अंतर्ज्ञानी भारतीय ऋषि !

‘पाश्‍चात्त्यांना संशोधनासाठी यंत्रे लागतात. ऋषींना आणि संतांना लागत नाहीत. त्यांना यंत्रांच्या अनेक पटींनी माहिती मिळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांमुळे लग्न टिकणे कठीण होत असणे !

‘सत्ययुग ते द्वापरयुग या काळात सर्वजण सात्त्विक असायचे. त्यांच्यात स्वभावदोष आणि अहं अल्प असायचे. ते साधना करत असल्यामुळे त्यांचा एकमेकांना समजून घेण्याचा भाग होत असे. कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता वाढत चालल्यामुळे लग्न टिकणे कठीण होऊ लागले आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.१२.२०२१)

स्वयंपाकघरातील सेवेचे महत्त्व !

‘कुटुंब असो वा आश्रम असो, प्रत्येकाचा स्वयंपाकघराशी संपर्क असतो. त्यामुळे येथे सेवा केल्यास प्रत्येकाशी संपर्क येतो. येथे प्रत्येकाची आवड-नावड, पथ्य या सर्व गोष्टी कळतात. त्यामुळे अनेकांशी जवळीक होते. याचा सर्वांत मोठा लाभ म्हणजे, आपण स्वतःला विसरून इतरांचा विचार करू लागतो. त्यातून अहं अल्प होतो आणि प्रेमभाव वाढतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.११.२०२१)

स्मशानामध्ये ‘अश्मा’ ठेवण्याची सोय करावी, हेही शासनाला न सांगणारे लज्जास्पद लोकप्रतिनिधी !

‘धर्मशास्त्रानुसार स्मशानातील अंत्यविधींसाठी ‘अश्मा’ अत्यावश्यक आहे; परंतु आजकाल शहरांमध्ये आवश्यक त्या आकाराचा दगड ‘अश्मा’ म्हणून मिळणे कठीण जाते. यासाठी शासनाने स्मशानभूमीमध्ये ही सोय करणे आवश्यक आहे. राज्यकर्त्यांनो, लोकांच्या अशा लहान लहान आवश्यकता लक्षात घेऊन त्यांची स्वतःहून पूर्तता केली, तर निवडणुकांपूर्वी मते मागण्यासाठी घरोघरी जावे लागणार नाही, हे लक्षात घ्या !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले … Read more

हिंदूंनो, साधनेस आरंभ करा !

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कलियुगातील रज-तमप्रधान वातावरणातही साधना करता येण्यासाठी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती !

‘पूर्वीच्या युगांमध्ये समाज सात्त्विक होता. त्यामुळे ज्ञानयोग, ध्यानयोग, हठयोग यांसारख्या विविध मार्गांनी साधना करू शकत असे. कलियुगामध्ये समाज साधना करत नसल्यामुळे पूर्ण वातावरण रज-तमप्रधान झाले आहे. त्यामुळे पूर्वीसारख्या साधनामार्गांनी साधना करणे अतिशय कठीण झाले आहे. अशा या रज-तमप्रधान वातावरणातही साधना करता येण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.११.२०२१)

राजकीय पक्ष जनतेला स्वार्थी बनवतात याउलट साधना त्याग करायला शिकवते !

‘राजकीय पक्ष ‘आम्ही हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवतात आणि स्वार्थामुळे जनतेत भांडणे होतात. याउलट साधना त्याग करायला शिकवते. त्यामुळे जनतेत भांडणे होत नाहीत, तर सर्व जण एक कुटुंब म्हणून आनंदात राहतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘माझेच गुरु श्रेष्ठ आहेत !’, असे म्हणणे हा शिष्याचा आत्मकेंद्रितपणा आणि अहंकार होय !

‘प्रत्येक संतांचा साधनामार्ग आणि त्यांचे या भूतलावरील कार्य निराळे असते. काही संत चमत्कार करून लोकांचा अध्यात्म आणि देव यांवरील विश्वास वाढवतात. काही संत लोकांच्या सांसारिक समस्यांचे निवारण करून त्यांना साधनेसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देतात, तर काही संत साधकांकडून केवळ साधना करवून घेतात. याचा अर्थ संत प्रत्येक टप्प्याला अडकलेल्या जिवांना त्यांच्या टप्यातून पुढे घेऊन जात … Read more

सनातनच्या साधकांना मिळणारे कल्पनातीत आध्यात्मिक ज्ञान !

‘कथा आणि कादंबर्‍या यांमधून मांडण्यात येणार्‍या संकल्पना काल्पनिक असतात. त्यात मांडलेल्या विचाराला विज्ञानाचा आधार नसतो. सध्याचा भ्रमणभाषचा शोध हा १८ – १९ व्या शतकातील लोकांसाठी कल्पनातीत होता. काल्पनिक आणि कल्पनातीत या दोन शब्दांमध्ये असा भेद आहे. तशाच प्रकारे सनातनच्या काही साधकांना मिळणारे विविध विषयांवरील ज्ञान हे ‘कल्पनातीत’ आहे. या ज्ञानात दिलेली एखाद्या घटनेमागील आध्यात्मिक कारणमीमांसा … Read more