परिपूर्ण हिंदु धर्म !

‘हिंदूंना संशोधन करण्याची आवश्यकता नसते; कारण सुख नाही, तर आनंदप्राप्तीसाठीचे, म्हणजेच मोक्षप्राप्तीपर्यंतचे सर्व हिंदु धर्मात सांगितलेले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अद्वितीय हिंदु धर्म !

‘हिंदु धर्माचा जितका अभ्यास करत गेलो, तितकी भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पोलिसांना नीती आणि धर्म शिकवा !

‘पोलिसांना कायदे, नीती आणि धर्म शिकवा, म्हणजे ते निरपराध्यांचा छळ करण्याचे अन् खोटे अहवाल तयार करण्याचे पाप करणार नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच मिळणार हिंदूंना आधार !

‘पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांतीलच नव्हे, तर भारतातील काश्मीरसह सर्वत्रच्या हिंदूंना आता कुणाचा आधार नाही. तो देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ लढा !

‘आता एकेका अशिलाची बाजू मांडणारे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडणारे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्ता हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करा !

‘आता एकेका रुग्णासाठीचे नव्हे, तर मरणोन्मुख स्थितीतील राष्ट्र आणि धर्म यांसाठी सहस्रो डॉक्टर (आधुनिक वैद्य) हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संतांनीच भारताची किंमत राखली !

‘भारतातील स्वातंत्र्यापासूनची ७५ वर्षे भारतावर राज्य केलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी नव्हे, तर संतांनीच भारताची जगात किंमत राखली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

‘भ्रष्टाचार, बलात्कार, बुद्धीप्रामाण्यवाद, अनैतिकता, गुंडगिरी, देशद्रोह, धर्मद्रोह इत्यादींना आता जे उधाण आले आहे, त्याला कारणीभूत आहेत, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७५ वर्षे जनतेला साधना, नैतिकता इत्यादी न शिकवणारी आतापर्यंतची सरकारे ! यातूनच हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

‘एका कपाटात किती सामान मावेल, याचा विचार सर्वसाधारण व्यक्ती करते; पण देशात किती कोटी मानव सुखाने राहू शकतील, त्यांना पुरेसे अन्न-पाणी मिळेल, याचा विचार न करणार्‍या आतापर्यंतच्या सरकारांमुळे देशाची लोकसंख्या स्वातंत्र्याच्या वेळी ३५ कोटी होती. ती आता १३५ कोटींहून अधिक झाली आहे. हे सर्व सुधारण्यासाठी आता हिंदु राष्ट्र हाच पर्याय आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. … Read more