ईश्वरप्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?
‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘हे करा, ते करू नका’, असे बोलणारे अनेक जण असतात; पण ते तशी कृती किती जणांकडून करवून घेतात ? याउलट खरे गुरु शिष्याकडून ‘तन, मन आणि धन यांचा त्याग करायला शिकवणारी कृती’ करून घेतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत माणसे सात्त्विक होती. त्यांच्यामध्ये स्वभावदोष आणि अहं अल्प होते. त्यामुळे ते कोणत्याही योगमार्गाने साधना करू शकत असत. आता कलियुग आहे. आता सर्वसामान्य मनुष्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे, म्हणजे तो सात्त्विक नसल्याने त्याला साधना करणे अशक्यप्राय होते. कलियुगातील मनुष्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास तो … Read more
‘जिज्ञासू साधना करू लागल्यावर तो ‘साधक’ या टप्प्याला येतो. या टप्प्याला आल्यावर साधनेतील ‘अनेकातून एकात येणे’, या नियमानुसार तो कर्मकांडातील पूजा, मंदिरात जाणे, उपवास करणे इत्यादी अनेक उपासनांऐवजी केवळ सांगितलेली साधनाच करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.९.२०२१)
मनुष्यजन्म हा साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून जिवाची मुक्तता करण्यासाठी आहे. त्यामुळे जे काही भोग शेष राहिले असतील, तेही भोगून संपवावेत. देव जिवाला साधना करून मोक्षप्राप्ती करवून घेण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर मनुष्यजन्म देतो; पण मनुष्य हे विसरतो आणि मायेच्या मागे लागून संपूर्ण जीवन व्यर्थ घालवतो.’ – श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
‘व्यवहारात माणसाला अहं असतो, ‘माझे आणि माझ्या घरच्यांचे जीवन मी चालवत आहे. मी नसलो, तर माझ्या मागे माझ्या बायका-पोरांचे, नातलगांचे काय होईल ?’ काही कारणामुळे त्या व्यक्तीचे निधन होते. त्या वेळी देव दाखवून देतो, ‘तो मनुष्य नसतांनाही त्याचे घर चालले आहे. त्याचे कुटुंबीय जीवन जगत आहेत.’ मायेमध्ये जगतांना हे जगणे कठीण असते; कारण ‘मी सर्व … Read more
‘विज्ञान पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांनी समजून घेतात; म्हणून त्याला मर्यादा आहे. याउलट अध्यात्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील असल्याने ते अमर्याद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘परमात्म्याची कृपा श्रेष्ठ असून संसार मिथ्या आहे, हे कुणालाच आपोआप उमजत नाही. नुसत्या गप्पा येतील; पण आचरण मात्र त्यानुरूप होत नाही. जन्माला आलेल्यास मरण चुकत नाही, लक्ष्मी चंचल आहे, इंद्रियवशतेमुळे नाश ओढवतो’, या सगळ्या गोष्टी ठाऊक नाहीत, असा कुणीही नाही; पण मनातले विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारे किती निघतील ? मनुष्याची योग्यता त्याच्या आचरणाने सिद्ध होत … Read more
‘अज्ञानरूपी धुके नष्ट होऊन आत्मरूपाचा प्रकाश सर्वत्र परिपूर्ण असणे, यालाही मोक्ष म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, सप्टेंबर १९९९)