‘हिंदु राष्ट्रा’साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘नष्ट करणे सोपे असते; पण घडवणे कठीण असते. असे असले, तरी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधक आणि हिंदु राष्ट्र यांना घडवायचे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देणारी जनताच भारताच्या -हासास कारणीभूत !

‘गेल्या ७४ वर्षांमध्ये भारताची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये अतोनात अधोगती झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय जनतेने वेळोवेळी निवडून दिलेले भ्रष्ट राजकारणी ! एका अर्थाने भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देणारी भारतीय जनताच भारताच्या र्‍हासास कारणीभूत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ज्यांच्या माध्यमातून चमत्कार घडतात, त्यांच्यावर होणारे आध्यात्मिक परिणाम !

१. कमी आध्यात्मिक पातळीचे : ‘मी हा चमत्कार घडवला’, असे वाटून त्यांचा अहंकार वाढतो. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी अल्प होत जाते. २. अधिक आध्यात्मिक पातळीचे : ‘ईश्वराने हा चमत्कार घडवला’, याची जाण असल्याने त्यांचा ईश्वराप्रतीचा भाव वाढत जातो. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी वाढत जाते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१०.२०२१)

सध्याची समाजस्थिती डोळे झाकून आंधळ्याच्या मागेच जाणे

‘थोडासा विचार केल्यास जगातील वैभव आणि सुख यांसाठी धडपडणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. सध्याच्या लोकशाहीप्रमाणे बहुमताचा निर्णय मानून, जगातील सुखात समाधान मानून, तेच आपल्या जीविताचे इति कर्तव्य आहे, असे जर समजलो, तर ‘विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः ।’ (नीतिशतक, श्‍लोक १०) ‘म्हणजे विवेकभ्रष्ट झालेल्या लोकांचे अनेक प्रकारे अधःपतन होते’ या सुभाषिताप्रमाणे सर्व बाजूंनी अधःपतनच होईल. … Read more

शिकण्याच्या स्थितीत रहाणे – साधनेला अत्यंत पोषक घटक !

१. शिकण्याची स्थिती ‘सत्संग, बैठक, प्रसार, संपर्क अथवा एखादी सेवा केल्यानंतर ‘मला काय शिकायला मिळाले ?’, असा विचार माझ्या मनात लगेच येतो का ?’, असा विचार मनात येणे, म्हणजेच शिकण्याच्या स्थितीत रहाणे होय. हे साधनेला अत्यंत पोषक आहे. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. अनंत काळ शिकत राहिले, तरी शिकणे पूर्ण होऊ शकत नाही. भगवंत साधकांना … Read more

जीवनात संघर्ष जितका मोठा, तितके यशही मोठे !

‘प्रत्येक मनुष्याला जीवनात कधी ना कधी तरी कुठल्या ना कुठल्या तरी स्तरावर संघर्ष हा करावाचा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनाही जीवनात प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्यांनी संघर्षाला मोठ्या धैर्याने तोंड दिले; म्हणून त्यांना पुढे यश अन् कीर्तीही मोठी लाभली. यास्तव जीवनात कराव्या लागणार्‍या संघर्षापुढे गुडघे टेकणार्‍यांनी, प्रतिकूल परिस्थितीला दोष देणार्‍यांनी … Read more

माणूस श्रेष्ठ कि प्राणी आणि वनस्पती ?

‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. देवही एक सेकंदाची सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवार आणि रविवार सुटी घेतो. एवढेच नव्हे, तर वर्षातूनही काही दिवस हक्काने सुटी घेतो. असे असतांना यासंदर्भात माणूस श्रेष्ठ कि प्राणी आणि वनस्पती ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संत कोणत्या नात्यांशी जोडलेले असतात ?

‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.११.२०२१)

तिस-या महायुद्धात देव कोणाला वाचवणार ?

‘जे हिंदु राष्ट्रात रहाण्याच्या योग्यतेचे आहेत, त्यांना आगामी तिसर्‍या महायुद्धात देवच वाचवणार आहे. त्यांची काळजी करू नका !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.८.२०२१)