राजकीय पक्षाचे पदाधिकारी होण्यापेक्षा साधक-शिष्य होणे केव्हाही श्रेयस्कर !

‘कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी होण्यापेक्षा साधक किंवा शिष्य होणे लाखो पटींनी श्रेष्ठ असते; कारण राजकीय पक्षात गेल्यावर रज-तम गुण वाढतात, तर साधक किंवा शिष्य झाल्यास सत्त्वगुण वाढतो. त्यामुळे देवाकडे वाटचाल होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण व्हावे’, यासाठी रुग्णालयातील रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, आधुनिक वैद्य, परिचारिका इत्यादी सर्वांनी अधिकाधिक नामजप करावा !

‘रुग्णालयात रुग्णांचे विविध कारणांनी मृत्यू होतात, उदा. अपघातग्रस्त, दीर्घकाळ रुग्णाईत असलेले रुग्ण, अकाली मृत्यू झालेले; तसेच लहान मुले इत्यादी. मृत्यूनंतर प्रत्येकाला लगेच पुढील गती मिळतेच, असे नाही. त्यांपैकी अतृप्त लिंगदेह किंवा वाईट लिंगदेह त्या रुग्णालयातील आधुनिक वैद्य, परिचारिका, स्वच्छता करणारे कर्मचारी, उपचारांसाठी आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक इत्यादींना त्रास देऊ शकतात. रुग्णालयात विविध व्याधींनी त्रस्त … Read more

केवळ हिंदु धर्मात अनेक देव कसे ?

‘काही इतर धर्मीय हिंदूंना चिडवतात, ‘देव एकच आहे, तर तुमच्या धर्मात अनेक देव कसे ?’ अशा अभ्यासशून्य व्यक्तींच्या हे लक्षात येत नाही की, हिंदु धर्म सर्वांत परिपूर्ण असा धर्म आहे. पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राचे उदाहरण घेतले, तर हे लक्षात येईल की, पूर्वी विविध रोगांवर असलेली औषधे मर्यादित संख्येची होती. विज्ञानाने प्रगती केली, तशी औषधांची संख्या बरीच वाढली. … Read more

शिकवण्‍यापेक्षा शिकण्‍याची वृत्ती ठेवली, तर अधिक लाभ होणे

‘ईश्‍वर सर्वज्ञानी आहे. आपल्‍याला त्‍याच्‍याशी एकरूप व्‍हायचे असल्‍यामुळे आपण सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाणे आवश्‍यक असते. कोणत्‍याही क्षेत्रामध्‍ये ज्ञान मिळवणे, ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. अध्‍यात्‍म हे अनंताचे शास्‍त्र आहे. आपण कितीही शिकलो, तरी ते अल्‍पच असते. आपण शिकत असतांना ‘मी अज्ञानी आहे’, याची जाणीव ठेवून ज्ञान मिळवण्‍याची प्रक्रिया केली पाहिजे. त्‍यामुळे ‘मी’पणा अल्‍प होणे … Read more

गुरूंवर अढळ श्रद्धा असली पाहिजे !

‘आपले डॉक्टर, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींवर आपला विश्वास असतो. त्याहून कित्येक पटींनी अधिक केवळ विश्वासच नाही, तर श्रद्धा गुरूंवर असली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

अनंत कोटी ब्रह्मांडांचा पालनकर्ता ईश्वर !

‘कुठे कुटुंबाचे किंवा आपल्या जातीबांधवांचे हित पहाणारे संकुचित वृत्तीचे मानव, तर कुठे अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्राणीमात्रांचे हित सांभाळणारा ईश्‍वर !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केवळ मनुष्य जन्मातच भगवद़्धामात परत जाण्यासाठीची परमोच्च संधी !

‘आपण परमेश्‍वराचे अंश आहोत; पण काही कारणाने आपण या संसारी जीवनात पडलो आहोत. आता आपल्‍याला अशा रितीने उत्‍क्रांत व्‍हावयाचे आहे की, ज्‍यायोगे आपण भगवद़्‍धामात परत जाऊ शकू. हीच परमोच्‍च संसिद्धी (संधी) होय आणि ती मनुष्‍याला या जीवनात प्राप्‍त करून घेता येते.’ (साभार : आत्‍मसाक्षात्‍काराचे विज्ञान)

प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध असणे, हे केवळ हिंदु धर्माचे वैशिष्ट्य !

‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा हिंदु धर्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध व्हावी, यासाठी हिंदु धर्मात १४ विद्या आणि ६४ कला या मार्गांनी साधना शिकवता येते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध होते आणि त्यामुळे हिंदु धर्मात आवश्यक ती साधना होणार्‍यांचे प्रमाण अन्य धर्मियांपेक्षा अधिक आहे.’ – सच्चिदानंद … Read more