राजकीय पक्ष आणि विविध संघटना यांच्याप्रमाणे सनातन संस्था आणि हिंदु…
राजकीय पक्ष आणि विविध संघटना यांच्याप्रमाणे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यामध्ये पद नसून पद त्यागणारे, सेवकभावात असणारे सेवा करतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
राजकीय पक्ष आणि विविध संघटना यांच्याप्रमाणे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यामध्ये पद नसून पद त्यागणारे, सेवकभावात असणारे सेवा करतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
राजकीय पक्षांतील व्यक्तींचे ध्येय असते सत्ताप्राप्ती, तर सनातनच्या साधकांचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे ध्येय असते हिंदु राष्ट्राची स्थापना ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पूर्वी राजे, महाराजे होते. त्यांचे वागणे अहंयुक्त असायचे. आता अध्यात्मातील बरेच महाराज राजे-महाराजे यांच्याप्रमाणे वागतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
बहुतेक महाराज पंडित किंवा प्रवचनकार असतात ! त्यांचे अध्यात्म विषयक ज्ञान वरवरचे असते आणि त्यांची विशेष साधना नसल्याने त्यांचा आध्यात्मिक स्तर ५० टक्के एवढाच असतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
बहुतेक गुरु अन् संत यांच्यातही थोडातरी अहंकार असतो; पण भगवंतामध्ये अहंकार नसतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
काही संप्रदायवाले आपल्या संप्रदायाचे महत्त्व इतरांवर बिंबावे; म्हणून त्यांच्या नियतकालिकांत काही जणांना आलेल्या शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील सकामातील चांगल्या अनुभूती छापतात; पण हजारोंना अनुभूती आल्या नसल्याचे छापत नाहीत. त्यामुळे यांच्याकडे गेलो, तर आपल्या सर्व अडचणी दूर होतील, असे बर्याच जणांना वाटते आणि ते त्या संप्रदायात जातात. त्यांतील बहुतेकांना अनुभूती न आल्याने त्यांचा केवळ त्या संप्रदायावरीलच … Read more
जसे अन्न तसे मन, असे असल्यामुळे मांसाहार नको, तर शाकाहार करा ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांचे हित पहाणार्यांनाच मते देतात, तर हिंदू बुद्धीप्रामाण्यवाद, समाजवाद, साम्यवाद इत्यादी निरनिराळ्या विचारसरणींप्रमाणे मते देतात. त्यामुळे त्यांची मते फुटतात. त्यामुळे त्यांना भारतात किंमत उरली नाही ! हिंदूंना धर्म शिकवला, तरच त्यांची मते इतर धर्मियांप्रमाणे एकगठ्ठा होतील. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
बहुतेक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी एखादा प्रसंग आला, तरच कार्य करतात, उदा. गोरक्षा करणारे गायी कत्तलखान्यात जात असल्याचे कळले, तरच कार्यरत होतात. अयोध्येत राममंदिर, गंगाप्रदूषण इत्यादींच्या संदर्भात कार्य करणारे कधीतरी कार्य करतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साध्य करायचे असेल, तर असे कार्य करून चालणार नाही. चाकरी करणार्यांनी प्रतिदिन ३ – ४ घंटे तरी कार्य करायला हवे. … Read more
आपण वैयक्तिक जीवनात विविध प्रसंगांत योग्य निर्णय कोणता हे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, वैद्य, अधिवक्ता, लेखा परिक्षक इत्यादींना विचारून घेतो. तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कार्य करण्याच्या वेळी राष्ट्र आणि धर्म प्रेमी संतांनाच विचारून तशी कृती केली पाहिजे. असे केले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले