कर्तव्य
आई-वडील आणि इतर वडीलधारी माणसे देवघरातील मूर्तीसारखी सांभाळा. कर्तव्यात कुठेच न्यूनता ठेवू नका. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
आई-वडील आणि इतर वडीलधारी माणसे देवघरातील मूर्तीसारखी सांभाळा. कर्तव्यात कुठेच न्यूनता ठेवू नका. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते स्वार्थासाठी पक्ष बदलतात, तसे विविध संप्रदायांचे भक्त संप्रदाय पालटत नाहीत; कारण त्यांच्यात गुरु आणि ईश्वर यांच्याप्रती श्रद्धा असते. असे असतांना राजकीय पक्षांना भारतावर राज्य करून द्यायचे कि भक्तांना ? – डॉ. आठवले (६.५.२०१४)
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला श्रद्धास्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे मनाला शांती मिळून मानसिक तणावाचे निर्मूलन होते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
चन्द्रिकां तस्करो द्वेष्टि कवितां मत्सरी जनः । कुलटा च स्त्रियं साध्वीं स्वभावो दुरतिक्रमः ॥ अर्थ : चोर चंद्राच्या चांदण्याचा द्वेष करतो. मत्सरी मनुष्य कवितेचा द्वेष करतो. व्यभिचारिणी स्त्री पतिव्रतेचा राग करते. स्वभाव खरोखरच ओलांडून जाण्याजोगा (बलण्याजोगा) नसतो ! स्पष्टीकरण : चोराला काळाकुट्ट अंधार प्रिय असतो. शुभ्रधवल चंद्राकाशाचा तो द्वेष करतो. कुलटा, जारिणी स्त्री महासाध्वी पतिव्रतेचा … Read more
अ. कायद्याने का समाज वळतो ? तिथे धर्म हवा ! गर्भपाताला शासनाची संमती आहे, हे खरं; परंतु गर्भजल चिकित्सेविरुद्ध शासकीय कायदे आहेत. कायद्याने का समाज वळतो ? तिथे धर्म हवा ! टाईम्सचा लेख (४.७.१९८८) सांगतो की, आता धार्मिक संस्थांनी या कामी पुढाकार घ्यावा. म्हणजे स्त्रियांना गर्भजल चिकित्सेपासून परावृत्त करावे. या बाबतीत कायदा हतबल आहे. अन्य … Read more
समष्टी साधना करतांना साधक जसजसा समाज, राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्याशी हळूहळू एकरूप होतो, तसतसा त्याचा अहं हळूहळू न्यून होत जातो. साधक समष्टीशी पूर्णपणे एकरूप झाला की, त्याचा अहं पूर्णपणे नाहीसा होतो. अहंकार, मीपणा संपला की, पाप-पुण्य, क्रियमाण, संचित, प्रारब्ध इत्यादी काहीच उरत नाही. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले, चेंबूर, मुंबई.(२५.६.२०१३)
१. एकदा हिरण्यकश्यपू तप करण्यासाठी वनात गेला होता. तेव्हा बृहस्पतीने पोपटाचे रूप घेऊन नारायण नारायण असे म्हणत त्याचा तपोभंग केला. हिरण्यकश्यपू रागावून घरी आला. पत्नी कयाधूने विचारले, पोपट काय म्हणत होता ? हिरण्यकश्यपू म्हणाला, नारायण नारायण. तिने पुनःपुन्हा तेच विचारले. तेव्हा हिरण्यकश्यपूचा १०८ वेळा नारायण नारायण असा जप झाला. त्या रात्री संभोग होऊन कयाधूला गर्भधारणा … Read more
नेहरूंनी ‘सर्व जागतिक आणि भारतीय समस्यांचे मूळ दारिद्य्रात आहे’, असे सांगितल्यावर डॉ. राधाकृष्णन् यांनी ‘आर्थिक परिस्थिती नव्हे, तर चिरंतन तत्त्वज्ञान जगावर राज्य करते’, असे सांगणे : नेहरूंनी सर्व जागतिक आणि भारतीय समस्यांचे मूळ आपल्या दारिद्य्रात आहे. लोकांच्या जीवनमानाची पातळी उंचावल्यास सर्व प्रश्न आपोआप सुटतील, अशी आशा व्यक्त केली. त्या वेळी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् म्हणाले, … Read more
एका अधिवक्त्याने खुनाच्या आरोपातून सोडवण्यासाठी आपल्या अशिलाला सांगितले, ‘न्यायाधिशांनी काहीही विचारले, तरी तू बॅह ऽ बॅहऽऽ असेच म्हणायचे’. दाव्याचा निकाल देतांना न्यायाधिशांनी हा माणूस वेडा आहे, असे समजून त्याला शिक्षा केली नाही. दावा जिंकल्यावर अधिवक्त्याने त्याच्याजवळ शुल्क मागितले. तेव्हा त्यालाही त्याने बॅहऽ बॅहऽऽ, असेच उत्तर दिले ! हुशार राजा फ्रान्समधील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात आलेला … Read more
देवाचे गुण आपल्यात यावे; म्हणून साधक साधना करतात. देवाच्या इतर गुणांकडे त्यांचे लक्ष असते; पण त्याच्या तारक रूपात त्याचा चेहरा हसरा, आनंदी असतो, हे बर्याच जणांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की, मन आणि शरीर यांचे एकमेकांवर परिणाम होतात. मन गंभीर असेल, तर चेहरा गंभीर दिसतो. याउलट चेहरा हसरा ठेवायचा प्रयत्न केला, … Read more