‘सर्व ईश्वरेच्छेने, म्हणजे आपल्या कल्याणासाठीच होत आहे’, असे केव्हा समजायचे ?

‘गुरु किंवा ईश्‍वर यांच्या चरणी पूर्ण समर्पित झाल्यावर स्वतःविषयीचे विचार पुष्कळ अल्प होतात. आपण सतत ईश्‍वरी अनुसंधानात असलो, तर ईश्‍वराचेही आपल्याकडे लक्ष असते. गुरुचरणी पूर्ण समर्पितता आणि सतत ईश्‍वरी अनुसंधान, असे दोन्ही असल्यावर आपल्याकडून होणारी कृती ईश्‍वरेच्छेने होते. अशी अवस्था असतांना एखाद्या वेळी आपल्या संदर्भात काहीतरी प्रतिकूल जरी घडले, तरी ‘ते ईश्‍वरेच्छेनेच झाले आहे; म्हणून … Read more

ईश्वरप्राप्तीच्या प्रवासात गुरुच साधकांसाठी अधिक प्रमाणात प्रयत्नशील असतात

जो साधक ‘ईश्‍वरप्राप्ती’ हे ध्येय ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्म करत रहातो, तो चुकला, तरी चालेल; गुरु त्या जिवाचा स्वीकार करतात आणि त्याला शिष्य बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. ईश्‍वरप्राप्तीच्या प्रवासात केवळ साधकच नाही, तर त्याहूनही अधिक गुरुच त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात. -श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)

अध्यात्मात चूक असे काही नसते

अध्यात्मात चूक असे काही नसते. प्रत्येक प्रसंग साधकाला घडवण्यासाठी घडतो. ‘प्रसंगातून शिकणे आणि पुढे जाणे’ एवढेच असते. -श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)

शारीरिक आणि मानसिक बळांपेक्षा आध्यात्मिक बळ श्रेष्ठ

‘शारीरिक आणि मानसिक बळांपेक्षा आध्यात्मिक बळ श्रेष्ठ असूनही हिंदू साधना विसरल्यामुळे चिमूटभर धर्मांध आणि इंग्रज यांनी काही वर्षांतच संपूर्ण भारतावर राज्य केले ! आता तसे पुन्हा होऊ नये; म्हणून हिंदूंनी साधना करणे अतिशय आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्‍वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

केवळ मनुष्य जन्मातच भगवद्धामात परत जाण्यासाठीची परमोच्च संधी !

आपण परमेश्‍वराचे अंश आहोत; पण काही कारणाने आपण या संसारी जीवनात पडलो आहोत. आता आपल्याला अशा रितीने उत्क्रांत व्हावयाचे आहे की, ज्यायोगे आपण भगवद्धामात परत जाऊ शकू. हीच परमोच्च संसिद्धी (संधी) होय आणि ती मनुष्याला या जीवनात प्राप्त करून घेता येते. – स्वामी श्रील भक्तीवेदांत प्रभुपाद (साभार : आत्मसाक्षात्काराचे विज्ञान)

सिद्ध, अवलिया, योगी आणि संत यांनी सूक्ष्मातील जाणणे

सिद्ध, अवलिया, योगी आणि संत हे सतत निर्विचार स्थितीत असतात. त्यांना स्वतःचे असे काही विचार नसतात. ‘त्यांचे सर्वच ईश्वरेच्छेने चालू आहे’, याचे ज्ञान त्यांना झालेले असते. हे सिद्ध मायेच्या भौतिक जगात नसून दैवी जगात वावरत असतात. ते सतत ईश्वरी अनुसंधानात असतात. त्यांच्या मनाची निर्विचार स्थिती असल्याने त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अधिक असते. ते बाह्यतः अतिसामान्य … Read more

अनंत आणि सर्वज्ञानी ईश्वराशी एकरूप होण्यासाठी प्रत्येक दिवशी उत्तरोत्तर साधना करण्याचा ध्यास वाढायला हवा !

ज्ञान अमर्याद आहे. ‘अनंताचे ज्ञान आहे’, असे म्हटले जाते. मग या ज्ञानाला सर्वतोपरी जाणणारा ईश्वरही अनंत नाही का ? या अनंताशी आपल्याला एकरूप व्हायचे असेल, तर आपल्याला किती साधना केली पाहिजे !; म्हणूनच आपल्या साधने संदर्भात आपण कधीच समाधानी असू नये. ‘प्रत्येक दिवशी उत्तरोत्तर साधना करण्याचा ध्यास वाढतच जावा’, हीच त्या अनंताच्या चरणी प्रार्थना ! … Read more

नाम किती घ्यावे ?

​‘संत तुकाराम महाराज यांनी ‘नाम किती घ्यावे ?’, याविषयी सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘शिंक येणे, जांभई येणे आणि खोकला येणे, ज्यामुळे भगवंताचे नाम घेण्यात व्यत्यय येईल, इतकाही आमचा वेळ वाया न जावा.’ – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ