मायेचा वापर माध्यम म्हणून करावा !

मायेचा वापर माध्यम म्हणून, म्हणजे सध्याच्या ‘वापरा आणि फेकून द्या’ (युज अ‍ॅयण्ड थ्रो) या पद्धतीने करायचा. त्यात बद्ध झाल्यास विकार वाढून दोष निर्माण होतात. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.८.२०१४)

प्रत्येकात भगवंताला शोधण्यासाठी करावयाच्या कृती !

मनाला सातत्याने वळण लावून आत्म्याशी अनुसंधानित करण्याचे प्रयत्न करावा. प्रत्येक कृती, उदा. चालणे, बोलणे, पहाणे आत्म्याशी अनुसंधानित करावी. स्वतः करतो, अशी जाणीव असल्यास कृती करतांना थकवा येतो; मात्र अनुसंधानित कृतीमुळे थकवा येत नाही. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१४)

कर्मातून (सेवेतून) आनंद अनुभवणे

प्रत्येक कृती आपल्या नकळत होत असते, उदा. डोळ्यांनी पहाणे, लिहिणे. त्या आत्मस्वरूप भगवंताकडून चालूच असतात. तोच सर्व अवयवांकडून करवून घेत असतो. त्यामुळे जिवाला अन्य काही करावे लागत नाही. त्यामुळे मन / वृत्ती आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करावी. हे साध्य होण्यासाठी पुढील कृती कराव्या. १. सातत्याने कृतज्ञता व्यक्त करावी. २. प्रार्थना करावी. ३. कृती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न … Read more

आत्मज्ञान

जे अज्ञात आहे, म्हणजे सध्या ज्ञात नाही, आठवत नाही, असे आत्मज्ञान सत्संग, सेवा यांद्वारे तात्पुरते आवरण निघाल्यामुळे (तात्पुरते) प्राप्त झाल्यासारखे वाटते. हे आवरण कायमस्वरूपी काढण्याचा प्रयत्न येथे (आश्रमात) चालू आहे, उदा. संगणकाच्या हार्ड-डिस्कमध्ये माहिती आहे; मात्र ती त्याविषयी माहिती नसणार्‍याला अज्ञात आहे. जेव्हा आपण योग्य कळ दाबतो, आज्ञा देतो, तेव्हा ती प्रकट होते, दृश्य स्वरूपात … Read more

साधना

वेद म्हणतात, तो (भगवंत) बृहद् झाला आहे. भगवंत विविध रूपांतून प्रकट होतो. माझ्या साहाय्यासाठी सर्व वस्तू आणि प्राणी आहेत. पहाण्याची दृष्टी पालटली पाहिजे. भगवंत माझ्यामधून कार्य करतो. माझी स्तुती ही भगवंताची स्तुती आहे; म्हणून त्याची बदनामी होऊ नये, असे वागणे म्हणजे साधना होय. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.८.२०१४)

सजीव-निर्जीव प्रत्येकात भगवंताला शोधणे

प्रत्येकाच्या मुळाचा शोध घेतला असता भगवंताचे अस्तित्व लक्षात येते, उदा. हात-तोंड पुसण्यासाठी वापरण्यात येणार्‍या रुमालाचे मूळ कापूस आहे, कापसाचे मूळ झाड आहे, झाडाचे मूळ बी आहे आणि या बीचे मूळ भगवंत आहे. रुमालातील भगवंत आपल्यातील भगवंताचे तोंड पुसतो, म्हणजे त्याची सेवा करतो. लेखणीतील भगवंत लिखाणाची सेवा करतो, अशा प्रकारे विचारप्रक्रिया ठेवल्यास आपले अस्तित्वच नष्ट होते. … Read more

भगवंताच्या अनुसंधानाचे महत्त्व !

घरात सर्व विद्युत जोडणी केली; मात्र पंखा चालू करण्यासाठी कळ दाबली नाही, तर पंखा चालू होणार नाही. तद्वतच सेवा केली; मात्र भगवंताशी अनुसंधानच ठेवले नाही, तर सेवेचा लाभ मिळणार नाही. ही कळ म्हणजे नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता. त्यांचा उपयोग करावा. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.८.२०१४)

स्वेच्छा, परेच्छा किंवा ईश्‍वरेच्छा याप्रमाणे वागणे

हे शब्द साधनेच्या संदर्भात आहेत, हे लक्षात न घेता एका साधकाने बायकोच्या साधनेला असलेल्या विरोधाला परेच्छा समजून साधना करणे बंद केले. एका जिज्ञासूने विचारले, मित्राने दारू पिण्याचा आग्रह केल्यास परेच्छा म्हणून दारू प्यायची का ? येथे लक्षात घेतले पाहिजे की, अशा वेळी परेच्छेऐवजी ईश्‍वरेच्छा काय असेल ?, याचा विचार करावा. ईश्‍वर कधी साधना करू नको … Read more

सनातन संस्थेच्या साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती होण्याचे कारण

बर्‍याच जणांना आश्‍चर्य वाटते की, फक्त सनातनचे अनेक साधक जलद गतीने प्रगती कशी करतात ? त्यांच्यापैकी अनेकजण संत कसे होतात ? यांचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. १. इतरत्र शिकवतात, तशी वर्षानुवर्षे केवळ तात्त्विक माहिती सनातनमध्ये सांगण्यात येत नाही, तर प्रत्यक्ष साधना करण्याच्या कृती शिकवण्यात येतात. २. सर्वांना एकच साधना न सांगता व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग … Read more

पर्यटकांना आकृष्ट करणारे अध्यात्मशास्त्र भारतात असतांना त्याचा लाभ न घेता केवळ मौजमजेच्या जाहिराती करणारी सर्वपक्षीय केंद्र आणि राज्य सरकारे देशाला अत्यंत हानीकारक !

पर्यटकांनी आकृष्ट व्हावे; म्हणून सर्वपक्षीय केंद्र आणि राज्य सरकारे जाहिरातींवर प्रतीवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतात. वर्ष २०१६ मध्ये केवळ केरळ राज्य ८० कोटी रुपये खर्च करणार आहे ! पाश्‍चात्त्य विचारसरणीचे अंधानुकरण करणार्‍या सरकारांनी भारतात आदर्श पर्यटन आयोजित करावे, हे अपेक्षित नाही ! अध्यात्म लाखो जणांना शेकडो वर्षे भारताकडे खेचत आहे. हा केवळ इतिहासच नाही, तर … Read more