व्यक्तीस्वातंत्र्यामुळे होणारी हानी

१. व्यक्तीस्वातंत्र्यामुळे व्यक्तीची (व्यष्टीची) होणारी धूळधाण ! : व्यक्तीस्वातंत्र्यामुळे सुखलोलुपता, स्वैराचार इत्यादी सर्व वाढतात आणि इच्छा पूर्ण न झाल्यामुळे व्यक्ती अधिकाधिक दुःखी होते. याउलट सर्वस्वाचा त्याग आणि साधना करणार्‍यांना तात्कालिक सुख नाही, तर चिरंतन आनंदाची, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होते.


२. व्यक्तीस्वातंत्र्यामुळे राष्ट्राची (समष्टीची) झालेली वाताहत ! :
व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र मोठे, हे न शिकवल्याने राष्ट्र रसातळाला गेले आहे. राष्ट्र टिकले, तरच समाज टिकतो आणि समाज टिकला, तरच व्यक्ती टिकते. हेही ज्ञात नसणारे राज्यकर्ते असलेला देश स्वैराचाराने नष्ट होणार आहे. हे टाळण्यासाठी व्यक्तीपेक्षा समाजाचा आणि समाजापेक्षा राष्ट्राचा विचार करणारे हिंदु राष्ट्र स्थापणे अत्यावश्यक आहे. – डॉ. आठवले (४.३.२०१४)

Leave a Comment