‘मी’पण नष्ट होणार असल्याने भगवंताशी एकरूप होण्याचे भय वाटणे

‘स्वतःचे ‘मी’पण नाहीसे करणे सर्वांत कठीण असते. कवीश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांनी एका कवितेत लिहिले आहे, ‘मी जन्मोजन्मी भगवंताचा शोध घेत होतो. एकदा भगवंताच्या दारी पोचलो. दार ठोठावणार इतक्यात घाबरलो; कारण भगवंताला भेटल्यानंतर माझा ‘मी’पणा नाहीसा होईल. मीच उरणार नाही तेव्हापासून मी भगवंताचा पत्ता ठाऊक असूनही ‘भगवंत नाही’, अशा ठिकाणी भगवंताचा शोध घेत भटकत असतो.’ – … Read more

विजयादशमीनिमित्त संदेश

विजयादशमीपासून हिंदु समाज आणि देशहित यांच्या रक्षणासाठी सीमोल्लंघन करा ! ‘वर्ष २०२१ ते २०२३ हा जागतिक महायुद्धाचा काळ असणार आहे. या काळात भारतीय सैन्यालाही सीमोल्लंघन करावे लागणार आहे. भारतीय सीमेवर युद्ध चालू झाल्यानंतर शत्रूराष्ट्रांचे हस्तक असणारे देशांतर्गत शत्रू अराजकता निर्माण करण्यासाठी गृहयुद्ध भडकवू शकतात. तसेच देशाच्या दृष्टीने प्रतिकूल असलेल्या या काळात पूर, भूकंप, युद्ध इत्यादींमुळे … Read more

धर्मप्रेमींनो, आपत्काळाच्या दृष्टीने कौशल्यविकास करा !

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करण्याच्या दृष्टीने आतापर्यंत आपण कौशल्यविकास करत होतो. आता काळानुसार आपत्कालीन परिस्थितीचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने विशेषतः हिंदूंच्या रक्षणाच्या दृष्टीने कौशल्यविकास करावा लागेल. सध्याचा काळ हा आपत्काळ म्हणजे संकटकाळ आहे आणि सहा मासांनी येणारा काळ हा प्रत्यक्ष युद्धकाळ आहे. अशा संकटकाळात देशभक्त आणि सत्त्वगुणी हिंदूंचे संरक्षण, तसेच भारताचे संरक्षण हेच धर्मरक्षणाचे कार्य ठरणार … Read more

राजकीय पक्षाचे खरे रूप 

‘सर्व राजकीय पक्ष जनतेला स्वार्थी मागण्या करायला शिकवतात, राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी त्याग करायला शिकवत नाहीत.’

ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग इत्यादींच्या संदर्भात लिखाण करणा-या ऋषींची नावे सहस्रो वर्षे लोकांच्या लक्षात राहणे 

कुटुंबातील आई-वडील, आजोबा, आजी यांची नावे २ – ३ पिढ्यांपर्यंतच कुटुंबाच्या लक्षात रहातात. समाजात वावरणार्‍या संतांची नावे २ -३ पिढ्यांपर्यंत समाजाच्या लक्षात रहातात. अभंग इत्यादी लिखाण करणार्‍या संतांची नावे काही शतके समाजाच्या लक्षात रहातात. ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग इत्यादींच्या संदर्भात लिखाण करणार्‍या ऋषींची नावे सहस्रो वर्षे लोकांच्या लक्षात असतात. याउलट आयुष्यभर अहंभावाने वागणार्‍या राजकारण्यांना लोक काही … Read more

एका कुटुंबातील एक व्यक्ती जरी साधनेत असेल, तरी तो साधक आणि त्याचे कुटुंब यांची मोठी पुण्याई असतेे !

‘कलियुगात साधना करणार्‍या व्यक्ती सापडणे कठीण आहे आणि साधना करणारे साधक भेटणे त्याहूनही कठीण आहे. एखाद्या कुटुंबातील एक साधक साधनेत असेल, तरी तो साधक आणि त्याचे कुटुंब यांची केवढी मोठी पुण्याई आहे. त्या पुण्याईला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करण्यासाठी आपल्याला त्या साधकांना भेटावे लागते.’

साधकांनो, जे काही घडते, ते चांगल्यासाठीच घडते आणि आपण मनाला सतत देवाला धरून रहायला शिकवले, तर त्यातून आपली साधना होते !

‘माझ्याकडे कुणी लक्ष देत नाही’, असा विचार करायला नको. आपण जे काही करतो, त्या प्रत्येक गोष्टीची नोंद देवाकडे होत असते. आपल्याला असे वाटणे; म्हणजे आपल्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. आपल्या संदर्भात जे काही घडते, ते चांगल्यासाठीच घडते. देव कधीच चुकीचे करणार नाही. ‘देव आणि मी’, याकडेच आपण लक्ष द्यायचे. ‘कोण कसे वागते ?’, याकडे लक्ष … Read more

साधकाने ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे ध्येय न ठेवता ईश्वरप्राप्तीचे ध्येय ठेवून साधना करणे महत्वाचे !

‘देवाच्या नियोजनाप्रमाणे ईश्‍वरी राज्य जेव्हा यायचे, तेव्हाच येणार आहे. ती अपेक्षाही नको. साधकाने ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेचे ध्येय ठेवून साधना करायला नको. ‘मला ईश्‍वर हवा आहे’, या ध्येयासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे. काळानुसार ईश्‍वरी राज्याची स्थापना होणारच आहे. त्यासाठी आपण वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. साधना करतांना साधकाची सात्त्विकता वाढल्यावर त्याचे फळ म्हणून आपोआपच ईश्‍वरी राज्याची स्थापना … Read more