बुद्धीपलीकडील कार्यकारणभाव ठाऊक नसणारे बाल्यावस्थेतील विज्ञान !

‘एखादी घटना घडली की, विज्ञान ती घडण्यामागील केवळ भौतिक कारणांचा अभ्यास करते. त्यामागे काही कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाला अद्याप कळलेले नाही, उदा. एखाद्या बसला अपघात घडून त्यामध्ये २० प्रवासी मेले आणि १ प्रवासी वाचला. या घटनेमध्ये विज्ञानाच्या दृष्टीकोनातून अपघात होण्याची कारणे ‘रस्ता खराब असणे, बसमध्ये तांत्रिक बिघाड होणे, चालकाची चूक असणे’ यांसारखी मर्यादित असतील; पण … Read more

संतांची महती !

‘डॉक्टर, अधिवक्ते, लेखापरीक्षक, ज्योतिषी, पोलीस, मित्रमंडळी, नातेवाईक इत्यादी विविध क्षेत्रांतील तज्ञ जे करू शकत नाहीत. ते संत करू शकतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अध्यात्मामध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा पुढे असण्याचे एक कारण

‘बहुतांश पुरुष त्यांच्या कामामिमित्त रज-तमप्रधान असणार्‍या समाजामध्ये वावरत असतात. त्यांच्यावर त्याचा परिणाम होऊन तेही रज-तमयुक्त होतात. याउलट बहुतांश स्त्रिया घरीच असल्यामुळे त्यांचा समाजातील रज-तमाशी संपर्क येत नाही. त्यामुळे त्या साधनेत लवकर पुढे जातात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१४.११.२०२१)

कुठे भारतात अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येणारे विदेशी तर कुठे संत अन् अध्यात्म यांचे मूल्य न कळलेले हिंदू !

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रात मनोरंजनाचे नव्हे, तर दर्शकाला शिकायला मिळेल आणि त्याचा वेळ सत्कारणी लागेल, असे कार्यक्रम दाखवले जातील !

‘सध्या संकेतस्थळे, दूरचित्रवाहिन्या यांच्या माध्यमातून अधिक प्रमाणात मनोरंजनपर कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. त्यांचा दर्शकांना काहीही लाभ न होता, त्यांचा वेळ वाया जाण्याचेच प्रमाण अधिक असते. कलियुगात मनुष्याचे जीवन अल्प आहे. या अल्प कालावधीतच मनुष्य जीवनाचे मूळ ध्येय ‘ईश्वरप्राप्ती’ साध्य करण्यासाठी वेळेचा अधिकाधिक सदुपयोग करणे आवश्यक आहे. या कारणास्तव हिंदु राष्ट्रात दूरचित्रवाहिन्या वा अन्य कोणत्याही माध्यमांतून … Read more

साधनेत पुढे जाण्यासाठी नेहमी पुढील टप्प्याचे गुरु आवश्यक !

‘साधना करतांना गुरु त्यांच्या शिष्याला अधिकाधिक स्वतःच्या आध्यात्मिक स्तरापर्यंत आणू शकतात, उदा. संत ७० टक्के, सद्गुरु ८५ टक्के, तर परात्पर गुरु ९० टक्के पातळीपर्यंत घेऊन जाऊ शकतात. ९० टक्के पातळीच्या पुढे ईश्वरच पुढील मार्गदर्शन करतो. त्यामुळे साधना करणार्‍याला संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांची त्या त्या टप्प्याला आवश्यकता असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)

स्वभावदोष आणि अहं असणा-यांमुळे त्रस्त होऊ नका, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगून त्यांना साहाय्य करा !

‘स्वभावदोष आणि अहं असणार्‍या व्यक्तीच्या आपण संपर्कात येतो, त्या वेळी तिच्या स्वभावदोषांमुळे होणार्‍या दुष्परिणामांनी आपण त्रस्त होतो अन् प्रसंगी तिला रागवतोही. येथे लक्षात घेतले पाहिजे की, त्या व्यक्तीच्या कधीतरी संपर्कात आल्यावर आपल्यावर इतका परिणाम होतो, तर त्या व्यक्तीला त्या दोषांमुळे किती अडचणी येत असतील ! त्यामुळे मनात तिच्याविषयी सहानुभूती ठेवून तिला दोष निर्मूलन करण्यासाठी साहाय्य … Read more

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंची झालेली दुःस्थिती !

‘स्वातंत्र्यापासून आजवर कोणत्याही पक्षाचे शासनकर्ते आाणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिले नाही. त्यामुळे आता हिंदूंना केवळ ‘रामायण, महाभारत’ हे शब्दच माहीत आहेत. त्यातील एकही शिकवण त्यांना आठवत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राजकारणी आणि संत यांच्या कार्यातील भेद !

‘राजकारण्यांकडून स्थुलातून अनुभव येतात, उदा. पूरग्रस्तांना साहाय्य करणे, साधनसुविधा उपलब्ध करून देणे, तर संतांकडून सूक्ष्म स्तरावरील उपायांमुळे अनुभव येतात, उदा. अनेकांच्या कौटुंबिक अडचणींसह शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अडचणी दूर होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मनुष्यजन्मात साधना करण्याचे महत्त्व

‘अनेक जन्मांनंतर मनुष्यजन्म लाभतो आणि ‘अनेक जन्म केलेल्या साधनेचे फळ’ म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांसारखे ‘गुरु’ त्या मनुष्यजिवाच्या जीवनात येतात. मनुष्याचे आयुष्य पुष्कळ अल्प आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना याची सतत जाणीव करून देतात आणि मनुष्याच्या जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठी ते साधकांना साधना शिकवतात. जोपर्यंत आपण … Read more