विज्ञान आणि अध्यात्मातील फरक

‘सध्याच्या काळात विज्ञानाने पुष्कळ प्रगती केली आहे’, असे सांगितले जाते. त्याचे एक उदाहरण म्हणून ‘विविध आजारांवर उपाय म्हणून ‘ॲलोपॅथी’ने विविध औषधांचा शोध लावला आहे’, असेही सांगितले जाते; परंतु विज्ञान ‘एखादी घटना घडण्याचे मूळ कारण शोधणे किंवा ‘ॲलोपॅथी’च्या दृष्टीकोनातून आजार होण्याचे मूळ कारण शोधणे आणि त्या मूळ कारणांवर उपाययोजना सांगणे’, करू शकत नाही. त्यामुळेच अनेकांना ‘एखाद्या … Read more

ईश्वरप्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?

‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्‍वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

खरे गुरु शिष्याकडून साधनेची प्रत्यक्ष कृती करून घेतात !

‘हे करा, ते करू नका’, असे बोलणारे अनेक जण असतात; पण ते तशी कृती किती जणांकडून करवून घेतात ? याउलट खरे गुरु शिष्याकडून ‘तन, मन आणि धन यांचा त्याग करायला शिकवणारी कृती’ करून घेतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्वराशी एकरूपता !

‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मृत्यू संकट नव्हे, तर संकटांतून सोडवणारा आशीर्वाद वाटणे !

‘७० – ७५ वर्षे आयुष्य जगल्यानंतर काही जणांना जीवनात आलेल्या कटु अनुभवांमुळे जगाचा कंटाळा येतो. अशा परिस्थितीत ‘बाहेर कुणाशी संपर्क नको. ‘मी आणि माझे जग’, यात रहावे’, असे त्यांना वाटते. महत्त्वाचे म्हणजे पुढे ‘आता लवकरच मृत्यू येऊन माझी या जगातून सुटका व्हावी’, असे वाटू लागल्यावर काही जणांना मरणाची ओढ लागते आणि मृत्यू हा संकट नव्हे, … Read more

कलियुगात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ हाच साधनेचा पाया आहे !

‘सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत माणसे सात्त्विक होती. त्यांच्यामध्ये स्वभावदोष आणि अहं अल्प होते. त्यामुळे ते कोणत्याही योगमार्गाने साधना करू शकत असत. आता कलियुग आहे. आता सर्वसामान्य मनुष्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे, म्हणजे तो सात्त्विक नसल्याने त्याला साधना करणे अशक्यप्राय होते. कलियुगातील मनुष्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास तो … Read more

विज्ञानाचे मूल्य ‘शून्य’ !

मानवाला माणुसकी न शिकवणार्‍या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘साधक’ या टप्प्यावर आल्यावर जिवाकडून होणारी साधना

‘जिज्ञासू साधना करू लागल्यावर तो ‘साधक’ या टप्प्याला येतो. या टप्प्याला आल्यावर साधनेतील ‘अनेकातून एकात येणे’, या नियमानुसार तो कर्मकांडातील पूजा, मंदिरात जाणे, उपवास करणे इत्यादी अनेक उपासनांऐवजी केवळ सांगितलेली साधनाच करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.९.२०२१)

मनुष्यजन्माचा उद्देश !

मनुष्यजन्म हा साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून जिवाची मुक्तता करण्यासाठी आहे. त्यामुळे जे काही भोग शेष राहिले असतील, तेही भोगून संपवावेत. देव जिवाला साधना करून मोक्षप्राप्ती करवून घेण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर मनुष्यजन्म देतो; पण मनुष्य हे विसरतो आणि मायेच्या मागे लागून संपूर्ण जीवन व्यर्थ घालवतो.’ – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

व्यवहारातील माणसाचा अहं आणि साधकाचा भाव

‘व्यवहारात माणसाला अहं असतो, ‘माझे आणि माझ्या घरच्यांचे जीवन मी चालवत आहे. मी नसलो, तर माझ्या मागे माझ्या बायका-पोरांचे, नातलगांचे काय होईल ?’ काही कारणामुळे त्या व्यक्तीचे निधन होते. त्या वेळी देव दाखवून देतो, ‘तो मनुष्य नसतांनाही त्याचे घर चालले आहे. त्याचे कुटुंबीय जीवन जगत आहेत.’ मायेमध्ये जगतांना हे जगणे कठीण असते; कारण ‘मी सर्व … Read more