भाषाशुद्धीद्वारे चैतन्याचा प्रसार !

‘परकियांच्या आक्रमणांमुळे मराठी भाषेत अन्य भाषांतील शब्दांचा शिरकाव झाल्याने मराठी भाषेची तेजस्विता आणि तिचा प्रभाव उणावला होता. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्य भाषांतील शब्दांच्या ठिकाणी मराठी शब्दांचा उपयोग करायला लावून मराठी भाषेतील शब्दांना महत्त्व दिले.

मराठी भाषेत योग्य शब्दाला खूप महत्त्व आहे. त्याला अर्थ आहे आणि त्यामध्ये कार्य करणारी शक्ती आहे; म्हणून त्याला ‘शब्दब्रह्म’ म्हटले आहे. त्यामुळे त्यातील चैतन्यशक्तीद्वारे कार्य होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले हेही मराठी भाषाशुद्धीसाठी प्रयत्नरत आहेत. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेले आध्यात्मिक ग्रंथ आणि सनातन प्रभात नियतकालिके यांत व्याकरणासहित शुद्ध शब्दांचा उपयोग केला जातो. यांद्वारे निर्माण होणार्‍या चैतन्याचा प्रभाव आज सर्वत्र दिसून येत आहे.’

Leave a Comment