साधनेने संचित आणि इच्छा यांचा नाश होणे

विद्यारण्य स्वामी फारच गरीब होते. अर्थप्राप्तीसाठी त्यांनी गायत्रीची २४ पुरश्चरणे केली; पण अर्थप्राप्ती झाली नाही. तेव्हा त्यांनी थकून संन्यास घेतला. त्या वेळी गायत्री मातेचे दर्शन झाले. देवी म्हणाली, ‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग.’ स्वामी म्हणाले, ‘आता मला काही मागायची इच्छा नाही. इच्छा होती, तेव्हा तू मला प्रसन्न झाली नाहीस. असे का झाले … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे हास्यास्पद !

शाळेतल्या मुलांनी ‘फ्रेंच भाषा नाही’ किंवा ‘हिमालय नाही’, असे म्हणणे जसे हास्यास्पद आहे, तसेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे हास्यास्पद आहे. – डॉ. आठवले (३०.६.२०१४)

हिंदूंचा कल्पनातीत सर्वधर्मसमभाव

विष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाला युद्धात मारले. त्या रावणाची रावण महाराज या नावाची भारतात २ – ३ ठिकाणी मंदिरे आहेत ! म्हणूनच हिंदूंना कोणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको ! – डॉ. आठवले (२६.६.२०१४)

लो. टिळकांप्रमाणे साधना करणारे नेते भारताला मिळाले असते, तर एव्हाना भारत जगातील राष्ट्रांत पहिल्या क्रमांकाला पोहोचला असता !

सन १८९८ साली चाफेकर प्रकरणामुळे झालेली शिक्षा भोगून लोकमान्य तुरुंगातून ज्या वेळी सुटून बाहेर आले, त्या वेळी ते कसब्याच्या श्रीगणपतीस प्रथम आणि नंतर श्री. अण्णासाहेब यांच्या दर्शनास गेलेे. अगोदर घरी जाऊन आला का ? असा श्री. अण्णासाहेबांनी जो प्रश्‍न विचारला त्यावर लोकमान्य एकदम उद्गारले, प्रथम श्री गणपति नंतर तुम्ही ! गीतारहस्य छापल्यानंतर पहिली प्रत पंढरपूरच्या … Read more

भीक आणि भिक्षा यांमधील भेद

१. भिक्षा मागण्याचे लाभ : सनातन धर्मात ब्रह्मचारी आणि संन्यासी यांनी काही ठराविक घरांतून भिक्षा मागून अन्न खावे, असे सांगितले आहे. २. ब्रह्मचर्याश्रम : गुरुकुलात रहाणारी काही मुले श्रीमंत घरांतील असतात आणि त्यांचे पालक त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकतात; पण राजा असो वा रंक प्रत्येकाने भिक्षा, म्हणजेच माधुकरी मागून पोट भरावे, असा गुरुकुलाचा नियम असल्यामुळेे … Read more

अध्यात्माचे अर्धवट ज्ञान असल्यास होणारी हानी

१९४२ या वर्षी देशाची स्थिती पहावली नाही; म्हणून साधना करणारे एकजण क्रांतीकारक बनले. ते पकडले गेल्यावर पोलिसांनी सहकाऱ्यांची नावे विचारली. तेव्हा अध्यात्माचा अर्धवट अभ्यास झाल्याने, म्हणजे ‘सत्यं ब्रूयात् (सत्य बोलावे)’ एवढेच माहित असल्याने त्यांनी सत्य सांगितले, म्हणजे त्यांच्या बरोबरच्या इतर क्रांतीकारकांची नावे सांगितली. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्या सहकाऱ्यांनाही फासावर लटकवले. त्यांनी अध्यात्माचा पूर्ण अभ्यास केला असता, … Read more

अभ्यासू वृत्ती नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी !

मी संमोहन उपचारतज्ञ म्हणून २५ वर्षे व्यवसाय केला. संमोहन उपचारशास्त्र मानसोपचाराच्या अंतर्गत येते. या उपचाराच्या पद्धतीत संशोधन केल्यामुळे माझे विदेशांत कौतुक झाले. मला अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून व्याख्यान देण्यासाठी निमंत्रणही आले होते. अशी पार्श्‍वभूमी असतांनाही मी बरे करू शकत नसलेले रुग्ण संतांच्या उपचारांनी बरे होतात, हे मी अनुभवले. नंतर मी संतांकडून त्यांची उपचारपद्धत शिकण्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे … Read more

मानसिकपेक्षा आध्यात्मिक स्तरावरच्या वक्त्यांच्या भाषणाचा परिणाम अधिक होणे, तो अधिक काळ टिकणे आणि म्हणूनच धर्मकार्य करणार्‍यांनी साधना करणे आवश्यक !

१. मानसिक (भावनिक) स्तरावरच्या वक्त्यांचे भाषण : याचा परिणाम तात्कालिक असतोे. सभा संपून श्रोते परतले की, सभेतील भाषण ते थोड्याच वेळात विसरतात. त्यामुळे कार्यासाठी कार्यकर्ते तयार झाले, असे अल्प वेळा दिसून येते. याचे उदाहरण म्हणजे राजकारण्यांच्या सभांना हजारो, लाखोंची उपस्थिती असली, तरी त्यांतील फारच थोडे त्यांच्या कार्यात सहभागी होतात. २. आध्यात्मिक स्तरावरच्या वक्त्यांचे भाषण : … Read more

अर्जुनाप्रमाणे स्थिती झालेले बहुसंख्य हिंदू

भगवान श्रीकृष्णाने गीतेत (अध्याय २, श्‍लोक ११) अर्जुनाला सांगितले, अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्‍च भाषसे । म्हणजे हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. अर्जुनाप्रमाणे हल्ली बहुतेक हिंदूंची स्थिती झाली आहे. काही कृती करण्याऐवजी ते मोठमोठे युक्तिवाद करतात आणि त्याला मोठेपणा समजतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सिंहाने प्राणी किंवा माणसाला मारणे आणि मनुष्याने प्राणीहत्या करणे यांतील भेद

कोणत्याही कर्मामागील हेतू काय असेल, त्यानुसार फळ मिळते. सिंहाला ज्या वेळी भूक लागते, त्या वेळी तो प्राण्यांना मारून पोट भरतो. तो माणसालाही मारू शकतो. ही नैसर्गिक क्रिया असल्याने येथे पाप-पुण्याचा प्रश्न येत नाही. मनुष्य स्वतःला शिकारीचे आणि मांस खाण्याचे सुख मिळावे; म्हणून तो प्राण्यांची हत्या करतो. तसेच द्वेष, लोभ, मत्सर, सूड घेणे इत्यादींसाठी एक मनुष्य … Read more