इतरांना सात्त्विकतेचा लाभ व्‍हावा, यासाठी दैनंदिन कृती नामजपासह करा !

‘अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध आणि त्‍यांच्‍याशी संबंधित शक्‍ती एकत्रित असतात. या सिद्धांतानुसार आपल्‍या मनातील विचारांचाही आपल्‍या अवतीभवतीच्‍या परिसरावर परिणाम होत असतो, उदा. एखादी गृहिणी स्‍वयंपाक करत असेल, तर तिच्‍या मनातील विचारांचा परिणाम त्‍या पदार्थांवर होतो. चांगले विचार असतील, तर चांगला परिणाम होतो आणि अयोग्‍य विचार असल्‍यास त्‍याचा नकारात्‍मक परिणाम होतो. याच कारणास्‍तव स्‍वयंपाक … Read more

साधकांनो, सर्वस्वाचा त्याग भावनेपोटी नाही, तर भावाच्या स्तरावर करावा !

‘साधना करतांना ‘सर्वस्वाचा त्याग’, हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा असतो. यासाठी काही वेळा काही साधकांकडून इतरांचे ऐकून भावनेपोटी कृती केली जाते. त्यामुळे अपेक्षित फलप्राप्ती होत नाही. कधी साधक सर्वस्वाचा त्याग करतांना त्यामध्ये ‘मला हे पाहिजे.’, यांसारख्या विचारांनी कृती करत असल्यास त्यामध्ये स्वार्थ असतो. त्यामुळे केलेल्या कृतीसाठी ईश्वराचा आशीर्वाद लाभत नाही. परिणामी अपेक्षित फलप्राप्ती होत नाही. हीच … Read more

मनोविकारांचे मूळ कारण स्वेच्छा होय !

‘स्वतःच्या इच्छेप्रमाणे झाले नाही, की मानसिक ताण वाढून पुढे अनेकविध मनोविकार होतात. त्यावर हल्लीचे मनोविकार तज्ञ विविध उपाय सांगतात; पण कोणीही ‘स्वेच्छाच नको’, असे शिकवत नाहीत. त्यामुळे जगभर अशा रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्वस्वाचा त्याग केलेल्या ऋषी-मुनी आणि संत यांना कधीच मनोविकार झाला नाही. याउलट ते नेहमी सत्-चित् आनंदात असायचे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री गुरूंच्या शिकवणीत सिद्ध झालेला चांगला साधक कुठल्याही परिस्थितीत त्याच्यातील आध्यात्मिक आनंदाने सारे जग प्रकाशमान करत असणे

‘तुमच्या देहाचे मडके अध्यात्मात एकदा चांगले सिद्ध झाल्यावर तुम्ही कधीही, कुठेही गेलात, तरी ते फुटत नाही; उलट ते चांगला नाद निर्माण करते. श्री गुरूंच्या शिकवणीत सिद्ध झालेला चांगला साधक कुठेही गेला, कुठल्याही परिस्थितीत असला, तरी तो आनंदी असतो आणि त्याच्यातील आध्यात्मिक आनंदाने सारे जग प्रकाशमान करतो.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

वर्तमान स्थितीत भगवंताचे तत्त्व ज्या देवतेच्या रूपात समोर येईल, त्या रूपाला प्रार्थना करून त्या रूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करता आल्यास सर्वव्यापी भगवंताशी एकरूप होता येणे

‘वर्तमान स्थितीत समोर येईल, त्या देवाच्या तत्त्वांशी एकरूप होता आले पाहिजे. त्या वेळी समोर दिसणार्‍या देवाच्या तत्त्वाला प्रार्थना करून त्याची सेवा करता आली पाहिजे. यामुळे ईश्वराच्या प्रत्येक तत्त्वाशी जुळवून घेता येते आणि मग सर्वव्यापी असणार्‍या भगवंताशी एकरूप होता येते. काही जणांमध्ये सांप्रदायिकतेमुळे देवाच्या एकाच तत्त्वाविषयी भाव असतो, उदा. काहींना श्रीराम जवळचा वाटतो; परंतु हनुमंत नाही. … Read more

साधना करतांना अध्यात्मशास्त्राचे महत्त्व !

‘अध्यात्मशास्त्र म्हणजे ईश्वरप्राप्तीच्या संदर्भातील तात्त्विक माहिती, तर साधना म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी करावयाच्या कृती. त्यामुळे काही जणांना प्रश्न पडतो की, ‘प्रत्यक्ष कृती करणे, म्हणजे साधना करणे महत्त्वाचे असतांना अध्यात्मशास्त्र किती महत्त्वाचे असते?’ त्याचे उत्तर म्हणजे, साधना करतांना ईश्वरप्राप्तीच्या टप्प्याला जाईपर्यंत साधकाला अनेक अनुभूती येतात. या अनुभूतींबद्दल त्या साधकाला अनेक प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर, म्हणजे त्याच्या … Read more

समष्टी सेवेत सातत्य असल्यावर देवाचा आशीर्वाद आणि कृपा दोन्ही प्राप्त होणे

‘व्यष्टी साधना करतांना देवाचा आशीर्वाद मिळतो; मात्र समष्टी सेवेमध्ये असल्यावर देवाचा आशीर्वाद मिळतो आणि त्याची कृपाही प्राप्त होते. आशीर्वाद काही काळापुरताच टिकतो; परंतु कृपा चिरंतन असते. समष्टी सेवेत सातत्य असल्यावर आशीर्वादाचे रूपांतर कृपेत होते.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

समष्टी सेवेमुळे अहं लवकर अल्प झाल्याने देवरूपी सगुण रूपाकडून निर्गुण ईश्वरापर्यंतचा प्रवास सोपा होणे

‘समष्टी सेवेमुळे भगवंताच्या निर्गुण निराकार तत्त्वाशी शीघ्रतेने एकरूप होता येते; कारण समष्टी सेवा करतांना आपल्या इच्छा सोडून इतरांची इच्छापूर्ती होण्यासाठी जगावे लागते. यातून अहं लवकर अल्प होतो. त्यामुळे देवरूपी सगुण रूपाकडून निर्गुण ईश्वरापर्यंतचा प्रवास सोपा होतो.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

नामाच्याही पुढे केवळ ईश्वरप्राप्तीचा ध्यास लागतो आणि तेव्हा देवच भक्ताची सेवा करू लागतो

‘नामाच्याही पुढे केवळ एकच ध्यास उरतो, तो म्हणजे ईश्वरप्राप्तीचा ! ईश्वरालाच ‘ब्रह्म’, असे म्हणतात. ‘ब्रह्म’ एकच आणि अविनाशी आहे. भक्ताच्या या अवस्थेत देवच भक्ताचे नाम घेण्याचे कार्य करतो. आधी भक्त देवाची सेवा करतो आणि नंतर देवच भक्ताची सेवा करू लागतो.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्री गुरूंची सेवा केल्यावर संकुचित वृत्ती जाऊन व्यापकता येणे

‘भगवंत किंवा गुरु यांची सेवा करणे’, हेच आयुष्यातील आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. त्यामुळे संकुचित वृत्ती सुटते आणि समाजाच्या कल्याणाचा विचार होऊ लागतो. व्यापक संकल्पना मनात आणल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होत नाही; कारण भगवंत व्यापक आहे. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ