बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, बुद्धीची मर्यादा लक्षात घ्या !

बुद्धीप्रामाण्यवादी आयुष्यभर बुद्धीने मायेतील स्थूल गोष्टींचा शोध घेत रहातात, तरी त्यांना त्यासंदर्भात अतिशय अत्यल्प आणि तेही फक्त वर्तमान स्थितीतील कळते. त्यांना स्थूल गोष्टींतील चिरंतन तत्त्व कळत नाही. याचे कारण हे की, साधना नसल्यामुळे त्यांना विश्‍वबुद्धीचे साहाय्य होत नाही. त्यामुळे त्यांचे विचार आणि संशोधनही ५० – ६० वर्षांनी कोणाला ज्ञात नसते. याउलट अनादी वेद विश्‍वबुद्धीतून ग्रहण … Read more

खेडेगावात रहाणारे निरोगी आणि आनंदी लोक, तर शहरात रहाणारे व्याधीग्रस्त लोक !

शहरात रहाणारे लोक मायेच्या आधीन जीवन जगत असतात. बहुतेकजण या मायेच्या चक्रामध्ये देवाला विसरलेले असतात. अनेक सुखसुविधांमुळे त्यांच्या शरिराला कष्ट करायची सवय रहात नाही. तसेच प्रलोभने आणि स्वार्थ यांमुळे त्यांची वृत्ती संकुचित आणि प्रेमभाव नसलेली बनते. त्यामुळे त्यांच्या मनातील निर्मळता आणि आनंद लोप पावलेला असतो आणि त्यांचे मन तणावानेच ग्रस्त असते. तसेच शरिराला कष्टाची सवय … Read more

कोणता जयघोष कधी करावा ?

१. लढ्याचा आरंभ होतांना आणि चालू असतांना : हर हर महादेव । २. लढा जिंकल्यावर : जयतु जयतु हिंदू राष्ट्रम् । या सूचनेत प्रसंगानुसार पालट करता येईल.- डॉ. आठवले (३१.१२.२०१३)

हल्लीच्या कुटुंबांची केविलवाणी स्थिती !

एकुलता एक मुलगा असला की, वडिलांची सर्व संपत्ती मिळते; पण भावंडांबरोबर कसे रहायचे ? भावंडांचे प्रेम म्हणजे काय ?, हे शिकायला मिळत नाही. पुढे आई-वडिलांचे सर्व उत्तरदायित्वही सांभाळावे लागते. ते नको असल्याने हल्लीची मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. साधना केल्यास मुले कृतज्ञतापूर्वक आई-वडिलांचे शेवटपर्यंत सर्व करतात आणि त्यांच्या मुलांसमोरही एक आदर्श ठेवतात. – डॉ. आठवले … Read more

कधी साध्या गोष्टीही लक्षात न येणे

गेले ४ – ५ महिने मी तोंडाला अतिशय कोरड पडते, या त्रासासाठी डॉक्टर आणि वैद्य यांचे उपाय केले. तेव्हा लिमलेटच्या गोळ्या चघळायचो; पण फरक पडला नाही. कोरड पडते तेव्हा पाणी प्यायला हवे, हे लक्षात यायचे नाही. काल ते लक्षात आले आणि पाणी अधिक प्रमाणात प्यायला लागलो. तेव्हापासून तोंडाला कोरड पडणे कमी झाले. – डॉ. आठवले … Read more

विज्ञानामुळे दुष्परिणाम होण्याची प्रक्रिया

विज्ञानाने शोधून काढलेल्या यंत्रांमुळे दैनंदिन कार्य, प्रवास इत्यादींसाठी लागणारा बराच वेळ वाचला; मात्र त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, हे विज्ञानाने न शिकवल्यामुळे व्यसने, स्वैराचार इत्यादी गोष्टींत मानव वेळ घालवू लागला. त्यामुळे त्याची अधोगती अती वेगाने झाली आणि होत आहे. – डॉ. आठवले (१९.१.२०१४)

स्वसंरक्षण करण्यासाठी साधनेचे महत्त्व

शिरस्त्राण, चिलखत इत्यादी स्थुलातून आक्रमण झाल्यास त्या त्या भागाचे रक्षण करतात. साधनेमुळे संरक्षककवच निर्माण होते. ते स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवरच्या आक्रमणांपासून पूर्ण देहाचे आणि मनाचे रक्षण करते. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १३, कलियुग वर्ष ५११५ (२१.६.२०१३))

साधनेत केवळ तन-मन-धनाचा त्याग पुरेसा नाही, तर इतरही अनेक गुण हवेत !

साधनेत तन-मन-धनाचा त्याग केला की झाले, असे बर्‍याच ६० टक्क्यांहून अधिक पातळीच्या साधकांना आणि काही संतांनाही वाटते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, साधनेत पुढे जायची तळमळ, जिज्ञासा, शिकण्याची वृत्ती, प्रीती आणि समष्टीतील नेतृत्व इत्यादी गुणही अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशिवाय पुढील प्रगती होणे अशक्य आहे. एवढेच नव्हे, तर या गुणांशिवाय अधोगतीही होऊ शकते. – डॉ. … Read more

देवघरात देवतांची जुनी चित्रे आणि मूर्ती ठेवू नका !

‘काही जणांकडे ३-४ पिढ्यांपूर्वीचीही देवघरातील देवतांची जुनी चित्रे आणि मूर्ती पूजेत ठेवलेली असतात. चित्रे आणि मूर्ती जुनी झाल्यामुळे त्यांच्यातील देवतेचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अल्प झालेली असते. एवढेच नव्हे, तर काही वेळा त्यांतून त्रासदायक स्पंदनेही प्रक्षेपित होतात. भावनाप्रधानतेमुळे अशी चित्रे आणि मूर्ती देवघरात ठेवण्यात येतात. अशांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, मंदिरातील मूर्तीचीही … Read more

स्वतःपेक्षा इतरांकडे पहाण्याची कारणे

व्यक्ती कितीही सुंदर असली, तरी ती आरशात स्वतःकडे फारच थोडा वेळ पहाते. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. अतिपरिचयात् अवज्ञा ।, म्हणजे (आरशात पहाणे) नेहमीचेच झाल्याने त्याचे काही अप्रूप वाटत नाही. २. बहुतेक सर्वच जण बहिर्मुख असल्यामुळे स्वतःकडे पहाण्यापेक्षा त्यांना इतरांकडे पहाणे जास्त आवडते. – डॉ. आठवले (आषाढ शुक्ल पक्ष ५, कलियुग वर्ष ५११५ (१३.७.२०१३))