भीक आणि भिक्षा यांमधील भेद

१. भिक्षा मागण्याचे लाभ : सनातन धर्मात ब्रह्मचारी आणि संन्यासी यांनी काही ठराविक घरांतून भिक्षा मागून अन्न खावे, असे सांगितले आहे. २. ब्रह्मचर्याश्रम : गुरुकुलात रहाणारी काही मुले श्रीमंत घरांतील असतात आणि त्यांचे पालक त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकतात; पण राजा असो वा रंक प्रत्येकाने भिक्षा, म्हणजेच माधुकरी मागून पोट भरावे, असा गुरुकुलाचा नियम असल्यामुळेे … Read more

अध्यात्माचे अर्धवट ज्ञान असल्यास होणारी हानी

१९४२ या वर्षी देशाची स्थिती पहावली नाही; म्हणून साधना करणारे एकजण क्रांतीकारक बनले. ते पकडले गेल्यावर पोलिसांनी सहकाऱ्यांची नावे विचारली. तेव्हा अध्यात्माचा अर्धवट अभ्यास झाल्याने, म्हणजे ‘सत्यं ब्रूयात् (सत्य बोलावे)’ एवढेच माहित असल्याने त्यांनी सत्य सांगितले, म्हणजे त्यांच्या बरोबरच्या इतर क्रांतीकारकांची नावे सांगितली. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्या सहकाऱ्यांनाही फासावर लटकवले. त्यांनी अध्यात्माचा पूर्ण अभ्यास केला असता, … Read more

अर्जुनाप्रमाणे स्थिती झालेले बहुसंख्य हिंदू

भगवान श्रीकृष्णाने गीतेत (अध्याय २, श्‍लोक ११) अर्जुनाला सांगितले, अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्‍च भाषसे । म्हणजे हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. अर्जुनाप्रमाणे हल्ली बहुतेक हिंदूंची स्थिती झाली आहे. काही कृती करण्याऐवजी ते मोठमोठे युक्तिवाद करतात आणि त्याला मोठेपणा समजतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

मानसिकपेक्षा आध्यात्मिक स्तरावरच्या वक्त्यांच्या भाषणाचा परिणाम अधिक होणे, तो अधिक काळ टिकणे आणि म्हणूनच धर्मकार्य करणार्‍यांनी साधना करणे आवश्यक !

१. मानसिक (भावनिक) स्तरावरच्या वक्त्यांचे भाषण : याचा परिणाम तात्कालिक असतोे. सभा संपून श्रोते परतले की, सभेतील भाषण ते थोड्याच वेळात विसरतात. त्यामुळे कार्यासाठी कार्यकर्ते तयार झाले, असे अल्प वेळा दिसून येते. याचे उदाहरण म्हणजे राजकारण्यांच्या सभांना हजारो, लाखोंची उपस्थिती असली, तरी त्यांतील फारच थोडे त्यांच्या कार्यात सहभागी होतात. २. आध्यात्मिक स्तरावरच्या वक्त्यांचे भाषण : … Read more

अभ्यासू वृत्ती नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी !

मी संमोहन उपचारतज्ञ म्हणून २५ वर्षे व्यवसाय केला. संमोहन उपचारशास्त्र मानसोपचाराच्या अंतर्गत येते. या उपचाराच्या पद्धतीत संशोधन केल्यामुळे माझे विदेशांत कौतुक झाले. मला अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून व्याख्यान देण्यासाठी निमंत्रणही आले होते. अशी पार्श्‍वभूमी असतांनाही मी बरे करू शकत नसलेले रुग्ण संतांच्या उपचारांनी बरे होतात, हे मी अनुभवले. नंतर मी संतांकडून त्यांची उपचारपद्धत शिकण्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे … Read more

सिंहाने प्राणी किंवा माणसाला मारणे आणि मनुष्याने प्राणीहत्या करणे यांतील भेद

कोणत्याही कर्मामागील हेतू काय असेल, त्यानुसार फळ मिळते. सिंहाला ज्या वेळी भूक लागते, त्या वेळी तो प्राण्यांना मारून पोट भरतो. तो माणसालाही मारू शकतो. ही नैसर्गिक क्रिया असल्याने येथे पाप-पुण्याचा प्रश्न येत नाही. मनुष्य स्वतःला शिकारीचे आणि मांस खाण्याचे सुख मिळावे; म्हणून तो प्राण्यांची हत्या करतो. तसेच द्वेष, लोभ, मत्सर, सूड घेणे इत्यादींसाठी एक मनुष्य … Read more

सनातन हिंदु संस्कृतीचा विध्वंस करणारे नेहरू चाचा

हिंदु विवाहपद्धती म्हणजे वेश्यावृत्ती आहे, (Hindu marriage is a prostitution.) असे सुभद्रा जोशी या सदस्या विदुषीने संसदभवनामध्ये सर्वांसमोर सांगितले. नेहरू आदींनी त्याला संमती दिली. नेहरूंच्या दहशतीमुळे संसदेमध्ये कुणी काहीही बोलले नाही, विरोध केला नाही. हिंदु कोड बिल संमत झाले ! आपण ईश्वरासारखे सत्ताधीश असल्याचा बेगुमान उन्माद असलेल्या नेहरूंनी हिंदु कोड बिल संमत करून घेतले ! … Read more

खरा आनंद

आनंद हा कोणताही प्रसंग, वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी निगडीत नसावा. ज्या गोष्टीमुळे दुःख होते वा होईल, असा कोणताही आनंद नसावा. आपला आनंद आपल्यात मिळावा, हा विचार प्रत्येकाने सांभाळून ठेवावा, म्हणजे कोणत्याही अवस्थेत शांती ढळणार नाही. तुझे आहे तुजपाशी या संतवाणीप्रमाणे ज्याचा त्याने शोध घेत जावा. मनाची स्थिती केवळ स्वतःशीच निगडीत असावी. अन्य कुठेही संपर्क नसावा. … Read more

कोणालाही न्याय मिळणार नाही, अशी ब्रिटिशांची न्यायदान पद्धत !

स्वार्थाकरता ब्रिटिशांनी मेकॉलेची सदोष शिक्षणपद्धती रूजवली नव्हे, तर ब्रिटिशांची न्यायदान पद्धतीही रुजवली, जिच्यापासून न्याय मिळणे शक्य नव्हते. दुर्दैवाने स्वातंत्र्याची सहा दशके उलटून गेली, तरी तीच न्यायसंस्था आजही भारतात अस्तित्वात आहे. आम्ही न्यायाची अपेक्षा कशी करावी ? याचा विचार आमचा उत्तम (elite) वर्ग का करीत नाही ? गेल्या २५-३० वर्षात भारतात कोणती चांगली घटना घडली आहे … Read more

राज्यकर्त्यांनो, हे लक्षात घ्या ! षड्रिपुंमुळे नष्ट झालेले अनेक राजे, तर जितेंद्रिय असल्याने संपूर्ण पृथ्वी आपल्या नियंत्रणात ठेवणारा परशुराम

अनेक राजे इंद्रियांचे दास बनूनच नष्ट झाले आहेत. रावण आणि कीचक स्त्री वासनेने नष्ट झाले. दुर्योधन मत्सराने समाप्त झाला. शिशुपाल क्रोधाने. प्रजेवर प्रचंड कर लादणारा अभिजित राजा लोभाने नष्ट झाला. जितेंद्रिय परशुरामाने संपूर्ण पृथ्वी आपल्या नियंत्रणात ठेवली. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, ऑक्टोबर २०१०)