मनुष्य ईश्वराने नेमून दिलेल्या धर्मसिद्धांतांच्या विरुद्ध कार्य करत असल्याने तो अधर्मी बनतो !

जगातील नैसर्गिक गोड पदार्थ म्हणजे ‘मध.’ त्यामध्ये गोडपणा ईश्वरानेच निर्माण केला आहे. युगानुयुगे मधमाश्या मध गोळा करतात. त्या मधमाश्यांना कुणी पगार देत नाही. ईश्वराने जे कार्य त्यांना नेमून दिले आहे, त्या तेवढेच करतात; मात्र मनुष्य ईश्वराने नेमून दिलेल्या धर्मसिद्धांतांच्या विरुद्ध कार्य करतो; म्हणून तो अधर्मी बनतो.

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९२ (२९.१०.२०२१))

Leave a Comment