हिंदु धर्माचे माहात्म्य !
‘कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे ‘हे विश्वचि माझे घर’, असे शिकवणार्या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे ‘हे विश्वचि माझे घर’, असे शिकवणार्या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण, वायूप्रदूषण इत्यादींसंदर्भात नेहमी बातम्या येतात; पण त्यांचे मूळ असलेल्या रज-तमाच्या प्रदूषणाकडे मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी कुणाचेच लक्ष जात नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कुठे आपल्या पूर्णपणे नियंत्रणात असलेल्या आपल्या १ – २ मुलांवरही सुसंस्कार करता न येणारे हल्लीचे पालक, तर कुठे आपल्या सहस्रो भक्तांवर साधनेचे संस्कार करणारे संत आणि गुरु !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्यांचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘तिसरे महायुद्ध जसे जवळ येत आहे, तशी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यापूर्वी वाईट शक्ती साधक आणि समाज यांवर आक्रमण करत होत्या. आता आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने, तसेच तिसरे महायुद्ध जवळ आल्याने वाईट शक्तींच्या आक्रमणाचे प्रमाणही त्या तुलनेत वाढत चालले आहे. आता वाईट शक्ती संतांवरही आक्रमण करत असल्याचे लक्षात आले … Read more
‘कृतीशील हिंदूंनो, झोपलेल्या हिंदूंना जागृत करण्यात वेळ न घालवता आता जागृत हिंदूंना दिशा देण्याचे कार्य करा, तरच तुम्ही जवळ आलेल्या आपत्काळात वाचाल आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकाल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पोलीस आणि सैन्य यांचीच नव्हे, तर प्रशासनातील सर्वांचीच भरती करतांना हिंदु राष्ट्रात ‘राष्ट्र अन् धर्म यांवरील प्रेम’ हा सर्वांत मोठा घटक समजण्यात येईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
नवीन लोकांना भेटून ‘त्यांना साधना सांगणे, आपले कार्य सांगणे’, हे आपले साधनेतील कर्म आहे. त्या लोकांनी साधना करणे, न करणे हे त्यांचे कर्म आहे; पण आपण साधना सांगण्याचे आपले कर्म मनोभावे पूर्ण केल्याने त्यांच्या चित्तावर आपण सांगितलेल्या साधनेच्या गोष्टींचा संस्कार होतो. आपले कार्य त्यांच्या चित्तावर कोरले जाते. पुढे कुठल्यातरी जन्मात त्या लोकांना आपल्या कार्याचे, साधनेचे … Read more
‘भ्रष्टाचार उघडकीस आणणारे प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी दाखवा आणि १ लाख रुपये घ्या’, असे उद्घोषित केले, तरी कुणाला ते पारितोषिक कधी मिळेल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांत आणि विज्ञाननिष्ठांत ‘मला कळते, तेच सत्य’, असा अहंकार असतो आणि नवीन जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. त्यामुळे त्यांना असलेले ज्ञान अतिशय मर्यादित असते. त्यांना अनंताचे ज्ञान कधीच मिळत नाही. याउलट ऋषींना अहंकार नसल्याने आणि जिज्ञासा असल्याने त्यांची ज्ञानकक्षा वाढत वाढत जाते आणि ते अनंत कोटी ब्रह्मांडांचेही अनंत ज्ञान सांगू शकतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. … Read more
