धर्मप्रेमींनो, आपत्काळाच्या दृष्टीने कौशल्यविकास करा !

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करण्याच्या दृष्टीने आतापर्यंत आपण कौशल्यविकास करत होतो. आता काळानुसार आपत्कालीन परिस्थितीचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने विशेषतः हिंदूंच्या रक्षणाच्या दृष्टीने कौशल्यविकास करावा लागेल.

सध्याचा काळ हा आपत्काळ म्हणजे संकटकाळ आहे आणि सहा मासांनी येणारा काळ हा प्रत्यक्ष युद्धकाळ आहे. अशा संकटकाळात देशभक्त आणि सत्त्वगुणी हिंदूंचे संरक्षण, तसेच भारताचे संरक्षण हेच धर्मरक्षणाचे कार्य ठरणार आहे. प्रत्येकाने हे कार्य करण्याच्या दृष्टीने कौशल्यांचा विकास करणे आवश्यक आहे.

स्वरक्षण शिकण्यासह प्रथमोपचार, आपत्कालीन साहाय्य, अग्नीशमन, जलतरण, वाहन-चालन इत्यादी कुशलता संकटकाळासाठी उपयुक्त ठरतील. या ‘हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशना’तून सर्वांना संकटकाळाची सिद्धता करण्याची बुद्धी मिळावी, ही माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी प्रार्थना !’

Leave a Comment