‘इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।’

पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला परत येण्याची इच्छा होते; म्हणून म्हणतात, ‘इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।’ भावार्थ : ‘इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।’ म्हणजे ‘पंढरपूरला जाणार’, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्वराच्या भेटीपेक्षा … Read more

प्रगती

जसजशी प्रगती होते, तसतसे परमेश्‍वरापुढे आपण किती क्षुद्र आहोत, याची जाणीव होते. – (प.पू.) डॉ.आठवले (२९.७.२०१४) विज्ञान विज्ञानवाद्यांनो, विज्ञान तात्कालिक सुख देते, तर अध्यात्म चिरंतन आनंद देते, हे समजून घ्या ! – (प.पू.) डॉ. आठवले (२१.२.२०१४)

श्राद्ध नाही, तर वडिलधार्‍यांची सेवा करणे, हाच पितृऋणातून मुक्त व्हायचा खरा मार्ग !

वृद्ध आई-वडिलांची, आजोबा-आजींची काळजी न घेता, ते गेल्यावर श्राद्ध, त्रिपिंडी श्राद्ध करणार्‍यांना विधींचा कितपत लाभ होणार ? पूर्वजांचा त्रास होतो; म्हणून नारायण-नागबळी सारखे विधी करणे केवळ स्वार्थी होेत. वडिलधार्‍यांची सेवा करणे, हाच पितृऋणातून मुक्त व्हायचा खरा मार्ग आहे. वडिलधार्‍यांची सेवा करणे हे कर्तव्यच आहे. त्याचे पालन केले, तर पुण्य लाभत नाही, पण न केल्यास दोष … Read more

आई-वडिलांविषयी कृतज्ञता वाटली पाहिजे !

कोणी थोडेफार साहाय्य केले,तरी त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटते.आई-वडिलांनी तर जन्म दिला आणि आपल्याला लहानाचे मोठे केले;म्हणून त्यांच्याबद्दल किती कृतज्ञता वाटली पाहिजे !आई-वडील वृद्ध झाल्यावर त्यांची शेवटपर्यंत काळजी घेणे,हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. – (प.पू.) डॉ.आठवले (२९.७.२०१४)

पातळीनुसार भक्तीमार्गातील साधनेचे पुढचे पुढचे टप्पे

हल्ली बहुसंख्य व्यक्ती साधना करत नाहीत. साधना करणार्‍या बहुतेकांना साधनेत पातळीनुसार पालट होत जातो, हे ज्ञात नसते. त्यामुळे ते आयुष्यभर तीच साधना करत रहातात. कोणत्याही योगमार्गाने साधना करत असले, तरी असेच होत असल्याचे लक्षात येते. येथे भक्तीयोगाचे उदाहरण दिले आहे. भक्तीयोगातील प्रगतीनुसार साधनेतील टप्पे : साधनेचा प्रकार आणि स्तर अनुभव आणि अनुभूती साधकाची आध्यात्मिक पातळी … Read more

बुद्धीप्रामाण्यवादी आणि प.पू. डॉक्टर यांच्या दृष्टीकोनांतील मूलभूत भेद म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसणे आणि प.पू. डॉक्टरांना जिज्ञासा असणे

बरेच ज्योतिषी माझा मृत्यूयोग जवळ आल्याचे गेली १० वर्षे सांगत आहेत. काही ज्योतिषांना मी जिवंत आहे, हे पाहून आश्‍चर्य वाटते. हे ऐकल्यावर बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतील, बघा. आम्ही म्हणतो ना, ज्योतिषशास्त्र खोटे आहे, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले ! याउलट माझ्या मनात विचार येतो, माझा मृत्यूयोग असूनही मी गेली १० वर्षे जिवंत असण्याचे कारण काय ? जिज्ञासेमुळे … Read more

अधोगतीला नेणारे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, उच्छृंखलपणा !

शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागायला कोणी संमती देत नाही. गुन्हेगारांना गुन्हे करायला, रस्त्यावरून गाडी कशीही चालवायला व्यक्तीस्वातंत्र्य नसते. वैद्य नसलेल्याला औषधे द्यायला संमती नसते. याचा अर्थ हा की, समाजातील सर्वच क्षेत्रांत व्यक्तीस्वातंत्र्याला संमती नसते. असे असतांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात स्वेच्छेने कसेही वागायला संमती मागतांना कोणाला काहीच कसे वाटत नाही ? १. स्वेच्छेने, … Read more

अध्यात्मातील ज्ञानपूर्व आणि ज्ञानोत्तर लिखाण

ज्ञानपूर्व लिखाण ज्ञानोत्तर लिखाण १. लेखक सर्वसाधारण व्यक्ती संत २. स्तर बुद्धीचा बुद्धीपलीकडील ३. लिखाणाचा उगम ग्रंथांचा अभ्यास आणि चिंतन अंतःस्फूर्ती (विश्‍वबुद्धीकडून प्राप्त होणारे ज्ञान) ४. चैतन्याचे प्रमाण (टक्के) ० – २ लेखकाच्या आध्यात्मिक स्तरानुसार ५० – ७० ५. लिखाण टिकण्याचा अवधी ५ – ३० वर्षे शेकडो ते हजारो वर्षे – (प.पू.) डॉ. आठवले (२४.११.२०१४)

व्यष्टी साधनेसाठी गुरुमंत्र, समष्टी साधनेसाठी कालमहात्म्यानुसारचा जप आवश्यक

काही जणांना प्रश्‍न पडतो, आम्हाला गुरुमंत्र मिळालेला असतांना आम्ही कालमहात्म्यानुसारचा श्रीकृष्णाचा जप करायचा का ? याचे उत्तर आहे, गुरुमंत्र व्यष्टी साधनेसाठी आहे, तर समष्टी साधनेसाठी कालमहात्म्यानुसार श्रीकृष्णाचा जप वर्ष २०२३ पर्यंत आवश्यक आहे. वर्ष २०२४ पासून श्रीरामाचा जप आवश्यक असेल. गुरुमंत्र काळानुसार पालटत नाही, तर समष्टी साधनेसाठीचा जप कालमहात्म्यानुसार पालटतो. – (प.पू) डॉ. आठवले (२४.११.२०१४)

व्यष्टी आणि समष्टी साधनेतील भेद आणि समष्टी साधनेचे महत्त्व

१. ईश्‍वर सूक्ष्मातीसूक्ष्म आहे, तसाच सर्वव्यापीही आहे. त्यामुळे ईश्‍वरप्राप्तीचे, म्हणजे ईश्‍वराशी एकरूप होण्याचे सूक्ष्मातीसूक्ष्म होणे, म्हणजेच शून्यात जाणे किंवा सर्वव्यापी होणे, हे दोन मार्ग आहेत. सूक्ष्मातीसूक्ष्म होणे हा मार्ग व्यष्टी साधना करणार्‍यांचा असतो, तर समष्टीशी एकरूप होण्यासाठी आपली व्यापकता वाढवणे, हा मार्ग समष्टी साधना करणार्‍यांचा असतो. व्यष्टी साधना करता करता पुढे शून्यात जाऊन ईश्‍वराशी एकरूप … Read more