स्वतःतील दोष दूर करण्याचे महत्त्व

‘दुसर्‍याचे दोष शोधण्यासाठी आपण जितकी बुद्धी व्यय (खर्च) करतो, तेवढी आपण स्वतःचे दोष शोधण्यात व्यय केल्यास आपण दुःख-दौर्बल्यापासून मुक्त होऊ’, असे उपनिषदांनी म्हटले आहे. आपले दोष आपल्याला दिसत नाहीत; पण आपल्याकडून दुसर्‍याचे दोष मात्र अचूकपणे शोधले जातात. आपले दोष जाणणाराच ‘विवेकी’ होय ! आपले दोष निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केल्यासच ते नाहीसे होण्याची शक्यता असते; अन्यथा … Read more

विवेक

‘देहाचे पांघरूण वस्त्र आणि माझे पांघरूण देह. त्यामुळे ‘माझ्या भानासह ‘मी’ देहाहून अगदीच भिन्न असणारा आहे’, असे वाटणे म्हणजेच विवेक.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : ‘श्रीधर – संदेश’, जुलै २००२)

आत्मनिवेदन

‘आत्मनिवेदनाच्या माध्यमातून मनातील सर्व विचार भगवंताला सांगण्याची सवय लावावी. आत्मनिवेदनामुळे मन हलके होण्याच्या समवेत ईश्‍वराशी अनुसंधानही साधले जाते.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

भगवंताची लीला अनुभवून कृतज्ञता व्यक्त करणे

‘मी काहीही खाल्ले, तरी त्याचे रक्त बनते, ही किमया कोण करू शकतो ? माझा प्रत्येक श्‍वास कुणामुळे अखंड चालू आहे ? मोठ्या अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून माझे प्रत्येक क्षणाला कोण रक्षण करतो ?’, यांसारख्या प्रश्‍नांची उत्तरे शोधल्यास भगवंताची लीला अनुभवता येऊ शकते. यांसाठी दिवसातून मी किती वेळा कृतज्ञता व्यक्त करतो ?’, याचाही विचार करावा.’ – (सद्गुरु) … Read more

जीवन-मुक्त

‘याची देही, याची डोळा’ आपले मरण आणि जन्मही पाहून तेथे दुसरे काहीही न रहाता, स्वतःच शेष रहाणे, यालाच ‘जीवन-मुक्त’ म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : ‘श्रीधर – संदेश’, नोव्हेंबर २०००)

मनमोकळेपणा

‘आपल्या मनातील विचार मोकळेपणाने इतरांना सांगितल्यास विचारांमुळे आपल्याला आलेला ताण अल्प होतो. बर्‍याच वेळा मनात येणारे विचार योग्य कि अयोग्य, हे न कळल्याने अस्वस्थता येते. अशा वेळी ते विचार उत्तरदायी साधकांना सांगून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. असे केल्याने अनावश्यक विचारात वाया जाणारा वेळ आणि ऊर्जा वाचते. विचारांवर वेळीच मार्ग न काढल्यास मनोदेहावरील रज-तमाचे आवरण वाढून अनिष्ट … Read more

सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक

‘सर्वसाधारण व्यक्ती जे काही करते, त्यामागे तिचा उद्देश ‘काहीतरी हवे’, असा असतो. याउलट साधक करत असलेल्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा उद्देश ‘सर्वस्वाचा त्याग करून ईश्‍वरप्राप्ती करायची’, असा असतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे पाश्चात्त्य विचारसरणी, तर कुठे हिंदु धर्म !

‘पाश्‍चात्त्य विचारसरणी आणि संशोधन केवळ सुखप्राप्तीसाठी असते. माणसाची सुखाची हाव कधीच पूर्ण होत नाही; म्हणून अनेक संशोधने करूनही मानव अधिकाधिक दुःखी होत आहे. याउलट हिंदु धर्म ईश्‍वरप्राप्तीसाठी, म्हणजे चिरंतन आनंदप्राप्तीसाठी मार्गदर्शन करतो; म्हणून हिंदु धर्माचे पालन करणारा कधीच दुःखी होत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची मर्यादा !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जीवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत. त्यांतील एकतरी गोष्ट शास्त्रज्ञांना बनवता आली आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अंतर्ज्ञानी भारतीय ऋषि !

‘पाश्‍चात्त्यांना संशोधनासाठी यंत्रे लागतात. ऋषींना आणि संतांना लागत नाहीत. त्यांना यंत्रांच्या अनेक पटींनी माहिती मिळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले