साधनेत आपली स्वेच्छा नष्ट करून सर्व ईश्‍वरेच्छेने करायचे, असे करता…

साधनेत आपली स्वेच्छा नष्ट करून सर्व ईश्‍वरेच्छेने करायचे, असे करता यायला लागले की, ईश्‍वरप्राप्ती होते. याउलट व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वेच्छेने वागणारे झपाट्याने अधोगतीला जातात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.१०.२०१६)

राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !

शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७५ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.११.२०१६)

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता अंतरात्म्याकडे लक्ष देणे आवश्यक असणे

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा आपण आपल्यावरील आवरणाकडे लक्ष देत असतो; पण त्याच्यातील कार्य करणार्‍या भगवंताकडे आपले लक्ष नसते. आपण त्यांच्या दोषांशी एकरूप न होता त्यांच्या स्थितीत जाऊन त्यांना दोष घालवायला कसे साहाय्य करता येईल ?, याचा विचार करायला हवा. आपण त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता त्यांच्यातील अंतरात्म्याकडे लक्ष द्यायला हवे. – प.पू. … Read more

बहुतेक संतांचे आणि संप्रदायांचे कार्य बुद्धीगम्य असते, तर सनातनचे कार्य…

बहुतेक संतांचे आणि संप्रदायांचे कार्य बुद्धीगम्य असते, तर सनातनचे कार्य बुद्धीअगम्य, म्हणजे बुद्धीपलिकडील, सूक्ष्म स्तरावरील असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अध्यात्मातील विविध पातळ्यांना होणा-या त्रासाचे प्रधान स्वरूप, त्रासाचे प्रमाण आणि त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रमाण

आध्यात्मिक पातळी अध्यात्मातील विविध पातळ्यांना होणार्‍या त्रासाचे प्रधान स्वरूप, त्रासाचे प्रमाण आणि त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रमाण : सनातनचे साधक आणि संत तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करत समष्टी साधना करत असतांना त्यांना वाईट शक्तींचा त्रास का होतो ?, असा प्रश्‍न काही जणांच्या मनात निर्माण होतो. त्याचे उत्तर पुढील तक्त्यावरून लक्षात येईल. … Read more

प.पू. डॉक्टरांच्या ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक आहे, ते ते ईश्‍वर देईल, या वाक्याची आलेली प्रचीती !

प.पू. डॉक्टरांच्या ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक आहे, ते ते ईश्‍वर देईल, या वाक्याची आलेली प्रचीती ! तमिळनाडू येथे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा ५० सहस्रांपेक्षा अधिक लोक भोजन भंडार्‍यासाठी आले होते. त्यासाठी किमान ७० ते ८० लक्ष रुपये व्यय आला होता; परंतु पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी … Read more

आता धर्ममार्तंडांनी तीर्थक्षेत्रे आणि मठ-मंदिरे येथून धर्मशुद्धीकरणाला प्रारंभ करणे, ही काळाची आवश्यकता !

आता धर्ममार्तंडांनी तीर्थक्षेत्रे आणि मठ-मंदिरे येथून धर्मशुद्धीकरणाला प्रारंभ करणे, ही काळाची आवश्यकता ! १. संत किंवा मठाधीश यांना चांगले उत्तराधिकारी न मिळणे आणि बहुतांश संतांकडे किंवा मठांमध्ये संपत्तीच्या लालसेमुळे वेतनधारी साहाय्यकांमध्ये संघर्ष चालू असणे : मी धर्मप्रसारानिमित्त अनेक संत आणि मठाधीश यांना भेटतो. तेव्हा ते सर्व जण सांगतात, तुमचे साधक आम्हाला सेवेसाठी द्या. आम्ही चांगले … Read more

सनातन धर्मातील भविष्य लिखाण आणि अन्य धर्मीय तथा राष्ट्रे यांचे इतिहास लिखाण यांतील भेद !

सनातन धर्मातील भविष्य लिखाण आणि अन्य धर्मीय तथा राष्ट्रे यांचे इतिहास लिखाण यांतील भेद ! १. ऋषींनी सांगितलेले सनातन धर्माचे (हिंदु धर्माचे) भविष्य, जे पुढे इतिहास झाले ! अ. वेद, चारही युगांविषयी, तसेच वाल्मीकिऋषींनी लिहिलेले रामायण असो, महर्षि व्यासांनी लिहिलेले महाभारत असो किंवा वर्तमानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २०२३ या वर्षी येऊ घातलेल्या हिंदु … Read more

माझे कार्य अधिक प्रमाणात सूक्ष्मातील असल्यामुळे इतर संतांप्रमाणे माझे नाव…

माझे कार्य अधिक प्रमाणात सूक्ष्मातील असल्यामुळे इतर संतांप्रमाणे माझे नाव हिंदूंमध्ये मोठे झाले नाही; पण सूक्ष्माचे अभ्यासक, सूक्ष्म जाणणारे संत आणि महर्षी यांच्यापर्यंत माझे नाव पोचले.

साधकांनो, महर्षींनी प.पू. डॉक्टरांना श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, असे संबोधण्यास सांगितले…

साधकांनो, महर्षींनी प.पू. डॉक्टरांना श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, असे संबोधण्यास सांगितले असण्याचा अर्थ लक्षात घ्या ! : सप्तर्षी जीवनाडीतील मजकूर सांगणार्‍या महर्षींनी मला श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, असे संबोधण्यास सांगितले आहे. साधकांना ही अपूर्व गोष्ट वाटेल. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, काही संतांना अनंत श्री, असे संबोधतात. त्यांच्या मानाने मी कोठेच नाही, हे लक्षात घ्या !