अन्नपाणी ग्रहण करण्याप्रमाणेच भावजागृतीचे प्रयत्न करणे, हे आपले नित्य कर्म !
‘आपण जसे प्रतिदिन अन्नपाणी ग्रहण करतो, तसे प्रतिदिन भावजागृतीचे प्रयत्न करणे, हे आपले नित्य कर्म आहे. ते केल्यानेच आपण आपत्कालात जिवंत राहू शकतो.’
‘आपण जसे प्रतिदिन अन्नपाणी ग्रहण करतो, तसे प्रतिदिन भावजागृतीचे प्रयत्न करणे, हे आपले नित्य कर्म आहे. ते केल्यानेच आपण आपत्कालात जिवंत राहू शकतो.’
‘वर्ष २००० ते २००३ या काळात फोंडा येथील सुखसागर सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः साधकांसाठी सत्संग घेत असत. त्या वेळी नुकतेच वाईट शक्तींचे त्रास चालू झाले होते. साधकांना पुष्कळच त्रास होत होते. त्या कालावधीपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला ‘वाईट शक्तींचे जग कसे असते ?’ याविषयी माहिती द्यायला प्रारंभ केला. त्या वेळी त्यांनी … Read more
सध्या समाजाची स्थिती अत्यंत बिकट असून तरुण मुले-मुली हिंदु संस्कृतीचा र्हास करत असल्याचे दिसणे ‘सध्या समाजाची स्थिती अत्यंत बिकट आहे. तरुण मुले-मुली आपल्या हिंदु संस्कृतीचा र्हास करतांना दिसत आहेत. मुला-मुलींचे कपडे, त्यांची केशरचना आणि मुलींच्या कपाळावर कुंकू नसणे हे सर्व पाहिल्यावर अयोग्य वाटते, एकूणच तरुणांचे राहणीमान, वागणे-बोलणे इत्यादी सर्वच गांभीर्याने विचार करण्याजोगे आहे. साम्यवाद आणि … Read more
‘काळाला अनुकूल अशी आपली साधना हवी. राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना केवळ व्रते करण्यापेक्षा घरोघर जाऊन निद्रिस्त समाजाला साधना सांगून त्याला जागृत केले पाहिजे, म्हणजेच समष्टी साधना केली पाहिजे. समाजाला योग्य-अयोग्य गोष्टींची जाणीव करून द्यायला हवी. सर्व समाजाचे उत्थापन म्हणजेच हिंदु राष्ट्राची निर्मिती !’
‘कर्म कुठले करायचे ?’, ते आपल्या हातात असते. ‘त्याचे फळ केव्हा द्यायचे ?’, हे देवाच्या हातात असते.
अध्यात्मात वेडे झाल्यानंतरच शहाणपण येते, म्हणजे देवाचा ध्यास घेऊन साधना केली की, आध्यात्मिक उन्नती होऊन संतपदाकडे वाटचाल होते.’ – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
आश्रमात राहिल्याने आवड-नावड संस्कार घटतो, दुसर्याचे ऐकण्याची सवय लागते आणि परेच्छेने वागावे लागते. त्यामुळे मनोलय होण्यास साहाय्य होते.
जीवनात चिरंतन जागृती हवी. देहातून प्राण निघून गेल्यानंतर चिरनिद्राच आहे; कारण त्या वेळी उठवले, तरी माणूस उठत नाही.
काळ हा आपल्याला अध्यात्म शिकवणारा उत्तम शिक्षक आहे. तो आपल्यासाठी परिस्थिती, परिणाम, प्रारब्धामुळे येणार्या सुख-दुःखाच्या गोष्टी असे सर्व घेऊन येत असतो. काळाला ईश्वर समजून सामोरे गेले, तर जीवनातील नित्य घडणार्या गोष्टींचे काहीच वाटत नाही. त्यामुळे आपल्याला प्रारब्धावर सहजतेने मात करता येते.
अध्यात्मातील कृतीचे महत्त्व सनातन संस्थेत सप्ताह, पारायणे होत नाहीत, तर साधनेत कृती करून पुढे जाण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन सत्संग आणि साधनेचा आढावा घेणे हे नित्यनियमाने होते. पारायणातून केवळ तात्त्विक माहिती मिळते; परंतु स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेतून अहं लवकर अल्प झाल्याने देवाविषयीच्या अनुभूती लवकर येतात. केवळ पारायण न करता साधनेची प्रत्यक्ष कृती केल्यास ईश्वराविषयीची प्रायोगिक … Read more