हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना आवश्यक !

‘नामजपाने दैवी शक्तींचे साहाय्य लाभते. अर्जुन उत्तम धनुर्धर होताच; पण त्याचसमवेत तो श्रीकृष्णाचा भक्तही होता. बाण सोडतांना तो नेहमी श्रीकृष्णाचा नामजप करत असे. त्यामुळे त्याचे बाण आपोआप लक्ष्यवेधी होत असत. श्रीकृष्णाच्या नामजपामुळे अर्जुनाच्या मनातील लक्ष्यवेध घेण्याचा संकल्प सिद्ध होत असे. नामजपाने प्रत्येक कर्म अकर्म होते, म्हणजे त्या कर्माचे पाप-पुण्य लागत नाही. यावरून ‘हिंदु राष्ट्राच्या (सनातन … Read more

‘साधना न करता हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) येईल’, असे समजू नका !

पराक्रमी असणार्‍या पांडवांनाही कौरवांविरुद्धच्या युद्धात श्रीकृष्णाचे साहाय्य घ्यावे लागले, तर श्रीकृष्ण आणि साधना यांविना ‘आम्ही हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करू’, असे म्हणणे किती हास्यास्पद आहे, हे लक्षात येईल. ‘साधनेचे बळ आणि समर्थ रामदासस्वामींचे मार्गदर्शन असल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यशस्वी झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुतेक क्रांतीविरांमध्ये प्रखर राष्ट्राभिमान असूनही साधनेचे बळ … Read more

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्माचरण करून आध्यात्मिक सामर्थ्य वाढवा !

‘धर्माचरण आणि साधना केल्याने हिंदु धर्माच्या श्रेष्ठत्वाची अनुभूती येते. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व कळल्यानंतरच खरा धर्माभिमान निर्माण होऊन समाज, राष्ट्र अन् धर्म यांचे खरे हित साधण्यासाठी प्रयत्न होतात. धर्माचरण आणि साधना केल्यामुळे व्यक्ती धर्मनिष्ठ होते. धर्मनिष्ठा असलेली व्यक्ती हिंदु धर्माची हानी स्वतः करत नाही आणि दुसर्‍यांनी धर्महानी केल्यास ती त्यास विरोध करते; म्हणून धर्मरक्षणाचे खरे कार्य … Read more

सनातनच्या साधनेचे वैशिष्ट्य

‘साधनेचे एक मूलभूत तत्त्व आहे, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग !’ अशी साधना केवळ सनातन संस्थाच शिकवते. प्रत्येकाचा साधनामार्ग, उदा. भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग इत्यादी आणि आध्यात्मिक पातळी, वय, शारीरिक क्षमता इत्यादी निरनिराळे असते. त्यामुळे प्रत्येकाची प्रकृती पाहून सनातनमध्ये प्रत्येकाला निरनिराळी साधना सांगितली जाते. डॉक्टर जसे प्रत्येक रुग्णाला निरनिराळे औषध देतात, विद्यार्थी जसे निरनिराळे शिक्षण घेतात, … Read more

सध्याचा प्रतिकूल काळ म्हणजे आत्मचिंतन करण्याचा काळ आहे !

‘अनुकूल काळात नव्हे, तर प्रतिकूल काळातच साधकाच्या साधनेची खरी परीक्षा होते. आपत्कालीन स्थितीत आत्मपरीक्षण करण्याची नामी संधी असते. ‘अशा काळात आपली मनःस्थिती कशी आहे ? प्रतिकूलतेला सामोरे जाण्याची मनाची कितपत सिद्धता आहे ?’, याचे चिंतन करता येते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली अमूल्य शिकवण आपल्या अंतर्मनात खरोखरंच रुजली आहे का ?’, याचे मूल्यमापन करणेही सोयीचे जाते. … Read more

देवाच्या कृपेचे महत्त्व !

‘देवाची कृपा अनुभवल्यावर समाजातून कुणी कौतुक केले, तरी त्याची किंमत शून्य वाटते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘साधना’ हीच खरी लस

‘एखादा रोग होऊ नये; म्हणून लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करतो, तसेच तिसर्‍या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना हीच लस आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अध्यात्मातील संशोधनाचे महत्त्व !

‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने तसे करावे लागत नाही. अध्यात्मातील संशोधन हे विज्ञानयुगातील सध्याच्या पिढीचा अध्यात्मावर विश्‍वास बसून ती अध्यात्माकडे वळण्यासाठी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

साधना ही मानवासाठी अनन्यसाधारण !

‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कुणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांसमवेत दुरावा, भांडण होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

अध्यात्माचे महत्त्व

‘जगातील इतर सर्व विषयांचे ज्ञान अहंकार वाढवते, तर अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, जो अहंकार अल्प करण्यास साहाय्य करतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले