गुरूंनी शिकवल्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करण्याचे महत्त्व !

गुरुमुखातून आलेले शब्द नादरूपाने आकाशमंडलात रहातात. गुरूंचे हे चैतन्यमय शब्द प्रत्यक्षात उतरवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अध्यात्मात गुरूंनी शिकवल्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे आहे, तरच आपली प्रगती होते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

भावातील सातत्य आपली आध्यात्मिक पातळी वाढवते

देवाप्रती भाव असेल, तर तो प्रत्येक परिस्थितीत आपल्याला स्थिर ठेवतो. भावातील सातत्य आपली आध्यात्मिक पातळी वाढवते आणि आपल्याला साधनेत पुढे नेते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

मन चांगले आणि शुद्ध असल्यावर सर्व करता येते

‘मन चांगले आणि शुद्ध असल्यावर सर्व करता येते. मन निर्मळ झाल्यावर आपोआपच आपली फलनिष्पत्ती वाढते. मनाच्या निर्मळतेमुळे कोणतेही कर्म करतांना आनंद मिळतो आणि मनुष्य ताणमुक्त होऊन लवकर ईश्वरापर्यंत पोचतो. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

ईश्‍वरप्राप्ती ही पूर्णकालीन साधना !

‘ईश्‍वरप्राप्ती हे अर्धवेळ काम (Part time job) नसून ती पूर्णकालीन साधना आहे. यासाठी आपली प्रत्येक कृती आपण भक्तीभावाने केली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतियांनो, साधनेचे महत्त्व लक्षात घ्या !

‘हल्ली पाश्‍चात्त्य देशांत बहुधा भांडायला हक्काचे कुणी असावे; म्हणून लग्न करतात ! पुढे भांडणाचा कंटाळा आला की, घटस्फोट घेतात. नंतर पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा घटस्फोट घेतात. असे चक्र चालू रहाते ! आपल्याकडे ही स्थिती होऊ नये; म्हणून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरुमंत्राचे महत्त्व लक्षात न घेता गुरूंच्या देहाच्या नावात अडकणारे शिष्य !

‘शिष्याच्या उद्धारासाठी गुरु शिष्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार गुरुमंत्र म्हणून एखाद्या देवतेचा नामजप करण्यास सांगतात. हा नामजप त्या साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक/पूरक असतो, तसेच त्या जपामागे गुरूंचा संकल्पही कार्यरत असतो. गुरुमंत्राचे इतके अनन्यसाधारण महत्त्व असतांना बहुतेक शिष्य गुरुमंत्राकडे दुर्लक्ष करून गुरूंचेच नाव घेतांना दिसतात. यातून त्या शिष्यांची प्रगती होण्याची गती न्यून होतेच, तसेच ते गुरूंच्या सगुण रूपात … Read more

साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व लक्षात घ्या !

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करायची असल्यास जगातील भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू नका; कारण भारतियांची स्थिती वाईट असली, तरीही भारताइतका सात्त्विक देश जगात कुठेही नाही. इतर सर्व देशांत रज-तमाचे प्रमाण अत्यधिक आहे. ५० टक्के आध्यात्मिक पातळीहून अधिक पातळी असलेले मात्र जगात कुठेही राहून साधना करू शकतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधना करतांना आपली प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याची दृष्टी पालटते !

एखादी कृती किंवा घटना यांना काळानुसार आपण ‘देवाची लीला’ म्हणू शकतो. साधना करतांना आपली प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याची दृष्टी पालटते. जीवनात दुःख आले, तरी साधकाला ती भगवंताची एक लीलाच वाटते; परंतु सामान्य माणसाला मात्र तीच गोष्ट दुःख देऊन जाते. श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

ईश्‍वरप्राप्ती करून देणार्‍या संतांचे महत्त्व जाणा !

‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्‍वरप्राप्ती करून देणारे संत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले