राज्यकर्त्यांनो, हे लक्षात घ्या ! षड्रिपुंमुळे नष्ट झालेले अनेक राजे, तर जितेंद्रिय असल्याने संपूर्ण पृथ्वी आपल्या नियंत्रणात ठेवणारा परशुराम

अनेक राजे इंद्रियांचे दास बनूनच नष्ट झाले आहेत. रावण आणि कीचक स्त्री वासनेने नष्ट झाले. दुर्योधन मत्सराने समाप्त झाला. शिशुपाल क्रोधाने. प्रजेवर प्रचंड कर लादणारा अभिजित राजा लोभाने नष्ट झाला. जितेंद्रिय परशुरामाने संपूर्ण पृथ्वी आपल्या नियंत्रणात ठेवली. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, ऑक्टोबर २०१०)

आमच्या शहाण्या शासनकर्त्यांना भारतीय राजनीतीचे अनुसरण करण्याची बुद्धी कधी येईल ?

पाकिस्तान आक्रमण करणार, या भीतीने भारतीय शासन जो अपरंपार पैसा, शक्ती आणि प्रज्ञा संरक्षणावर वेचते आहे, त्यामुळे विधायक योजना खोळंबून पडल्या आहेत, पुष्कळशी कामे स्थगित करावी लागली आणि त्यामुळे जनतेत नैराश्य पसरले आहे. केवळ पाकिस्तानच्या आक्रमणाच्या भयाने थरथरणारे आपले शासन. प्रचंड संपत्ती संरक्षणावर बरसते आहे. हे सगळे भारतीय प्रजेला एक वेळ उपाशी ठेवूनच करावे लागते … Read more

चोरांनी चंद्राचा, मत्सरी लोकांनी महाकाव्याचा, तर कुलटा स्त्रियांनी पतिव्रतेचा द्वेष करणे

चन्द्रिकां तस्करो द्वेष्टि कवितां मत्सरी जनः । कुलटा च स्त्रियं साध्वीं स्वभावो दुरतिक्रमः ॥ अर्थ : चोर चंद्राच्या चांदण्याचा द्वेष करतो. मत्सरी मनुष्य कवितेचा द्वेष करतो. व्यभिचारिणी स्त्री पतिव्रतेचा राग करते. स्वभाव खरोखरच ओलांडून जाण्याजोगा (बलण्याजोगा) नसतो ! स्पष्टीकरण : चोराला काळाकुट्ट अंधार प्रिय असतो. शुभ्रधवल चंद्राकाशाचा तो द्वेष करतो. कुलटा, जारिणी स्त्री महासाध्वी पतिव्रतेचा … Read more

धर्मबंधन का आवश्यक ?

अ. कायद्याने का समाज वळतो ? तिथे धर्म हवा ! गर्भपाताला शासनाची संमती आहे, हे खरं; परंतु गर्भजल चिकित्सेविरुद्ध शासकीय कायदे आहेत. कायद्याने का समाज वळतो ? तिथे धर्म हवा ! टाईम्सचा लेख (४.७.१९८८) सांगतो की, आता धार्मिक संस्थांनी या कामी पुढाकार घ्यावा. म्हणजे स्त्रियांना गर्भजल चिकित्सेपासून परावृत्त करावे. या बाबतीत कायदा हतबल आहे. अन्य … Read more

स्वामी विवेकानंदांची
तथाकथित समाजसुधारकांना चपराक !

इ.स. १८८७ मध्ये सामाजिक परिषद भरली. त्या परिषदेचे उद्घाटन न्या. रानड्यांनी केले. त्या वेळी विवेकानंदांनी त्याच परिषदेत गर्जना केली, “माझ्यासमोर हिंदु समाज सुधारणासंबंधीचे उद्घाटनाचे भाषण आहे”. समारोप करतांना विवेकानंद कडाडले, “रानडे आणि इतर समाजसुधारकहो जिंदे रहो ! या तुमच्या समाजसुधारणा आंग्लाळलेल्या भारताच्या आहेत. समाजसुधारकहो ! हे विसरू नका की, आपल्या हिंदु समाजाच्या समस्या तुम्ही अथवा … Read more

हिंदुस्थानची दुर्दशा संपवून पुन्हा उत्कर्ष करावयाचा उपाय म्हणजे धर्माधिष्ठित शिक्षण

आमच्या शिक्षणपद्धतीत आमच्या धारणा हव्यात. प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत आमच्या पाप-पुण्य, परलोक, ऋषीसृष्टी, पितरसृष्टी, देवसृष्टी, स्वर्ग-नरक, दृष्ट-अदृष्ट अशा धारणा असायला हव्यात. सगळ्या विषयांत या धारणा हव्यात. अगदी गणित-व्याकरणापासूनच्या पुस्तकांतून असे दृष्टांत हवेत. हिंदुस्थानभर चालू असलेला मिताक्षरा कायदा असायला हवा. त्यानुसार विवाह, दायभाग, दत्तक वगैरे निर्णय व्हावेत. ग्रहणादीपर्वकाळाचे अनुसरण व्हावे. मुलींच्या शाळेत ‘अश्वत्थ’ असावा. अभ्यासाला प्रारंभ … Read more

आजचा समाज

अ. ईश्वरप्राप्तीच्या ज्ञानाऐवजी केवळ भाकरीच्या तुकड्याला महत्त्व देणारा समाज ! विद्येचे रक्षण करणाऱ्या वर्गाचा सन्मान आणि योगक्षेम चालवायला तत्पर अशा विद्यासंरक्षक वर्गाला जिवंत ठेवण्याकरिता समाज ज्या प्रमाणात कटीबद्ध राहील, त्या प्रमाणात तो समाज प्रगमनशाली असतो. आजचे भाकरीचे तत्त्वज्ञान या दृष्टीकोनातून तपासून पाहा. आपण किती अधःपतीत होत आहोत, झालो आहोत आणि होणार आहोत, ते सहज ध्यानी … Read more

कुटुंबपद्धती नसण्याने होणारे तोटे

अ. स्त्री-पुरुषांना कायद्याने समान हक्क देण्याने कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांचा विध्वंस ! स्त्री आणि पुरुष यांच्यातील अंतर मिटवण्याचा सहेतुक प्रयत्न झाला, तर त्याचा परिणाम दुःख आणि व्याधीत होणे अपरिहार्य आहे. सर्वच क्षेत्रांत स्त्री आणि पुरुष यांना समान हक्क देण्यासंबंधीचा आग्रह धरण्याने आणि तसे कायदे करण्याने कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचाही विध्वंस होईल. आ. स्त्रीला पुरुषी … Read more

कुटुंबकर्ता घरच्या लोकांची अन्न, वस्त्र, निवारा आदी व्यवस्था करतो, त्याचप्रमाणे समाज आणि राष्ट्र यांची व्यवस्था करणारे नेते हवेत !

कुटुंबातच तर सहिष्णुता श्‍वासाश्‍वासातून उमटू शकते. घरच्या लोकांची अन्न, वस्त्र, निवारा आदी व्यवस्था केल्यावर कुटुंबकर्ता आपल्या भोजनादीचा विचार करतो. हेच सूत्र समाज आणि राष्ट्र यांच्या स्थैर्याकरिताही आवश्यक नाही का ? तसेच ग्रामपती हा जर आदर्श कुटुंबघटक असेल, कुटुंबांचे व्यवस्थापन करणारा असेल, तर गावाच्या लोकांचे भोजन आणि निवारा यांचा प्रबंध केल्यावरच स्वतःचे जेवण आणि वस्त्र यांचा … Read more

धर्मद्रोह्यांची देणगी:दुर्योधनाची प्रशंसा करणारी एक कादंबरी !

दुर्योधनाची प्रशंसा करणारी एक कादंबरी गुरुदेवांना दाखविली ते म्हणाले, “महाभारत, रामायण आदी इतिहासातील आमच्या काळ्या व्यक्तीरेखा, मुद्दाम उजळ करून त्यांना प्रतिष्ठित करण्याची गेल्या पन्नास-पाऊणशे वर्षांत अनेकांनी कसोशी केली. साक्षात व्यास दुर्योधनासंबंधी सांगतात कंलेरंशस्तु संजज्ञे भुवि दुर्योधनो नृपः ।दुर्बुद्धिःदुर्मतिश्चैवैव, कुरूणामयशस्करः । जगतो यस्तु सर्वस्य विदिष्टा कालपुरुषः । यः सर्वां घातमायास पृथिवीं पृथिवीपते । (महा. आदिपर्व) राजा … Read more