कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी अहंनिर्मूलनासाठी भक्तीयोग अधिक साहाय्यक !

‘साधना करतांना अहंनिर्मूलन होणे आवश्यक असते; पण ज्ञानयोग, कर्मयोग आणि हठयोग या मार्गांनी साधना करतांना अहंनिर्मूलन करणे, फार थोड्या जणांना जमते. त्या तुलनेत भक्तीयोगानुसार साधना करतांना अहंनिर्मूलन लवकर आणि सहजतेने होते. आजवर अनेक ज्ञानयोगी संत होऊन गेले; परंतु त्यांनीही कोणत्या तरी देवतेची अथवा त्यांच्या गुरूंची भक्ती केली. त्यामुळे अन्य साधनामार्गांनी साधना करणार्‍यांनी समवेत भक्तीयोगानुसारही काही … Read more

साधनेला आरंभ करतांना आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास कसा करावा ?

‘साधनेला आरंभ केल्यावर काहीजण उत्सुकतेपोटी आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करू लागतात. त्यांनी लक्षात घ्यायला हवे की, साधनेला दिशा मिळेल, प्रोत्साहन मिळेल असे ग्रंथ वाचावे. त्याच प्रमाणे हे ग्रंथ केवळ वाचण्यासाठी न वाचता त्यांचा अभ्यास करावा आणि त्यानुसार साधनेला आरंभ करावा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आश्रमात राहून साधना करण्याचे महत्त्व !

‘साधकांनो, अध्यात्मात काहीतरी पुढच्या टप्प्याचे शिकायचे आहे’, असे वाटत असेल, तर तुम्ही १ – २ आठवडे किंवा तुम्हाला आवश्यक तितके दिवस आश्रमात रहायला या; कारण ‘अध्यात्म’ घरी राहून शिकता येत नाही. पूर्वी साधू-संतांचे आश्रम असायचे. तिकडे सर्वजण शिकायला जात असत. तसेच तुम्ही सनातनच्या आश्रमांत येऊ शकता !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘भित्रेपणा’ वर केवळ ‘साधना करणे’, हाच उपाय !

‘भित्रेपणा’ हा मूलतः स्वतःबद्दलच्या विचारांची तीव्रता अधिक असल्यामुळे येत असतो, म्हणजेच साधकत्वाच्या अभावामुळे येत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी कितीही मानसोपचार केले, तरी अपेक्षित लाभ होत नाही. त्यावर ‘मी’पणा कमी करणारी साधना करणे’, हाच खरा उपाय आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देवाकडे कधी काही मागू नये !

‘देवाला ‘प्रत्येक जीव माझ्याकडे परत जावा’, याची तळमळ अधिक असते. त्यासाठी तो प्रत्येक जिवाला आवश्यक ते वेळोवेळी देतच असतो. त्यामुळे आपण देवाकडे कधी काही मागण्याची आवश्यकताच उरत नाही. अशा परिस्थितीमध्ये देवाकडे काही मायेतील गोष्टी मागणे, ही एक स्वेच्छा होते. साधना करतांना मात्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून देवाला प्रार्थना करणे, हा केवळ ईश्वरावरील श्रद्धा वाढण्यासाठीचा साधनेतील एक टप्पा … Read more

कोणत्याही साधनामार्गाने साधना करत असलो, तरी अखंड साधनारत रहाणे शक्य !

‘भक्तीयोगानुसार साधना करणारा नामजपाच्या माध्यमातून अखंड साधना करू शकतो; कारण देवाचा नामजप करण्यासाठी त्याला स्थळ, काळ यांसारख्या घटकांची मर्यादा नसते. ज्ञानयोगी वाचलेल्या ज्ञानाचे चिंतन करू शकतो, कर्मयोगी असेल त्या परिस्थितीत अपेक्षारहित राहू शकतो, हठयोगी केवळ श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करून अखंड साधनारत राहू शकतो. अशा प्रकारे कोणत्याही मार्गाने साधना करत असलो, तरी अखंड साधनारत रहाणे शक्य … Read more

खरा ब्राह्मण !

ईश्वरप्राप्तीची तळमळ असणाराच खरा ब्राह्मण होय ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

साधनेच्या संदर्भात नुसते प्रश्न विचारू नका, कृती करा !

‘साधनेसंदर्भात काही जण नुसते प्रश्न विचारत असतात, कृती काहीच करत नाहीत. त्यांनी लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन यांचे पुढील सुवचन लक्षात ठेवून साधना करावी. ‘का आणि कसे ?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारत बसू नका, तर कार्यात स्वतःला झोकून द्या आणि वेळप्रसंगी सर्वस्वही अर्पण करा !’ – लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन (Ours is not to reason why, ours is … Read more

ईश्वराला अपेक्षित अशी सेवा झाल्यावर साधनेत प्रगती होणे

‘व्यक्तीमध्ये गुण निर्माण झाल्यावर तो गुण तिच्यात सर्व ठिकाणी दिसतो. सेवा कोणतीही असो, उदा. चित्रीकरण करणे किंवा स्वयंपाक बनवणे याची सेवा असू दे. सर्व ठिकाणी गुण सारखेच असतात. त्यामुळे सेवा करतांना नेहमी गुणवृद्धी होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सेवा होत राहील; पण ती गुणात्मक व्हायला हवी. गुणात्मक सेवा, म्हणजे ईश्वराला अपेक्षित अशी सेवा झाल्यावर आपोआप साधनेत … Read more

सतत भावावस्थेत रहाण्याचे महत्त्व !

नकारात्मक विचार न येण्यासाठी सतत भावावस्थेत रहावे; कारण भावात आनंद आहे, तसेच भावामुळे भक्त बनलो, तरच देव साहाय्य करतो. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले