इतर संघटना कार्याचे वार्षिक आणि आर्थिक अहवाल सादर करतात, तर…

इतर संघटना कार्याचे वार्षिक आणि आर्थिक अहवाल सादर करतात, तर सनातन संस्था साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा आणि ग्रंथ प्रकाशनांचा अहवाल सादर करते आणि हिंदु जनजागृती समिती धर्मसभा आणि धर्मरक्षणासाठीची राष्ट्रीय आंदोलने यांचा अहवाल सादर करते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राष्ट्रप्रेमींनो आणि धर्मप्रेमींनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिदिन भावपूर्ण सेवा केल्यासच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !

बहुतेक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी एखादा प्रसंग आला, तरच कार्य करतात, उदा. गोरक्षा करणारे गायी कत्तलखान्यात जात असल्याचे कळले, तरच कार्यरत होतात. अयोध्येत राममंदिर, गंगाप्रदूषण इत्यादींच्या संदर्भात कार्य करणारे कधीतरी कार्य करतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साध्य करायचे असेल, तर असे कार्य करून चालणार नाही. चाकरी करणार्‍यांनी प्रतिदिन ३ – ४ घंटे तरी कार्य करायला हवे. … Read more

देवघरातील देवांची संख्या

साधनेच्या मार्गानुसार देवघरातील देवांची संख्या पालटते. १. व्यष्टी साधना : व्यष्टी साधना करणार्‍यांना अनेकातून एकात जायचे असते. त्यामुळे त्यांनी देवघरातील देवांची संख्या अल्प करत एकाच देवाच्या मूर्तीची किंवा छायाचित्राची पूजा करावी. कुटुंबातील इतर भक्तीमार्गी असल्यास देवघरात इतर देवांच्या मूर्ती किंवा चित्रे असतात; पण आपण मनातून एकाच देवतेकडे लक्ष द्यावे. २. समष्टी साधना : समष्टी साधना … Read more

हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म कार्य करतांना संतांनाच विचारूनच कार्य करा !

आपण वैयक्तिक जीवनात विविध प्रसंगांत योग्य निर्णय कोणता हे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, वैद्य, अधिवक्ता, लेखा परिक्षक इत्यादींना विचारून घेतो. तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कार्य करण्याच्या वेळी राष्ट्र आणि धर्म प्रेमी संतांनाच विचारून तशी कृती केली पाहिजे. असे केले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगासनातून ॐ आणि सूर्यनमस्कार काढणार्‍या आणि चुकीची शिकवण देणार्‍या धर्मद्रोह्यांनो, हे लक्षात घ्या !

योगासनातून ॐ आणि सूर्यनमस्कार काढणारे ऋषीमुनींपेक्षा स्वतःला शहाणे समजतात का ? योगासने केवळ शारीरिक व्यायाम नसून आध्यात्मिक व्यायाम आहेत. मानसिक स्तरावर कार्य करणार्‍या धर्मद्रोह्यांचे कार्य आणि नाव काही वर्षांतच कोणाच्या लक्षात रहात नाही. याउलट ऋषींनी सांगितलेले अनंत काळापर्यंत अस्तित्वात रहाते; कारण त्यांच्यामध्ये ॐ ची निर्गुणाची शक्ती आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांच्या तुलनेत राजकारण्यांचे महत्त्व शून्य

राजकारणी जनतेला पैसे देऊन आणि वाहनाची सोय करून सभेला बोलावतात. याउलट संतांकडे आणि धार्मिक उत्सवात न बोलावताही भक्त लाखोंच्या संख्येने येतात आणि पैसे अर्पण करतात ! यावरून संतांच्या तुलनेत ‘राजकारण्यांचे महत्त्व शून्य आहे’, हे लक्षात येईल. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेच्या बळावर कार्य करणार्‍या सनातनचा प्रसार जगभर होतो, तर मानसिक…

साधनेच्या बळावर कार्य करणार्‍या सनातनचा प्रसार जगभर होतो, तर मानसिक स्तरावर कार्य करणार्‍या संघटनांचा प्रसार त्यांचे गाव, तालुका, जिल्हा, राज्य किंवा भारत येथेच होतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठल्याही पुरस्कारापेक्षा ६० टक्के पातळी गाठणे किंवा संत होणे, हे महत्त्वाचे !

पद्मभूषण, राष्ट्रपती पदक, नोबेल प्राइस यांपेक्षा ६० टक्के पातळी गाठणे किंवा संत होणे, हे अधिक महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे व्यक्ती जन्म-मृत्यूच्या चक्रांतून सुटते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राष्ट्रप्रेमी हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आपण श्रीरामाच्या वानरसेनेतील वानरांप्रमाणे सहभागी आहोत, हा भाव ठेवा !

असा भाव ठेवला, तर रामराज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याबरोबर आपलाही उद्धार होईल, नाहीतर हिंदु राष्ट्राची स्थापना झाली, तरी अहंभाव जागृत असल्यावर आपला उद्धार होणार नाही. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

पूर्ण वेळ साधक होता येत नाही; म्हणून खंत करणार्‍यांनो, घरी राहूनही साधना करता येते, हे लक्षात घ्या !

काही जणांना पूर्ण वेळ साधना करण्याची तीव्र इच्छा असते; पण घरी आई-वडिलांना पहाणारे कोणी नसते किंवा आर्थिक स्थिती चांगली नसते. त्यामुळे ते पूर्ण वेळ साधक होऊ शकत नाहीत. अशांनी पूर्ण वेळ साधना करता येत नाही, अशी खंत करण्यापेक्षा आई-वडिलांची सेवा मायेच्या नात्याने न करता त्यांच्याकडे गुरुरूप म्हणून पाहून सेवा केल्यास साधना होते. श्रावणबाळाने आई-वडिलांची सेवा … Read more