मनोविकार

मनोविकारांवर मात करण्यासाठी आपले आत्मबळ वाढवणे आवश्यक असते. त्यासाठी ‘भगवंताचे नाम’ ही आपली आत्मऊर्जा आहे. नामाच्या शक्तीने ईश्‍वराचे अनुसंधान वाढण्यास साहाय्य होते. ईश्‍वरी अनुसंधानाच्या ऊर्जेने आत्मबळ वाढून मनातील विकार दूर होतात. त्याने मनोबळही आपोआपच वाढते. मनाच्या दैवी शक्तीमुळे आत्म्यातील चिरंतन शक्तीची जाणीव होण्यास साहाय्य होते.’ – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

द्वैत नष्ट करणे आणि द्वैतभाव संपणे

द्वैत नष्ट करणे साधनेतील एक प्रक्रिया आहे. ‘तू’ (देव) आणि ‘मी’ वेगळे आहोत’, या विचाराचे निर्मूलन होणे, याला ‘द्वैत नष्ट होणे’, असे म्हणतात. ‘स्वभावदोष निर्मूलना’च्या प्रक्रियेतून ‘मी’चे अस्तित्व संपून जाते, तर ‘अहं निर्मूलना’च्या प्रक्रियेतून देवाशी एकरूप होणे सोपे जाते. यालाच ‘द्वैतभाव संपणे’, असे म्हणतात. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

कला-उपासक आणि कलाकार यांच्यातील भेद

१. कला-उपासक : जो निरपेक्ष भावाने आणि त्यागी वृत्तीने ‘ईश्‍वरप्राप्ती’ हा उद्देश ठेवून कलेची साधना करतो, तो ‘कला – उपासक’ होय. कला-उपासक म्हणजे ‘कला हेच ज्याचे उपास्य दैवत आहे असा तो.’ १ अ. कला-उपासक म्हणजे कलेची उपासना करणारा, म्हणजे कलेलाच देव समजून समर्पित भावाने त्याच्या कलेचे सादरीकरण करणारा : ‘कलाकार’ या शब्दाच्या तुलनेत ‘कला-उपासक’ या … Read more

संगीतकला आणि वाद्यकला यांच्या माध्यमातून होणारी साधना

१. संगीतकला : संगीतकलेमध्ये देहाची आतून साधना होते. संगीत साधनेत साधकाचा देहच माध्यम असल्याने निर्माण होणारे चैतन्य थेट देहावर अंतर्बाह्य परिणाम करते. २. वाद्यकला : वाद्यकलेमध्ये देहाची बाहेरून साधना होते. बाह्यवस्तूचा आधार घेऊन चैतन्य निर्माण करावे लागते. वाद्यकलेच्या माध्यमातून देवापर्यंत जाणे संगीत साधनेच्या तुलनेत कठीण असते; परंतु देवाप्रती भाव असेल, तर अशक्य असे काहीच नसते. … Read more

‘समजून घेणे आणि सांभाळून घेणे’, म्हणजे साधना !

‘समजून घेणे, म्हणजे ‘अध्यात्म समजून घेणे’ आणि ‘सांभाळून घेणे, म्हणजे ‘अध्यात्म समजून स्वतः तसे जगणे अन् इतरांनाही आध्यात्मिक आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना साधनेत पुढे जाण्यास साहाय्य करणे.’ -श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

भगवंताच्या अनुसंधानामुळे मन तणावमुक्त आणि शांत होणे

भगवंताचे अनुसंधान मनुष्याला तणावमुक्त करते. तणावमुक्त मन हे शांतीचे माहेरघरच असते. शांतीच्या स्पर्शामुळे मनुष्याचे आयुष्य वाढते. योग्यांचे असेच असते. सर्वसामान्य मनुष्यापेक्षा योग्यांच्या दोन श्‍वासांतील अंतर अधिक असते. त्यामुळे योग्यांचे आयुष्यमान इतरांपेक्षा अधिक असते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

देहात ‘मनमंदिर’ निर्माण करणे

मन शुद्ध असेल, तरच त्याचे मंदिर होते. जिथे शुद्धता असते, तिथे सात्त्विकता येते. सात्त्विक ठिकाणीच भगवंताचा वास असतो. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलन-प्रक्रियेने मन शुद्ध अन् पवित्र झाल्याने देहात ‘मनमंदिर’ निर्माण होते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

साधनेच्या प्रवासात अखंड सावधानता असणे आवश्यक आहे

१. महर्षींनी साधकांना श्रद्धा वाढवायला सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना ‘विविध त्रास होत असतांनाही साधक साधना करतच आहेत, अजून किती करणे अपेक्षित आहे ?’, असा प्रतिप्रश्न विचारणे ​ ‘एकदा एका नाडीपट्टीवाचनामध्ये महर्षींनी साधकांना उद्देशून सांगितले, ‘‘साधकांची देवावरील श्रद्धा अजून वाढायला हवी.’’ यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘या आपत्काळातही तीव्र त्रासांमध्ये माझे साधक … Read more

मानवाचा संसाराशी तात्कालिक संबंध

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे । समेत्य च व्यपेयातां कालमासाद्य कञ्चन ॥ -रामायण, काण्ड २, सर्ग १०५, श्‍लोक २६ अर्थ : ज्याप्रमाणे महासागरात वहात जाणारी दोन लाकडे कधी एकमेकांना भेटतात आणि काही काळाने विलग होतात, त्याप्रमाणे दोन माणसे काही काळासाठी एकत्र येतात आणि कालचक्राच्या गतीने विलग होतात. ‘कुठून तरी या संसारात एकत्र आलेले, … Read more

आहाराचा मनावर होणारा परिणाम !

‘आहार पवित्र अथवा अपवित्र असल्यामुळे तो खाल्ल्यामुळे आपले मनही पवित्र अथवा अपवित्र बनते. भोजन करतांना उद्भवणारे मानसिक संस्कार आणि विचारांचे प्रकार यांचा खाल्लेल्या अन्नावर परिणाम होऊन मनाची विशिष्ट स्थिती होते. शुद्ध आहार, शुद्ध वृत्तीच्या मनुष्याकडून झालेली शुद्ध पाकसिद्धी, भोजनाच्या पंक्तीतही आपल्या नुसत्या दर्शनाने सद्भाव उत्पन्न करू शकणार्‍या उच्चकोटीतील आदर्श व्यक्तींची उपस्थिती आणि त्या समवेतच त्या … Read more