांगतात, तर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सर्वस्वाचा त्याग करा, म्हणजे ईश्‍वरप्राप्ती होईल, असे सांगतात. – (प.पू) डॉ. आठवले (४.१२.२०१४)

अध्यात्मातील ज्ञानपूर्व आणि ज्ञानोत्तर लिखाण

ज्ञानपूर्व लिखाण ज्ञानोत्तर लिखाण १. लेखक सर्वसाधारण व्यक्ती संत २. स्तर बुद्धीचा बुद्धीपलीकडील ३. लिखाणाचा उगम ग्रंथांचा अभ्यास आणि चिंतन अंतःस्फूर्ती (विश्‍वबुद्धीकडून प्राप्त होणारे ज्ञान) ४. चैतन्याचे प्रमाण (टक्के) ० – २ लेखकाच्या आध्यात्मिक स्तरानुसार ५० – ७० ५. लिखाण टिकण्याचा अवधी ५ – ३० वर्षे शेकडो ते हजारो वर्षे – (प.पू.) डॉ. आठवले (२४.११.२०१४)

खर्‍या हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी एक-दोन पिढ्या लागणार असल्याचे कारण

मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात, हेच त्यांचे शिक्षण योग्य नसल्याचे एकमेव कारण नाही. घरी होणारी भांडणे, तसेच दैनिकांत आणि दूरचित्रवाहिन्यांवर येणार्‍या स्वैराचार, भ्रष्टाचार, जात्यंधता, अपहरण, बलात्कार, खून इत्यादी बातम्या यांमुळेही त्यांच्यावर अनिष्ट संस्कार होतात. पुढे अशा बातम्यांचे त्यांना काही वाटेनासे होते आणि काही काळानंतर त्यांच्यातील काहीजण या गोष्टी स्वतःही करू लागतात. मुलांवर अनिष्ट संस्कार होऊ … Read more

जशी वास्तू आपली नसून वास्तूदेवतेची असते, तसेच सर्व स्थानदेवता, ग्रामदेवता इत्यादी देवतांचे असते !

जिथे आपल्या देहावरच आपला ताबा नसतो, तेथे आपल्या वस्तू, वास्तू इत्यादींना आपले म्हणायचा आपल्याला काय अधिकार ? आपण ज्या वास्तूत रहातो, ती वास्तू आपल्याला आपली वाटते; पण ती वास्तू आपली नसून वास्तूदेवतेची असते; कारण त्या जागी आपण पुढे असू किंवा नसू, तरी देवता मात्र तेथेच असते. राजकारण्यांनाही वाटते, हा मतदारसंघ माझा. हे गाव माझे. हे … Read more

व्यष्टी साधनेसाठी गुरुमंत्र, समष्टी साधनेसाठी कालमहात्म्यानुसारचा जप आवश्यक

काही जणांना प्रश्‍न पडतो, आम्हाला गुरुमंत्र मिळालेला असतांना आम्ही कालमहात्म्यानुसारचा श्रीकृष्णाचा जप करायचा का ? याचे उत्तर आहे, गुरुमंत्र व्यष्टी साधनेसाठी आहे, तर समष्टी साधनेसाठी कालमहात्म्यानुसार श्रीकृष्णाचा जप वर्ष २०२३ पर्यंत आवश्यक आहे. वर्ष २०२४ पासून श्रीरामाचा जप आवश्यक असेल. गुरुमंत्र काळानुसार पालटत नाही, तर समष्टी साधनेसाठीचा जप कालमहात्म्यानुसार पालटतो. – (प.पू) डॉ. आठवले (२४.११.२०१४)

व्यष्टी आणि समष्टी साधनेतील भेद आणि समष्टी साधनेचे महत्त्व

१. ईश्‍वर सूक्ष्मातीसूक्ष्म आहे, तसाच सर्वव्यापीही आहे. त्यामुळे ईश्‍वरप्राप्तीचे, म्हणजे ईश्‍वराशी एकरूप होण्याचे सूक्ष्मातीसूक्ष्म होणे, म्हणजेच शून्यात जाणे किंवा सर्वव्यापी होणे, हे दोन मार्ग आहेत. सूक्ष्मातीसूक्ष्म होणे हा मार्ग व्यष्टी साधना करणार्‍यांचा असतो, तर समष्टीशी एकरूप होण्यासाठी आपली व्यापकता वाढवणे, हा मार्ग समष्टी साधना करणार्‍यांचा असतो. व्यष्टी साधना करता करता पुढे शून्यात जाऊन ईश्‍वराशी एकरूप … Read more

नामजप करतांना मन एकाग्र होण्यासाठी वापरावयाच्या पद्धती

" जप करतांना मन एकाग्र झाल्यासच त्याचा लाभ होतो. नामजप करतांना आरंभी मन एकाग्र होणे कठीण जाते; कारण पंचज्ञानेंद्रियांकडून मनाकडे येणार्‍या विविध संवेदना आणि चित्ताकडून मनामध्ये येणारे विविध विचार आणि भावना यांमुळे मन एकाग्र होत नाही. यावर मात करण्यासाठी पुढील उपाय करता येतात. टप्पा १ १ अ. पंचज्ञानेंद्रिये १. नाक : नामजपाच्या ठिकाणी दुर्गंध नसावा. … Read more