खरा विकास कशाला म्हणतात, हेही माहित नसलेले राजकारणी !

निवडणुका आल्या की, सर्वच राजकीय पक्ष अन्न, पाणी, शिक्षण, घर इत्यादींसंदर्भात मोठमोठी आश्‍वासने देतात आणि विकास करू या शब्दाचा भूलभुलैया दाखवतात. सर्वसामान्य जनताच नाही, तर सुशिक्षितही त्याला भुलतात. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ६६ वर्षांत जनता देशोधडीला गेली आहे. जनतेला भौतिक, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा सर्व तर्‍हेच्या समस्या भेडसावत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जनतेला साधनेला लावले असते, … Read more

साधनेतील कठीणता

म्हातारपणी किंवा थकवा आल्यावर पाऊल उचलून उंबरठ्यावरून पुढे जाणे कठीण होते (हे मी अनुभवतो.), तर एकेका लोकात पावले टाकून पुढच्या पुढच्या लोकांत जाऊन सप्तलोकांच्या पलिकडे, म्हणजे निर्गुणात जाणे किती कठीण असेल ! – डॉ. आठवले (चैत्र शुक्ल पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११५ (२३.४.२०१३))

कुठे पाश्‍चात्त्य विवाह तर कुठे हिंदू विवाह !

१. पाश्‍चात्त्य विवाह : हा केवळ शारीरिक स्तरावरचा असतो; म्हणून त्यामुळे पती-पत्नीला एकमेकाचा मानसिक आधार मिळत नाही. त्यामुळे मनावर ताण येऊन त्यांना मनोविकारतज्ञांकडे जावे लागते. २. हिंदु विवाह : हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर आधार देणारा आहे. आध्यात्मिक स्तरावर दोघांनी एकमेकांना साहाय्य करून सप्तलोक पार करून मोक्षाला जायचे असते. यासाठीच सप्तपदी असते.- … Read more

कधी साध्या गोष्टीही लक्षात न येणे

गेले ४ – ५ महिने मी तोंडाला अतिशय कोरड पडते, या त्रासासाठी डॉक्टर आणि वैद्य यांचे उपाय केले. तेव्हा लिमलेटच्या गोळ्या चघळायचो; पण फरक पडला नाही. कोरड पडते तेव्हा पाणी प्यायला हवे, हे लक्षात यायचे नाही. काल ते लक्षात आले आणि पाणी अधिक प्रमाणात प्यायला लागलो. तेव्हापासून तोंडाला कोरड पडणे कमी झाले. – डॉ. आठवले … Read more

व्यक्तीस्वातंत्र्यामुळे होणारी हानी

१. व्यक्तीस्वातंत्र्यामुळे व्यक्तीची (व्यष्टीची) होणारी धूळधाण ! : व्यक्तीस्वातंत्र्यामुळे सुखलोलुपता, स्वैराचार इत्यादी सर्व वाढतात आणि इच्छा पूर्ण न झाल्यामुळे व्यक्ती अधिकाधिक दुःखी होते. याउलट सर्वस्वाचा त्याग आणि साधना करणार्‍यांना तात्कालिक सुख नाही, तर चिरंतन आनंदाची, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होते. २. व्यक्तीस्वातंत्र्यामुळे राष्ट्राची (समष्टीची) झालेली वाताहत ! : व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र मोठे, हे न … Read more

सौंदर्य वर्धनालयात (ब्युटीपार्लरमध्ये) जाणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

१. सौंदर्य वर्धनालयात जाणे म्हणजे स्थूलदेहात अडकणे आणि दुसर्‍यांनी आपल्याला सुंदर म्हणावे, अशी बहिर्मुखता निर्माण होणे २. मनोरुग्ण स्थूलदेहात अडकू नयेत; म्हणून मी माझ्या चिकित्सालयात Beautiparlour for Mind म्हणजे मनाचे सौंदर्य वर्धनालय असा फलक लावला होता. ३. उपचारामुळे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन झाले की, व्यक्तीचे स्वतःच्या चेहर्‍याकडे विशेष लक्ष जात नाही. ४. भावामुळे सौंदर्य … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, स्वतःचा अहं वाढू देऊ नका !

अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना अहंभाव नसतो. त्यामुळे त्यांची बुद्धी विश्‍वबुद्धीशी एकरूप होऊन त्यांना स्थूल आणि सूक्ष्म, म्हणजे पंचज्ञानेंद्रियांना समजणारे आणि त्यांच्या पलिकडील अशा दोन्ही प्रकारचे ज्ञान होते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मला सर्व कळते हा अहंभाव असतो. त्यामुळे त्यांना एका विषयाचेही परिपूर्ण ज्ञान नसते. या अहंभावामुळेच त्यांची अधोगती होते. – डॉ. आठवले (३१.८.२०१३)

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, स्वतःचे हसे करून घेऊ नका !

एखाद्या वैद्याने संगणकाबद्दल किंवा भूगर्भशास्त्राबद्दल बोलणे किंवा जमिनीने हिमालयाची उंची मोजणे जसे हास्यास्पद होईल, तसेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी अध्यात्माबद्दल बोलणे हास्यास्पद होते ! – डॉ. आठवले (३१.८.२०१३)

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, अध्यात्मात बुद्धीला महत्त्व नाही, तर बुद्धीलयाला महत्त्व आहे, हे प्राथमिक तत्त्व समजून घ्या !

बुद्धीप्रामाण्यवादी बालवाडी किंवा प्राथमिक शाळेत प्रवेश देतांना वय पहातात. अध्यात्मात वयानुसार नाही, तर पात्रतेनुसार शिक्षण मिळते, उदा कु. वैभवी भोवर (वय १६ वर्षे), सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (वय ५१ वर्षे) आणि डॉ. अजय जोशी (वय ५८ वर्षे) हे आज एकाच दिवशी ६१ टक्के पातळीचे झाले. एवढेच नव्हे, तर शाळेत कधीही न गेलेला अन् शारीरिकदृष्ट्या अपंग … Read more

शांतीच्या लहरी संदर्भात स्पष्टीकरण

सनातनच्या ग्रंथांतील सूक्ष्म-परिक्षणात काही ठिकाणी शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो. शांती निर्गुणाशी संबंधित असतांना शांतीच्या लहरी कशा असतील ?, असे काही जणांना वाटते. ते योग्यही आहे. प्रत्यक्षात निर्गुणाच्या स्थितीला गेल्यावर, म्हणजे अद्वैतात गेल्यावर शांतीची अनुभूती आली, असे सांगणाराही उरत नाही. शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो, तो ३० टक्क्यांहून अधिक शांती अनुभवणार्‍या साधकांना आलेला अनुभव असतो. … Read more