चिरंतन आनंद प्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !

देवावर आणि साधनेवर विश्‍वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो. – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

तरुण वयातच साधना करण्याचे महत्त्व !

‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

भगवंताचे नाम

१. भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशांप्रमाणेच आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते. २. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे, तसे नाम हे मनाचे जीवन आहे. – श्री गोंदवलेकर महाराज (संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)

परमार्थात सूक्ष्म चिंतन आवश्यक असणे !

‘परमार्थ म्हणजे परम अर्थ. श्रेष्ठ असणार्‍या ‘आत्मतत्त्वाचा आत्मलाभ’ म्हणजेच परमार्थ आहे. अत्यंत सूक्ष्म अशा जाणिवेत चिंतन असावे. त्याकरता काळ, वेळ आणि ठावठिकाणा यांची कसलीच आवश्यकता नसते. ‘अंतरी अखंड समाधान’, हीच त्याची फलश्रुती होय !’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक, ‘श्रीधर-संदेश’, फेब्रुवारी १९९९)

नामजप आणि यज्ञ

१. ‘नामजप आणि मंत्रजप करणे या व्यष्टी साधना आहेत, तर यज्ञ करणे ही समष्टी साधना आहे. २. काही साध्य करण्यासाठी एखाद्याला नामजप अनेक दशके करावा लागतो. याउलट यज्ञ काही सात्त्विक पुरोहितांनी काही तास किंवा दिवस केल्यास २० – २५ किलोमीटर अंतरातील सहस्रो लोकांनाही त्याचा लाभ होतो. ’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

भारत देशाचे महत्व

पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो ! -(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

हिंदु राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?

हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?, असा प्रश्‍न काही जण विचारतात. त्याचे उत्तर आहे, नालंदा आणि तक्षशिला विश्‍वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?, हेही शिकवले जाईल. -(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

मोक्षप्राप्तीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे सद्गुरुतत्त्व !

‘आयुर्वेदो अमृतानाम् ।’ म्हणजे ‘अमृतकर अशा गोष्टींमध्ये आयुर्वेद (आयुर्वेदप्रणीत तत्त्वे, पथ्य, नियम, औषधे) श्रेष्ठ आहे.’ त्याचप्रमाणे म्हणावेसे वाटते की, ‘सद्गुरुः मोक्षाय ।’ म्हणजे ‘मोक्षप्राप्तीची साधने, मार्ग अनंत असले, तरी त्यात सर्वश्रेष्ठ आहे ते सद्गुरुतत्त्व !’ (संदर्भ : ‘विश्‍वपंढरी’, फेब्रुवारी २००७)

भावासहीत नामजप पापाचा नाश करते !

‘नामजप जर भावासहीत केला, तर तो आपल्या प्रारब्धाची तीव्रता नष्ट करतो, तसेच त्यामुळे आपले संचित कर्म नष्ट करून आपल्यासाठी मुक्तीचे द्वार उघडतो. यन्नामकीर्तनं भक्त्या विलापनमनुत्तमम् । मैत्रेयाशेषपापानां धातूनामिव पावक: ॥ – विष्णुपुराण, अंश ६, अध्याय ८, श्‍लोक २० अर्थ : जसा अग्नी सुवर्णासारख्या धातूतील मळ जाळून नष्ट करतो, तसेच भक्तीने केलेले भगवंताचे कीर्तन (नाम) सर्व … Read more

साधनेत अधिक प्रगती केलेल्यांना ईश्वरावर पूर्ण श्रद्धा असते.

‘आपत्काळात सर्वसाधारण व्यक्तीला कुटुंबियांची काळजी वाटते; पण तेव्हा साधनेत प्रगती केलेल्या साधकांना साधकांची, म्हणजे ईश्‍वराच्या कुटुंबाची, म्हणजे त्याच्या भक्तांची काळजी वाटते. साधनेत अधिक प्रगती केलेल्यांना ती काळजीही वाटत नाही; कारण ‘ईश्‍वर करतो, ते भल्यासाठी’ यावर त्यांची पूर्ण श्रद्धा असते.’