साधना करतांना अध्यात्मशास्त्राचे महत्त्व !

‘अध्यात्मशास्त्र म्हणजे ईश्वरप्राप्तीच्या संदर्भातील तात्त्विक माहिती, तर साधना म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी करावयाच्या कृती. त्यामुळे काही जणांना प्रश्न पडतो की, ‘प्रत्यक्ष कृती करणे, म्हणजे साधना करणे महत्त्वाचे असतांना अध्यात्मशास्त्र किती महत्त्वाचे असते?’ त्याचे उत्तर म्हणजे, साधना करतांना ईश्वरप्राप्तीच्या टप्प्याला जाईपर्यंत साधकाला अनेक अनुभूती येतात. या अनुभूतींबद्दल त्या साधकाला अनेक प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर, म्हणजे त्याच्या … Read more

बुद्धीप्रामाण्यवादी आणि कुंडलिनी शक्ती !

साधना केल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होते. हे आतापर्यंतच्या युगांत लाखो साधकांनी अनुभवले आहे; पण साधनेवर विश्‍वास नसणारे बुद्धीप्रामाण्यवादी साधना न करता म्हणतील, ‘कुंडलिनी दाखवा, नाहीतर ती नाहीच !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘देवाण-घेवाण हिशोब’ निर्माण होऊ नये; म्हणून कधी कुणाकडे काही मागू नका !

‘व्यक्तीने जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकण्याचे एक कारण असते त्याचा इतरांशी असणारा ‘देवाण-घेवाण हिशोब’ ! दोन व्यक्तींमधील ‘देवाण-घेवाण हिशोब’ निर्माण होण्याचे एक कारण म्हणजे, एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीकडून काहीतरी मागून घेणे. अशा मागण्यामुळे आपण इतरांचे देणेकरी होतो. त्यामुळे शक्यतो कधी कुणाकडे काही मागू नये. काही कारणास्तव मागायची वेळ आल्यास त्याची शक्य तितक्या तत्परतेने परतफेडही करावी. असे असले … Read more

स्थुलापेक्षा सूक्ष्मातून अनुभवण्याचा लाभ

‘जे साधक स्‍थुलातून माझ्‍याकडे पहातात, त्‍यांना मी काही घंटेच त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवास येते. जे साधक मला सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा प्रयत्न करतात, त्‍यांना मी २४ घंटे त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवता येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

स्थूल आणि सूक्ष्म देहांच्या शुद्धीसाठी करावयाची साधना !

देहाचा प्रकार आणि करावयाची साधना १. स्थूल – उपवास, प्राणायाम, हठयोग २. सूक्ष्म ( मन ) – नामजप, स्वभावदोष निर्मूलन ३. कारण (बुद्धी) – अध्यात्माचा अभ्यास ४. महाकारण (अहं) – कृतज्ञता, शरणागती आणि श्रद्धा वाढवणे, तसेच अहंनिर्मूलनाचे प्रयत्न करणे – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

शरीरशुद्धीला महत्त्व द्या !*

‘शरीर ही पहिली वास्तू आहे. प्रथम तिच्या शुद्धीचा विचार करावा, नंतर बांधलेल्या वास्तूचा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

ईश्वरप्राप्तीसंदर्भात मनुष्याची लाजिरवाणी उदासीनता !

‘धनप्राप्ती, विवाह, आजारपण इत्यादी अनेक कारणांसाठी अनेक जण तोडगे विचारतात; पण ईश्‍वरप्राप्तीसाठी तोडगा विचारण्याचा कोणी विचारही करत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

नोकरीसाठी शैक्षणिक पात्रतेबरोबरच वैयक्तिक गुणही महत्त्वाचे!

‘कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याला केवळ त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राने नोकरी न देता त्याचे वैयक्तिक गुण पाहूनही निवड करणे आवश्यक आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

जगातील सर्वश्रेष्ठ पदवी !

‘जगात अनेक विषयांच्या अनेक पदव्या आहेत. ‘डॉक्टरेट’ सारख्या अनेक उच्च स्तरावरच्या पदव्या आहेत; मात्र त्यांपेक्षाही सर्वश्रेष्ठ पदवी आहे, ‘खर्‍या गुरूंचा ‘खरा शिष्य’ ! ’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !

‘पूर्वी समाजात असलेली सात्त्विकता, सामंजस्य, प्रेमभाव इत्यादी गुणांमुळे समाजव्यवस्था नीट रहावी; म्हणून काही करावे लागायचे नाही. आता समाजात ते घटक निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षण दिले जात नसल्यामुळे कायद्याचे साहाय्य घेऊन समाजव्यवस्था नीट रहाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जातो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले