पूर्वी राजे, महाराजे होते. त्यांचे वागणे अहंयुक्त असायचे. आता अध्यात्मातील…
पूर्वी राजे, महाराजे होते. त्यांचे वागणे अहंयुक्त असायचे. आता अध्यात्मातील बरेच महाराज राजे-महाराजे यांच्याप्रमाणे वागतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पूर्वी राजे, महाराजे होते. त्यांचे वागणे अहंयुक्त असायचे. आता अध्यात्मातील बरेच महाराज राजे-महाराजे यांच्याप्रमाणे वागतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
बहुतेक महाराज पंडित किंवा प्रवचनकार असतात ! त्यांचे अध्यात्म विषयक ज्ञान वरवरचे असते आणि त्यांची विशेष साधना नसल्याने त्यांचा आध्यात्मिक स्तर ५० टक्के एवढाच असतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
बहुतेक गुरु अन् संत यांच्यातही थोडातरी अहंकार असतो; पण भगवंतामध्ये अहंकार नसतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
काही संप्रदायवाले आपल्या संप्रदायाचे महत्त्व इतरांवर बिंबावे; म्हणून त्यांच्या नियतकालिकांत काही जणांना आलेल्या शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील सकामातील चांगल्या अनुभूती छापतात; पण हजारोंना अनुभूती आल्या नसल्याचे छापत नाहीत. त्यामुळे यांच्याकडे गेलो, तर आपल्या सर्व अडचणी दूर होतील, असे बर्याच जणांना वाटते आणि ते त्या संप्रदायात जातात. त्यांतील बहुतेकांना अनुभूती न आल्याने त्यांचा केवळ त्या संप्रदायावरीलच … Read more
जसे अन्न तसे मन, असे असल्यामुळे मांसाहार नको, तर शाकाहार करा ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांचे हित पहाणार्यांनाच मते देतात, तर हिंदू बुद्धीप्रामाण्यवाद, समाजवाद, साम्यवाद इत्यादी निरनिराळ्या विचारसरणींप्रमाणे मते देतात. त्यामुळे त्यांची मते फुटतात. त्यामुळे त्यांना भारतात किंमत उरली नाही ! हिंदूंना धर्म शिकवला, तरच त्यांची मते इतर धर्मियांप्रमाणे एकगठ्ठा होतील. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
बहुतेक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी एखादा प्रसंग आला, तरच कार्य करतात, उदा. गोरक्षा करणारे गायी कत्तलखान्यात जात असल्याचे कळले, तरच कार्यरत होतात. अयोध्येत राममंदिर, गंगाप्रदूषण इत्यादींच्या संदर्भात कार्य करणारे कधीतरी कार्य करतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साध्य करायचे असेल, तर असे कार्य करून चालणार नाही. चाकरी करणार्यांनी प्रतिदिन ३ – ४ घंटे तरी कार्य करायला हवे. … Read more
साधनेच्या बळावर कार्य करणार्या सनातनचा प्रसार जगभर होतो, तर मानसिक स्तरावर कार्य करणार्या संघटनांचा प्रसार त्यांचे गाव, तालुका, जिल्हा, राज्य किंवा भारत येथेच होतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
असा भाव ठेवला, तर रामराज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याबरोबर आपलाही उद्धार होईल, नाहीतर हिंदु राष्ट्राची स्थापना झाली, तरी अहंभाव जागृत असल्यावर आपला उद्धार होणार नाही. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
धर्माच्या आधारावर ख्रिस्ती आणि मुसलमान जगभर वर्चस्व गाजवत आहेत. हिंदूंनी धर्म सोडल्याने त्यांची स्थिती जगात काय; पण भारतातही केविलवाणी झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले