शिक्षणासोबतच वैयक्तिक गुणांनाही नोकरीत महत्त्व !
‘कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याला केवळ त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राने नोकरी न देता त्याचे वैयक्तिक गुण पाहूनही निवड करणे आवश्यक आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याला केवळ त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राने नोकरी न देता त्याचे वैयक्तिक गुण पाहूनही निवड करणे आवश्यक आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘साधनेसंदर्भात काही जण नुसते प्रश्न विचारत असतात, कृती काहीच करत नाहीत. त्यांनी लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन यांचे पुढील सुवचन लक्षात ठेवून साधना करावी. ‘का आणि कसे ?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारत बसू नका, तर कार्यात स्वतःला झोकून द्या आणि वेळप्रसंगी सर्वस्वही अर्पण करा !’ – लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन (Ours is not to reason why, ours is … Read more
‘व्यक्तीमध्ये गुण निर्माण झाल्यावर तो गुण तिच्यात सर्व ठिकाणी दिसतो. सेवा कोणतीही असो, उदा. चित्रीकरण करणे किंवा स्वयंपाक बनवणे याची सेवा असू दे. सर्व ठिकाणी गुण सारखेच असतात. त्यामुळे सेवा करतांना नेहमी गुणवृद्धी होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सेवा होत राहील; पण ती गुणात्मक व्हायला हवी. गुणात्मक सेवा, म्हणजे ईश्वराला अपेक्षित अशी सेवा झाल्यावर आपोआप साधनेत … Read more
‘कुठे पतीबरोबर थोडा वाद झाला की, घटस्फोट घेणार्या हल्लीच्या पत्नी, तर कुठे पतीच्या निधनानंतर त्याच्याशी एकरूप झाल्याने जोहार करणार्या, म्हणजे देह अग्निसमर्पण करणार्या पद्मावती राणी आणि तिच्या सोबतच्या १६ सहस्र राजपूत स्त्रिया !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
नकारात्मक विचार न येण्यासाठी सतत भावावस्थेत रहावे; कारण भावात आनंद आहे, तसेच भावामुळे भक्त बनलो, तरच देव साहाय्य करतो. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘भगवंताच्या नामाचे महत्त्व सांगणे, ‘ते कसे घ्यायचे ?’, हे शिकवणे’, हेच खरे शिक्षण आहे. मृत्यूनंतर डोक्यातील ‘गणित आणि विज्ञान’ या सर्व जडातील विषयांची राखरांगोळी होते. केवळ शाश्वत असणारे देवाचे नामच त्या जिवाच्या समवेत जाते. शाळेतील गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तम गुरु हा जीवनातील खरा मार्गदर्शक आहे. ‘गुरूंचे महत्त्व जे शाळा शिकवत नाही, ती शाळा आणि … Read more
केवळ आधुनिक वैद्य आणि अभियंता अशा पदव्या घेऊन उपयोग होत नाही, तर अध्यात्मातील पदवी घ्यावी लागते, म्हणजेच अध्यात्मात साधना करून प्रगती करावी लागते. मगच देवाची पदवी संपादन करता येते. ‘संत, गुरु आणि सद्गुरु’, अशा देवाने दिलेल्या पदव्यांनी जीवनाचे सार्थक होते. गणित, भूगोल इत्यादी अशाश्वत विषयांमुळे नव्हे, तर गुरुकृपेमुळे आणि गुरूंची शिकवण कृतीत आणून साधना केल्याने … Read more
‘समोर जी व्यक्ती आली, तीच आपला ‘गुरु’ आहे’, असे मानून साधना केली पाहिजे. ‘देव कुणाच्या रूपात येऊन आपली कधी परीक्षा घेईल ?’, हे सांगता येत नाही. त्यामुळे उत्तम शिष्य नेहमीच परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सिद्ध असतो. देव कधी गुरूंच्या रूपाने परीक्षा घेतो, तर कधी सामान्य माणसाच्या रूपातही तो येतो. आपले नित्य जीवन हीच आपली एक परीक्षा … Read more
‘समाजसेवा ही ‘ईश्वरसेवा’ म्हणून निर्मळ आणि निरपेक्ष भावाने केली, तरच त्यातून साधना होते.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२४.४.२०२०)
‘इतरांशी बोलतांना त्यांचे होऊनच बोलायला हवे. यामुळे आपल्याला आपले अस्तित्व विसरून सेवा करण्याची सवय लागते. एकदा का अस्तित्व विसरण्याचा सराव झाला की, देवाच्या अधिक जवळ जाता येते आणि मग देहात त्याचे अस्तित्व जाणवू लागते. आपल्या अस्तित्वाचा विसर आणि देवाच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे साधना.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२४.४.२०२०)