विज्ञानाचे मूल्य ‘शून्य’ !

मानवाला माणुसकी न शिकवणार्‍या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मनाला नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्व !

‘आपले मन नियंत्रणात न ठेवता, कह्यात न ठेवता, मानेल तसे भटकण्यास त्याला मोकळीक दिली, तर ते बेलगाम होईल. केवळ असमाधानीपणामुळे अशा व्यक्ती आपले आयुष्य वाया घालवतील. विषयसुखाभिलाषी अशा सुखोपभोगांनी अशा व्यक्तींना कधीही तृप्ती मिळणार नाही.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘ श्रीधर-संदेश’, ऑगस्ट १९९९)

दुष्कर्मी लोकांची मानसिकता !

‘दुष्कर्मी लोक दुराचारासाठी एकत्र आले, तरी त्यांचे मित्रत्व कामापुरतेच असते. थोडेसे जरी बिनसले, तरी ते एकमेकांचे शत्रू होतात, एवढ्यावरूनच न थांबता ते एकमेकांच्या विनाशाचीच इच्छा धरतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, मार्च २००३)

मनुष्याचे स्वातंत्र्य !

‘मनुष्याला स्वातंत्र्य असते, तर इच्छेप्रमाणे सारे होऊ शकले असते; पण तसे होत नाही. म्हणूनच त्याला ‘अस्वातंत्र्य’ म्हणावे लागते.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, ऑक्टोबर १९९८)

समाजात समता नांदावी, यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या गुणकर्मानुसार त्याला विषम अधिकार देणे अनिवार्य असणे !

‘समतेसाठी लढणार्‍या सैन्यात सेनापती, हाताखालचे निरनिराळे अधिकारी, चतुरंगसेना इत्यादी भेद (फरक) परस्पर अधिकार तारतम्यामुळे असतातच. ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार आज्ञाकारी, आज्ञाधारी हे भेद नाहीसे केल्यास कोणतेच राष्ट्र टिकणार नाही. कोणत्याही खात्यात, न्यायालयात उच्च-नीच भेद, अधिकार – तारतम्य आणि अल्प-अधिक कार्यक्षमता असतेच. सर्व भेदांचे निर्मूलन करण्यासाठी भरलेल्या सभेतही, स्थापलेल्या समाजातही, समतेचा उदो उदो करणार्‍या राष्ट्रातही अध्यक्ष, उपाध्यक्ष … Read more

बोलल्याप्रमाणे चालणारी माणसे हवीत !

‘आज बोलल्याप्रमाणे चालणारी माणसे हवी आहेत. नुसते बोलून भागणार नाही. पाकशास्त्राचे नुसते तोंडाने वर्णन केल्यास त्याने पोट भरेल का ? त्यासाठी स्वयंपाक करून जेवण केल्यानेच पोट भरणार आहे. म्हणूनच मनुष्याने बोलल्याप्रमाणे वागणेच योग्य होय.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर – संदेश’, फेब्रुवारी २००३)

विरक्ताने जीभ आवरावी !

‘जन्म झाल्यापासून कितीही खाल्ले असले, तरी ‘खायला हे पाहिजे, ते पाहिजे’ म्हणून कटकट करणारी जीभ कधी गप्प बसली आहे, असे नाही. हे झाले सज्जन गृहस्थाचे. ज्यांना स्त्रियांचे आणि उपाहारगृहातील चटकदार पदार्थांचे व्यसनच लागले आहे. त्यांना कुबेराची संपत्तीही अल्पच पडेल. एकंदरीत पैशाचा विनियोग प्रायः एक स्त्री आणि दुसरी जीभ, या दोघींचा हट्ट पूर्ण करण्याकडेच होत असल्यामुळे … Read more

भारत भूमीची महानता !

‘भारत भूमीत जन्माला येणार्‍या प्राणीमात्रांनाही जे भाग्य लाभले आहे, ते पाश्‍चात्त्य देशांतील अधिनायकांनाही लाभलेले नाही.’ – प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय वर्षीय धर्मसंघ

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

१. पशूला द्रव्याचा लोभ नसतो; परंतु हाच द्रव्यलोभ माणसाला पशू बनवतो. २. ‘मी देह नाही’ हे म्हणण्यापेक्षा ‘मी आत्मा आहे’ हे म्हणण्यामुळे ‘नाहमकर्ताची’ जाणीव होऊन नरदेहाचे सार्थक होते. ३. आज आपल्या देशाची उन्नती करण्याकरता सुसंस्कृत माणसांची आवश्यकता आहे. केवळ सुशिक्षित असणे व्यर्थ आहे. (संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)

महिलांना मान देण्याविषयी मनुस्मृतीतील श्लोक

सुवासिनी: कुमारीश्‍च रोगिणो गर्भिणीः स्त्रियः । अतिथिभ्योऽग्र एवैतान् भोजयेदविचारयन् ॥ – मनुस्मृति, अध्याय ३, श्‍लोक ११४ अर्थ : सुवासिनी, कुमारिका, रोगी आणि गर्भवती स्त्रिया यांना अतिथीच्याही आधी भोजन द्यावे.