स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया संबंधित व्यक्ती अन् तिच्या संपर्कात येणा-यांनाही आनंद देणारी असते !

‘व्यक्तीमधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक अशा विविध स्तरांवर हानी सहन करावी लागते. ही हानी त्याच्यापुरतीच मर्यादित न रहाता तिचे दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या संपर्कात येणार्‍यांनाही सहन करावे लागतात. त्यामुळे त्या व्यक्तीने स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास त्याचा लाभ केवळ त्या व्यक्तीपुरताच मर्यादित न रहाता तिच्या संपर्कात येणार्‍यांनाही होतो. त्याचप्रमाणे … Read more

जीवनातील विविध समस्यांवर उपवास, तीर्थयात्रा नव्हे, तर ‘साधना’ हाच खरा उपाय !

‘द्वापर आणि त्रेता युगांत सर्वसामान्य व्यक्तीही सात्त्विक होती. त्या काळात आयुष्यमानही अधिक होते. त्यामुळे जीवनातील शारीरिक, मानसिक, आर्थिक यांसारख्या समस्यांसाठी उपवास, तीर्थयात्रा यांसारख्या कर्मकांडाच्या स्तरावरील उपायांसाठी वेळ देणे त्यांना शक्य होते. त्यातून त्यांच्या अडचणी सुटतही होत्या. अडचणी सुटल्या की, उरलेला वेळ साधनेला देणे शक्य होते. सध्या कलियुगात मनुष्य रज-तम प्रधान आहे आणि त्याचे आयुमानही अल्प … Read more

‘स्वार्थी’पणाच्या संदर्भात व्यष्टी साधनेतील धोका आणि समष्टी साधनेचा लाभ !

‘व्यष्टी साधना करणार्‍या साधकाची साधना ‘माझी साधना कशी होईल ? माझी साधना होण्यासाठी मी अजून काय करू ?’, या प्रमुख विचारांच्या आधारे चालू असते. यामध्ये केवळ स्वतःच्याच साधनेचा विचार प्राधान्याने केला जातो. या विचारानुसार साधना करणार्‍या काही साधकांच्या विचारांचे रूपांतर पुढे स्वतःच्याच विचारांत गुरफटून ‘स्वार्थीपणा’मध्ये होण्याची शक्यता अधिक असते. याउलट समष्टी साधना करणार्‍या साधकाची साधना … Read more

संकटसमयी रक्षण होण्यासाठी साधना करणे आवश्यक !

‘कोणत्याही संकटाच्या वेळी, उदा. येणार्‍या आपत्काळात साधना न करणार्‍या केवळ ‘जन्महिंदूंना, अगदी कुटुंबीय किंवा नातेवाईक यांनाही देव वाचवील’, अशी आशा करू नका. ‘नमे भक्तः प्रणश्यति ।’ या वचनाप्रमाणे राष्ट्र-धर्म यांसाठी काही करणारे किंवा साधना करणारे यांनाच देव वाचवील.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

वेदनेचे लाभ !

‘वेदना झाल्या की, प्रत्येकालाच त्रास होतो आणि ‘त्या कधी थांबतील’, असे वाटते. प्रत्यक्षात वेदनेमुळे फार लाभही होतो. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत. १. एखाद्याच्या पायाचा अस्थिभंग झाला असेल आणि ते विसरून तो चालायला लागला, तर त्याला पुष्कळ वेदना होतात. प्रत्यक्षात वेदना त्याला अस्थिभंगाची जाणीव करून देतात. त्यामुळे तो चालायचा थांबतो. २. एखाद्याला जठरव्रण (अल्सर) … Read more

साधनेत फळाची अपेक्षा न ठेवण्याचे कारण !

‘गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असतांना शिष्याचा सर्व भार गुरूंनी उचललेला असतो. गुरु त्याला त्याच्या मागच्या जन्मीची साधना, त्याचे प्रारब्ध, देवाणघेवाण हिशोब, साधना करण्याची क्षमता, वाईट शक्तींचा त्रास यांसारख्या विविध घटकांचा विचार करून साधना शिकवतात. हे सर्व घटक त्या साधकासाठी त्याच्या वैयक्तिक कर्जाप्रमाणे असतात. तो करत असलेली साधना, त्याचे हे ‘कर्ज’ फेडण्यासाठी वापरली जाते. यात महत्त्वाचे … Read more

सर्व पंथ देवाचेच आहेत

‘मी ‘या’ पंथाचा आहे, तो ‘त्या’ पंथाचा आहे, असे म्हणून थांबू नका, तर ‘सर्व पंथ देवाचेच आहेत’, हे लक्षात घेऊन व्यापक व्हा, म्हणजे देवाच्या जवळ जाल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

ज्योतिषशास्त्राचे महत्त्व !

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्‍चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

…तरच भारत महासत्ता बनू शकेल !

‘१९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्‍या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले