योगासनातून ॐ आणि सूर्यनमस्कार काढणार्‍या आणि चुकीची शिकवण देणार्‍या धर्मद्रोह्यांनो, हे लक्षात घ्या !

योगासनातून ॐ आणि सूर्यनमस्कार काढणारे ऋषीमुनींपेक्षा स्वतःला शहाणे समजतात का ? योगासने केवळ शारीरिक व्यायाम नसून आध्यात्मिक व्यायाम आहेत. मानसिक स्तरावर कार्य करणार्‍या धर्मद्रोह्यांचे कार्य आणि नाव काही वर्षांतच कोणाच्या लक्षात रहात नाही. याउलट ऋषींनी सांगितलेले अनंत काळापर्यंत अस्तित्वात रहाते; कारण त्यांच्यामध्ये ॐ ची निर्गुणाची शक्ती आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म कार्य करतांना संतांनाच विचारूनच कार्य करा !

आपण वैयक्तिक जीवनात विविध प्रसंगांत योग्य निर्णय कोणता हे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, वैद्य, अधिवक्ता, लेखा परिक्षक इत्यादींना विचारून घेतो. तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कार्य करण्याच्या वेळी राष्ट्र आणि धर्म प्रेमी संतांनाच विचारून तशी कृती केली पाहिजे. असे केले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कोणता जप करावा ?

१. व्यष्टी साधना : व्यष्टी साधनेला प्रारंभ करतांना कुलदेवतेचा (म्हणजे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असल्यास कुलदेवीचा आणि त्यांपैकी एक असल्यास त्याचा किंवा तिचा), ती ज्ञात नसल्यास श्री कुलदेवतायै नमः ।, असा नामजप करावा. त्याच्याच जोडीला बहुतेक सर्वांनाच पूर्वजांचा त्रास असल्यामुळे श्री गुरुदेव दत्त । हा जपही करावा. गुरुमंत्र मिळाला असल्यास या दोन जपांऐवजी गुरुमंत्राचा जप … Read more

९० टक्क्यांच्या पुढे अद्वैत निर्माण होत असल्याने वासनेचे विचार नष्ट होणे

जोपर्यंत मी आणि अन्य कोणीतरी असे द्वैत आहे, तोपर्यंत वासनेचे विचार येतात. कोणाशीतरी एकरूप व्हायचे आहे, असे वाटत असते; पण ९० टक्क्यांच्या पुढे द्वैत अल्प होऊ लागतेे. मी आणि अन्य कोणी हा भेद रहात नाही. त्यामुळे आपण सर्वजण एकच आहोत, असे वाटत असल्याने वासना रहात नाहीत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंनो, कार्यक्षेत्र निरनिराळे असले, तरी सर्व कृतीशील हिंदूंना आपले समजा !

हिंदूंच्या विविध बैठकांत आणि अधिवेशनांत निरनिराळ्या धर्माभिमान्यांशी बोलतांना लक्षात येते की, प्रत्येकाला गोरक्षण, श्रीराम मंदिर, धर्मशिक्षण, हिंदू संघटन, स्वसंरक्षण प्रशिक्षण इत्यादींपैकी एखादा विषय त्यांच्या प्रकृतीनुसार महत्त्वाचा वाटतो. त्याला त्यासंदर्भातच कार्य करणे महत्त्वाचे वाटते. त्यामुळे काही जणांना त्याच्यात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासंदर्भात प्राधान्य नाही, असे वाटते. येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, प्रत्येक विषयच महत्त्वाचा … Read more

व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय आणि धर्मासंबंधीच्या सर्व प्रश्‍नांकडे मानसिक आणि बौद्धिक…

व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय आणि धर्मासंबंधीच्या सर्व प्रश्‍नांकडे मानसिक आणि बौद्धिक नव्हे, तर आध्यात्मिक दृष्टीने पहायला शिका, तरच कार्यकारणभाव आणि उपाय लक्षात येतील आणि यश मिळेल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले पेट्रोलशिवाय गाडी चालत नाही. तसे आध्यात्मिक बळाशिवाय हिंदु राष्ट्राची स्थापना अशक्य ! यासाठी साधना करा ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भक्तांच्या आध्यात्मिक प्रगतीला नाही, तर आश्रम आणि मंदिरे यांच्या संख्येला महत्त्व देणारे संत !

बरेच संत आमचे बर्‍याच ठिकाणी आश्रम आणि मंदिरे आहेत, असे अभिमानाने सांगतात. त्यांना विचारले, भक्तांपैकी किती जण साधक आहेत आणि किती जण संत झाले ?, तर त्यांच्याकडे उत्तर नसते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधनेला घरच्यांनी विरोध करण्याचे कारण

समानशीलव्यसनेषु सख्यम् ।, म्हणजे ज्यांच्यात स्वभाव आणि सवयी जुळतात, त्यांच्यात मैत्री होते. यामुळे दारू पिणार्‍याला दारू पिणाराच आवडतो. त्याप्रमाणे साधना न करणार्‍यांना साधना न करणारेच आवडतात. साधना करणारे आवडत नाहीत; म्हणून ते साधना करणार्‍यांवर टीका करतात, त्यांना विरोध करतात. याउलट साधना करणार्‍यांची एकमेकांशी जवळीक होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंची आध्यात्मिक स्थिती अत्यंत केविलवाणी होण्याचे एक कारण म्हणजे वाणीत चैतन्य नसलेले कीर्तनकार, प्रवचनकार आणि तथाकथित संत

भारतात हजारो कीर्तनकार, प्रवचनकार आणि अनेक संत असूनही हिंदूंची आध्यात्मिक स्थिती अत्यंत केविलवाणी झाली आहे. याचे कारण हे की, त्यांतील बहुतेक स्वतः साधना करत नाहीत. ते केवळ दुसर्‍यांना साधना करण्यास सांगतात. साधना न केल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या वाणीत चैतन्य नसते. त्यामुळे श्रोत्यांवर त्यांच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

दगडांवर बीज रूजत नाही, तसे स्वभावदोष आणि अहं यांच्यावर साधनेचे…

दगडांवर बीज रूजत नाही, तसे स्वभावदोष आणि अहं यांच्यावर साधनेचे बीज रूजत नाही; म्हणून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला गुरुकृपायोगात प्राधान्य दिले आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले