धर्माच्या आधारावर ख्रिस्ती आणि मुसलमान जगभर वर्चस्व गाजवत आहेत. हिंदूंनी…
धर्माच्या आधारावर ख्रिस्ती आणि मुसलमान जगभर वर्चस्व गाजवत आहेत. हिंदूंनी धर्म सोडल्याने त्यांची स्थिती जगात काय; पण भारतातही केविलवाणी झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
धर्माच्या आधारावर ख्रिस्ती आणि मुसलमान जगभर वर्चस्व गाजवत आहेत. हिंदूंनी धर्म सोडल्याने त्यांची स्थिती जगात काय; पण भारतातही केविलवाणी झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य केवळ १० वर्षांत जगभर पसरले; कारण साधनेमुळे त्यांच्या कार्याला ईश्वराचा आशीर्वाद आहे. याउलट इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्य फारच थोडे होते; कारण त्या कार्यकर्त्यांकडून साधना करून घेत नाहीत. त्यांच्याकडून जे काही कार्य थोडेफार होते, त्याचा परिणामही अधिक काळ टिकत नाही. त्यामुळे भारत अधोगतीच्या परिसीमेला गेला आहे. – (परात्पर … Read more
आदर्श लोकशाही, म्हणजे लोकांचे, लोकांनी स्थापिलेले आणि लोकांसाठीचे राज्य ! (Of the people, by the people and for the people.) याउलट भारतातील लोकशाही म्हणजे राजकारण्यांचे, राजकारण्यांनी स्थापिलेले आणि राजकारण्यांसाठीचे राज्य !, असे असल्याने आता लोकशाही नको, तर हिंदु राष्ट्र हवे, या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आयुष्यभर एकच साधना करत राहून साधनेच्या त्याच वर्गात राहू नका. त्याऐवजी जाणकारांना विचारून साधना करत पुढच्या पुढच्या वर्गांत जा आणि अंतीम ईश्वरप्राप्ती करा ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
ठिकठिकाणी हिंदुत्ववादी भेटतात. त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी काहीतरी करावेसे वाटते. त्यांना त्यासाठी सक्षम करण्यासाठी पुढील क्रमाने शिकण्यास सांगा. १. व्यष्टी साधना : व्यष्टी साधना शिकण्यासाठी सनातनच्या आश्रमात रहा. तेथे ३ – ४ महिन्यांत साधनेचा पाया निर्माण होईल. २. समष्टी साधना अ. समष्टी साधना शिकण्यासाठी निरनिराळ्या जिल्ह्यांत प्रसारासाठी जाणार्या समितीच्या प्रसारसेवकांबरोबर जा. आ. तुम्ही शिकलात, … Read more
हिंदूंच्या विविध बैठकांत आणि अधिवेशनांत निरनिराळ्या धर्माभिमान्यांशी बोलतांना लक्षात येते की, प्रत्येकाला गोरक्षण, श्रीराम मंदिर, धर्मशिक्षण, हिंदू संघटन, स्वसंरक्षण प्रशिक्षण इत्यादींपैकी एखादा विषय त्यांच्या प्रकृतीनुसार महत्त्वाचा वाटतो. त्याला त्यासंदर्भातच कार्य करणे महत्त्वाचे वाटते. त्यामुळे काही जणांना त्याच्यात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासंदर्भात प्राधान्य नाही, असे वाटते. येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, प्रत्येक विषयच महत्त्वाचा … Read more
जोपर्यंत मी आणि अन्य कोणीतरी असे द्वैत आहे, तोपर्यंत वासनेचे विचार येतात. कोणाशीतरी एकरूप व्हायचे आहे, असे वाटत असते; पण ९० टक्क्यांच्या पुढे द्वैत अल्प होऊ लागतेे. मी आणि अन्य कोणी हा भेद रहात नाही. त्यामुळे आपण सर्वजण एकच आहोत, असे वाटत असल्याने वासना रहात नाहीत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. व्यष्टी साधना : व्यष्टी साधनेला प्रारंभ करतांना कुलदेवतेचा (म्हणजे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असल्यास कुलदेवीचा आणि त्यांपैकी एक असल्यास त्याचा किंवा तिचा), ती ज्ञात नसल्यास श्री कुलदेवतायै नमः ।, असा नामजप करावा. त्याच्याच जोडीला बहुतेक सर्वांनाच पूर्वजांचा त्रास असल्यामुळे श्री गुरुदेव दत्त । हा जपही करावा. गुरुमंत्र मिळाला असल्यास या दोन जपांऐवजी गुरुमंत्राचा जप … Read more
व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय आणि धर्मासंबंधीच्या सर्व प्रश्नांकडे मानसिक आणि बौद्धिक नव्हे, तर आध्यात्मिक दृष्टीने पहायला शिका, तरच कार्यकारणभाव आणि उपाय लक्षात येतील आणि यश मिळेल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले पेट्रोलशिवाय गाडी चालत नाही. तसे आध्यात्मिक बळाशिवाय हिंदु राष्ट्राची स्थापना अशक्य ! यासाठी साधना करा ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
समानशीलव्यसनेषु सख्यम् ।, म्हणजे ज्यांच्यात स्वभाव आणि सवयी जुळतात, त्यांच्यात मैत्री होते. यामुळे दारू पिणार्याला दारू पिणाराच आवडतो. त्याप्रमाणे साधना न करणार्यांना साधना न करणारेच आवडतात. साधना करणारे आवडत नाहीत; म्हणून ते साधना करणार्यांवर टीका करतात, त्यांना विरोध करतात. याउलट साधना करणार्यांची एकमेकांशी जवळीक होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले