समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय एकच आणि तो म्हणजे प्रतिकूल काळ संपेपर्यंत वाट पहाणे

आतापर्यंत कोणत्याही वाईट गोष्टीच्या संदर्भात आपण शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक कारणामुळे त्रास होत आहे, याचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करत होतो. हे व्यष्टी जीवनाशी संबंधित असते. आता समष्टी जीवनातील आपत्काळ आल्यामुळे अवर्षण, आतंकवाद अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पुढे जागतिक महायुद्धही होऊन कोट्यवधी मानव मरणार आहेत. व्यष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात आपण उपाय करतो, तसे … Read more

हिंदूंनो, विश्‍वाआधी स्वतःला सुसंस्कृत करा !

हिंदू नेहमी ऋग्वेदातील कृण्वन्तो विश्‍वम् आर्यम् ।, म्हणजे संपूर्ण विश्‍वाला आर्य, म्हणजे सुसंस्कृत करू असे अभिमानाने म्हणतात. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्याचा आरंभ स्वतःपासूनच केला पाहिजे. कृण्वन्तो स्वम् आर्यम् ।, म्हणजे स्वतःला सुसंस्कृत करू, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे लोकां सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥ अशी त्यांची स्थिती होणार नाही … Read more

हिंदूंना धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता !

हिंदु धर्माचा अभ्यास आणि साधना नसल्याने हिंदूंना धर्माचे महत्त्व कळत नाही. त्यामुळे कोणी हिंदु राष्ट्राची स्थापना करा. हिंदु धर्माचा जगभर प्रसार करा, असे म्हणत नाही. आजार्‍याला औषधाचे महत्त्व कळते. औषधांहून हिंदु धर्म अनंत पटींनी श्रेष्ठ आहे. औषधे केवळ काही वेळा आजार बरा करतात; पण मृत्यूपासून सुटका करू शकत नाहीत. याउलट धर्म भवरोगातून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या आजारातून … Read more

धर्मशिक्षण न देता, केवळ कायद्याने सुव्यवस्था आणू, असे म्हणणारे राज्यकर्ते मूर्खांच्या नंदनवनात रहात आहेत !

सत्ययुगात कायदेच नव्हते, म्हणजे त्यांची आवश्यकताच नव्हती; कारण प्रत्येक जण नीतीवान होता. त्रेतायुगात थोडेफार कायदे होते; पण त्यांची आवश्यकता फारच अल्प होती. द्वापरयुगापासून कलियुगापर्यंत कायद्यांची संख्या वाढत गेली आहे. प्रत्यक्षात कितीही कायदे केले आणि कायद्यांनुसार कितीही कडक शिक्षा केल्या, तरी त्यांचा गुन्हेगारांवर काहीही परिणाम होत नाही, हे पुनःपुन्हा तेच गुन्हे करणार्‍यांवरून सिद्ध झाले आहे. धर्मशिक्षणाच्या … Read more

मंदिरांच्या सरकारीकरणानंतर सरकार पुढे उचलणार असलेली संभाव्य पाऊले आणि त्यांचा परिणाम !

१. संभाव्य पाऊले १ अ. पंढरपूरला विठ्ठलाच्या मूर्तीच्या पूजेचे चित्रीकरण करून त्यावरून नवीन पुजार्‍यांना पूजा कशी करायची, हे सरकार शिकवणार आहे. असे करणे हे शस्त्रक्रिया कशी करायची, याची चित्रफीत दाखवून शल्यविशारद तयार करणे यासारखे हास्यास्पद आहे. पूजेत केवळ शारीरिक क्रिया नसून ती भावाच्या स्तरावरची कृती आहे. भक्तीने भक्तीभाव जागृत झाल्यावरच खरी पूजा होते. घरची किंवा … Read more

व्यक्तीस्वातंत्र्यामुळे होणारी हानी

१. व्यक्तीस्वातंत्र्यामुळे व्यक्तीची (व्यष्टीची) होणारी धूळधाण ! : व्यक्तीस्वातंत्र्यामुळे सुखलोलुपता, स्वैराचार इत्यादी सर्व वाढतात आणि इच्छा पूर्ण न झाल्यामुळे व्यक्ती अधिकाधिक दुःखी होते. याउलट सर्वस्वाचा त्याग आणि साधना करणार्‍यांना तात्कालिक सुख नाही, तर चिरंतन आनंदाची, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होते. २. व्यक्तीस्वातंत्र्यामुळे राष्ट्राची (समष्टीची) झालेली वाताहत ! : व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र मोठे, हे न … Read more

कुठे पाश्‍चात्त्य विवाह तर कुठे हिंदू विवाह !

१. पाश्‍चात्त्य विवाह : हा केवळ शारीरिक स्तरावरचा असतो; म्हणून त्यामुळे पती-पत्नीला एकमेकाचा मानसिक आधार मिळत नाही. त्यामुळे मनावर ताण येऊन त्यांना मनोविकारतज्ञांकडे जावे लागते. २. हिंदु विवाह : हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर आधार देणारा आहे. आध्यात्मिक स्तरावर दोघांनी एकमेकांना साहाय्य करून सप्तलोक पार करून मोक्षाला जायचे असते. यासाठीच सप्तपदी असते.- … Read more

खरा विकास कशाला म्हणतात, हेही माहित नसलेले राजकारणी !

निवडणुका आल्या की, सर्वच राजकीय पक्ष अन्न, पाणी, शिक्षण, घर इत्यादींसंदर्भात मोठमोठी आश्‍वासने देतात आणि विकास करू या शब्दाचा भूलभुलैया दाखवतात. सर्वसामान्य जनताच नाही, तर सुशिक्षितही त्याला भुलतात. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ६६ वर्षांत जनता देशोधडीला गेली आहे. जनतेला भौतिक, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा सर्व तर्‍हेच्या समस्या भेडसावत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जनतेला साधनेला लावले असते, … Read more

ज्वलंत राष्ट्राभिमानी सनातन संस्था यांना राजकीय पक्षांचा आणि शासनाचा विरोध होणे

ज्वलंत राष्ट्राभिमानी स्वा. सावरकरांना यांना जसा राजकीय पक्षांनी आणि शासनांनी विरोध केला, तसा विरोध सनातन संस्था आणि हिंदु जनजागृति समिती यांना होत आहे, यात आश्‍चर्य ते काय ? उलट तो विरोध म्हणजे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृति समिती यांच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रेमाचे ते प्रमाणपत्र आहे ! – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १३, … Read more

ऋषींचे सूक्ष्मातील कळण्याचे सामर्थ्य

आपण कानाला रिकामी बाटली, वाटी इत्यादी पोकळी असलेली वस्तू लावली, तर आपल्याला आकाशतत्त्वाचा नाद ऐकू येतो. आपल्याला खोलीच्या पोकळीतील नाद ऐकू येत नाही; मात्र ऋषींना आकाशाच्या पोकळीतील नाद ऐकू येतो. यावरून ऋषींची क्षमता केवढी होती, हे लक्षात येते. – डॉ. आठवले (वैशाख कृष्ण पक्ष नवमी, कलियुग वर्ष ५११५ (२.६.२०१३))