बलात्कार करायचा विचारही कोणाच्या मनात येऊ नये, यासाठीचा एकमेव मार्ग, म्हणजे साधना करवून घेणे !

हल्ली भारतात बलात्कारांचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. त्यावरील उत्तर म्हणून बलात्कार्‍यांना तात्काळ फाशी द्या, अशा तर्‍हेच्या मागण्या समाजातून येत आहेत. या मागण्या बरोबर असल्या, तरी त्या वरवरचे उपाय ठरतात. प्रत्येक बलात्कार्‍याला फाशी दिली, तरी बलात्कार संपणार नाहीत; कारण एखाद्या अतिरेक्याला फाशी दिली, तरी इतर अतिरेक्यांच्या मनात त्यासंदर्भात भीती निर्माण होत नाही, तर ते विचार करतात, मी अशा तर्‍हेने बाँबस्फोट करीन की, मी बाँबस्फोट केल्याचे कोणाला कळणारही नाही. अशा तर्‍हेच्या विचारांमुळे बलात्कार्‍यांची संख्या वाढतच जाते.

बलात्कार करायचा विचारही कोणाच्या मनात येऊ नये, यासाठी काय करता येईल, याचा विचार कोणीच करत नाही. असे विचार मनात येऊ नयेत, यासाठी एकमेव मार्ग म्हणजे धर्मशिक्षण देऊन साधना शिकवणे. साधना केल्यामुळे व्यक्तीतील रज-तम न्यून होऊन सात्त्विकता वाढते. त्यामुळे नीतीमत्ताही वाढते आणि बलात्कार करण्याचे विचारही व्यक्तीच्या मनात येत नाहीत. ही काल्पनिक गोष्ट नाही, तर रामराज्यात असे होते. असे रामराज्य आपल्याला पुन्हा निर्माण करायचे आहे. ते म्हणजेच हिंदु राष्ट्र !

हे घडून यायला ८ – ९ वर्षे तरी लागतील. त्याआधी तत्काळ करण्याचे उपाय, म्हणजे लैंगिकता जागृत करणारे चित्रपट, संकेतस्थळे, फेसबुक इत्यादींच्या माध्यमातून अश्‍लीलता शिकवली जाणार नाही, याची खात्री करणे. अर्थात हे होण्यासाठीही सात्त्विक राज्यकर्ते असणे आवश्यक आहे !
– डॉ. आठवले (५.६.२०१४)

Leave a Comment