अध्यात्मात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हा सिद्धांत आहे

अध्यात्मात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हा सिद्धांत असल्यामुळे सनातन संस्थेमध्ये प्रत्येकाला त्याच्या आवश्यकतेनुसार साधना सांगितली जाते. वैद्य ज्याप्रमाणे प्रत्येक रुग्णाला त्याच्या आवश्यकतेनुसार उपचार सांगतात, त्याप्रमाणे हे आहे.’

ईश्वरप्राप्तीसाठी गुरूंनी सांगितलेला जप करत असतांना काही आध्यात्मिक अडचणी आल्यास त्या दूर करण्यासाठी इतर संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपायही करावेत

‘एखादा रुग्ण मोठ्या आजारासाठी आधुनिक वैद्यांनी सांगितलेली औषधे घेत असला, तरी इतर आजार झाल्यावर तो इतर औषधेही घेतोच. तसेच गुरूंनी सांगितलेला जप त्यांचा शिष्य ईश्‍वरप्राप्तीसाठी करत असला, तरी जीवनात मोठ्या आध्यात्मिक अडचणी आल्यास त्या दूर करण्यासाठी गुरूंना संपर्क होऊ शकत नसल्यास इतर संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपायही करावेत.’

भारताला ‘मागासलेला’ म्हणणे, यापेक्षा अधिक मूर्खपणा जगात कुठे सापडेल का ?

‘भारत सोडून इतर देशांतील पूर्वजांनी एकाही शोध लावलेला नाही. आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी जन्मापूर्वीचे आणि नंतरचे जीवन, अनेक युगे, सप्तलोक आणि सप्तपाताळ इत्यादी सर्वच विषयांवरील सर्व माहिती लिहून ठेवली आहे. एवढेच नव्हे, तर जन्म-मृत्यूंच्या फेर्‍यांतून मुक्त कसे व्हायचे, ईश्‍वरप्राप्ती कशी करायची, या सर्वांबद्दलचे ज्ञानही लिहून ठेवले आहे. आपल्याला फक्त अभ्यास करून ते समजून घ्यायचे आहे. भारताची … Read more

क्षात्रतेजापेक्षा साधनेचे ब्राह्मतेज महत्त्वाचे !

‘एखाद्या सात्त्विक राजाचे चरित्र वाचून थोडा वेळ उत्साह वाटतो; पण ऋषिमुनींचे चरित्र आणि शिकवण वाचून अधिक काळ उत्साह वाटतो अन् साधनेला दिशा मिळते !’

संकटसमयी आपल्याला साधनेच्या साठ्याचेच साहाय्य होते.

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

वक्त्याचे बोलणे आत्मविश्‍वासपूर्वक असण्याचे महत्त्व

‘संवादातून सुसंवाद साधण्याच्या हातोटीवर पुष्कळ लोकांनी जीवनात यश मिळवले आहे. अनेकांना विषयाचे भरपूर ज्ञान असूनही इतरांवर तेवढा प्रभाव पाडता येत नाही. उलट अधिक ज्ञान नसूनही काही लोक उत्तम प्रभाव पाडू शकतात. याला कारण म्हणजे ‘संभाषणचातुर्य’. जो आपले विचार प्रभावीपणे मांडू शकतो, तोच लोकांची हृदये जिंकू शकतो. आत्मविश्‍वासपूर्वक केलेले छोटेसे संभाषणसुद्धा प्रभावी होऊ शकते. आपले प्रेमळ, … Read more

परिपूर्ण अध्यात्मशास्त्र आणि बाल्यावस्थेतील विज्ञान !

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषि-मुनींनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतात कुणी काही पालट करू शकत नाही; कारण त्यांनी चिरंतन सत्य सांगितले आहे. त्यामुळे त्यात ‘संशोधन’ असे काही नसते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या विज्ञानात ‘संशोधन’ सतत करावे लागते; कारण त्यांचे सिद्धांत काही वर्षांनी पालटत असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भक्त भगवान होतो कि दोघे विभक्तच रहातात ?

‘भक्ती हा अहंकार तोडण्याचा विधी, अभ्यास आहे; परंतु भक्तीमार्गांत द्वैत ठेवण्याची प्रथा आहे म्हणजे ‘भक्त नेहमी परमेश्‍वराच्या पायाशीच शरण असला पाहिजे’, असे सांगतात. याचे कारण अज्ञानी भक्ताला सांगितले की, तू भगवानच आहेस, तर त्याचा अहंकार वाढेल. प्रत्यक्षात मात्र भक्त भगवान होतो. भक्त असतांना तो अव्यक्त भगवानच असतो; परंतु भक्ताला ‘तू भगवान होऊच शकत नाहीस’, अशी … Read more