ईश्वराचे अंशात्मक गुण असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांचे कार्य !
ईश्वराचे अंशात्मक गुण असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांचे कार्य !
ईश्वराचे अंशात्मक गुण असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांचे कार्य !
‘गुरूंवरील नितांत श्रद्धा आणि गुरुकार्याची तळमळ यांमुळे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले निःस्वार्थ भावाने समष्टी कार्य करत आहेत’, हे दर्शवणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या कुंडलीतील राजयोग !
ईश्वर हा अनंत रूपांनी नटलेला आहे; म्हणून त्याचे एक नाव अनंत असे आहे. तसेच प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) हेही भक्तवत्सल असल्यामुळे काळानुरूप आवश्यकता ओळखून अनंत रूपांनी साधकांसाठी प्रगट (अवतरित) होतात.
कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग अशा सर्वच साधनामार्गांचे सार असलेला ‘गुरुकृपायोग’ आचरण्यास सांगून साधकांना अल्पावधीत संतपदी पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत असलेले प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले !
संतांचे जीवन अद्भुत असते. संत जसजसे ईश्वराच्या समीप जातात, तसतसे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक गुणवैशिष्ट्यांत पालट होत जातात. संतांच्या चैतन्याचा परिणाम त्यांच्या वापरातील वस्तूंवरही होतो. अशा दैवी पालटांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल. या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःचा देह, वस्तू आणि वास्तू यांमधील पालटांचा अभ्यास केला आहे.
‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी अवतारी कार्य केले. तसेच कार्य या कलियुगात प.पू. डॉक्टर स्वतः नामानिराळे राहून लीलया करत आहेत. प.पू. डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी निवडक जिवांना आपल्यासमवेत आणलेच आहे.
‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहात मागील काही वर्षांपासून अनेक बुद्धीअगम्य पालट होत आहेत. या पालटांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्याच्या उद्देशाने ‘इस्मॉग स्पायन (Esmog Spion)’ या उपकरणाद्वारे चाचणी घेण्यात आली.
विदेशातील साधक जलद गतीने अध्यात्मप्रसार करतात. वर्ष २००७ – २००८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले होते की, विदेशातील साधक तीव्र तळमळीने साधना करून जलद आध्यात्मिक प्रगती करतील आणि पुढे भारतातील जिज्ञासू आणि साधक यांना साधना शिकवतील.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे अवतारी देहातूनही बालपणीपासूनच चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना, तसेच सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणार्यांना ते चैतन्य जाणवते.
परात्पर गुरूंविषयी सांगायचे झाले, तर ‘सगुण-निर्गुण भेदाभेद कर्म हेच खरे वर्म’ असे वर्णन करू शकतो. आजच्या या आपत्काळात सगुण स्तरावर साधकांना आवश्यक मार्गदर्शन करणारे आणि निर्गुण स्तरावर सर्व करवून घेणारे दुसरे, अशी दोन वेगवेगळी तत्त्वे नसून ते एकच परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत.