सनातनच्या आश्रमांची अद्वितीयता !
‘समाजात, कार्यालयात आणि इतरत्र अहंकार, खोटे बोलणे, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींचे अनुकरण केले जाते, तर सनातनच्या आश्रमांत चांगल्या गुणांचे अनुकरण केले जाते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘समाजात, कार्यालयात आणि इतरत्र अहंकार, खोटे बोलणे, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींचे अनुकरण केले जाते, तर सनातनच्या आश्रमांत चांगल्या गुणांचे अनुकरण केले जाते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
विज्ञानाच्या साहाय्याने बाळाला काचेच्या पेटीत (इन्क्युबेटरमध्ये) जिवंत ठेवता येऊ शकते; परंतु संपूर्ण विश्वात विज्ञानाला आजपर्यंत अशी एकही काचेची पेटी (इन्क्युबेटर) बनवता आली नाही की, ज्यामध्ये आईच्या गर्भातील माया, संस्कार आणि प्रेम त्या बाळाला देता येईल.’ – श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
स्त्रियांमध्ये भाव असल्याने साधनेतील प्राथमिक टप्प्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची प्रगती लवकर होते. नंतर पुरुष लवकर संत होतांना दिसून येतात; कारण स्त्रियांपेक्षा पुरुष मायेत अल्प प्रमाणात अडकलेले असतात. स्त्रीला तिचा नवरा, मुले-बाळे, नातवंडे या सर्वांविषयीचे विचार मायेत अडकवतात. त्यामुळे तिचा अध्यात्मात पुढे जाण्याचा वेग काही ठराविक टप्प्यानंतर मंदावतो; म्हणून अध्यात्मात स्त्रिया संत होण्याची संख्या त्यामानाने अल्प असते. … Read more
‘आतापर्यंत जगत आलेले मायेतील आयुष्य संपवून, सर्वसंगपरित्याग करून अध्यात्माच्या मार्गाने जातांना सतत दुसर्यांना आनंद देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच साधनेत प्रगती होते. दुसर्यांना आनंद देता देता आपल्याला गुरुकृपेने केव्हा ‘सत्-चित्-आनंदाची अनुभूती येऊ लागते’, ते कळतही नाही. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१९.४.२०२०)
‘एका भक्ताने ३० वर्षांत १३ कोटी रामनामाचा जप केला, तरी त्याला श्रीरामाचे दर्शन झाले नाही कारण त्याने जीवनात आलेली संकटे दूर होण्यासाठी देवाला प्रार्थना केल्याने ती दूर करण्यासाठी त्याचा जप खर्च झाला आणि त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी जप करूनही त्याला ईश्वरप्राप्ती झाली नाही. यातून हे शिकायला मिळते की, सकाम प्रार्थना स्वेच्छेच्या अंतर्गत येत असल्याने ती केली की, … Read more
‘सध्या अनेक संत आणि संप्रदाय त्यांच्या भक्तांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी भजन, कीर्तन, नामजप, ध्यान यांसारख्या विविध साधना शिकवतात. यातून केवळ साधना करणार्या व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होते. ती व्यष्टी साधना होते. सध्याच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांवर सर्व बाजूंनी आक्रमण होत असतांना ‘मी आणि माझी साधना’ या कोषात राहिलो, तर धर्म आणि राष्ट्र यांचा नाश होईल. … Read more
‘मतदानात हिंदू जो पैसे देतो, त्याला किंवा दोन उमेदवारांतील कमी वाईट असेल (Lesser of the two evils), त्याला मत देतात; कारण बहुदा चांगले उमेदवार कुठे नसतातच !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बाहेरची रंगभूषा (मेक-अप) इतरांना आकर्षित करते, तर आतील रंगभूषा (मेक-अप), म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून देवाला आकर्षित करते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून सतत कृतज्ञता व्यक्त करावी. कृतज्ञता व्यक्त केल्याने ‘भगवंतच सर्वकाही करत आहे’, हा संस्कार अंतर्मनावर होऊन अहंभाव अल्प होण्यास साहाय्य होते.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)
‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले