‘एकत्र-कुटुंब पद्धतीतील व्यक्ती सात्त्विक असतील, तरच एकत्र राहिल्यामुळे त्यांना आश्रमात राहिल्याप्रमाणे समष्टीचा लाभ होतो; परंतु सध्याच्या काळात असे कुटुंब बघायला मिळणे दुर्लभ झाले आहे. आई, वडील, मुलगा, सून अशा चार व्यक्तींचे छोटे कुटुंब असले, तरी चार जणांची चार मते असतात. सर्वजण साधना करायला लागले की, त्यांच्यात आश्रमातील साधकांप्रमाणे खरी कुटुंबभावना निर्माण होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.६.२०२१)