परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेली टक्केवारी आणि उपकरणांद्वारे केलेले परीक्षण यांत साम्य असणे, ही त्यांच्या द्रष्टेपणाची प्रचीती !

वर्ष २००० पूर्वी साधक-चित्रकारांनी संगणकाद्वारे श्री गणपतीचे चित्र काढण्यास आरंभ केला आणि त्यांनी वर्ष २०१२ पर्यंत श्री गणपतीची एकूण ६ चित्रे प्रकाशित केली. प्रथम प्रकाशित केलेल्या चित्रात गणपतितत्त्व ४ टक्के आले असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे सांगितले.

सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांचे अद्वितीय कार्य आणि वैशिष्ट्ये यांचा संक्षिप्त परिचय !

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन-उपचारतज्ञ सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांनी व्यापक अध्यात्मप्रसारासाठी ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली. सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांनी शीघ्र ईश्‍वरप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती केली.

सनातनची गुरुपरंपरा !

‘भृगु महर्षींनी जीवनाडीपट्टी वाचनात सांगितले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्यातील गुरुशक्ती संक्रमित करून त्यांना (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना) ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित करावे.’

सर्वांवर अपार प्रीती करणारे आणि स्वत:च्या कृतीतून साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

प.पू. डॉक्टरांनी एखादी गोष्ट आपल्याला सांगितल्यावर आपल्याला समजली नाही आणि आपण ती त्यांना पुन्हा विचारली, तरी ते न रागावता आपल्याला ती गोष्ट समजेपर्यंत सांगतात.

सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले संत असतांनाही त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे शिवधनुष्य उचलले आहे ! एक मराठी व्यक्तीच असे करू शकते !

जेव्हा देशाची स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे, तेव्हा मराठी व्यक्तींनी देशाचा कार्यभार सांभाळला आहे. मराठी व्यक्तीच असे कार्य करू शकते, असे प्रतिपादन भाजपचे मध्यप्रदेशातील माळवा प्रांताचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. विवेक जोशी यांनी येथे केले. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कृतज्ञताभाव दर्शवणार्‍या अद्वितीय आणि आदर्शवत् कृती !

प.पू. डॉक्टर ‘प्रत्येक वस्तू देवानेच दिलेली आहे’, या कृतज्ञतेने अतिशय प्रेमाने ती हाताळतात. प्रत्येक वस्तूचा अगदी शेवटपर्यंत वापर करतात. त्यांच्या कृतज्ञताभावामुळे वस्तूंमध्ये जिवंतपणा येतो.

बंगालमधील डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के, तर डॉ. कौशकचंद्र मल्लिक आणि तमिळनाडू येथील अर्जुन संपथ यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

बंगालसारख्या प्रतिकूल परिस्थितीत धर्मशास्त्राची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य करणारे शास्त्रधर्म प्रचारसभेचे सचिव डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदू अधिवेशनात घोषित केले.

प.पू. डॉ. आठवले यांची खोली आणि त्यांच्याशी संबंधित वस्तू यांत झालेले बुद्धीअगम्य पालट !

परात्पर गुरु डॉ. आठवले हे समष्टी गुरु आणि जगद्गुरु असल्यामुळे त्यांचे अवतारी कार्य संपूर्ण ब्रह्मांडात चालू असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नवग्रह शांती’ या विधीसाठी संकल्प केल्याचा त्यांच्यावर झालेला परिणाम

हिंदु धर्मातील कोणताही धार्मिक विधी करण्यापूर्वी त्या विधीसाठी यजमानांनी संकल्प करणे आवश्यक असते. संकल्प केल्यामुळे ज्या उद्देशाने तो धार्मिक विधी केला जातो, त्याला दैवी अधिष्ठान प्राप्त होऊन इच्छित फलप्राप्ती होते.